शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

जिल्ह्याला सुखद धक्का; कोरोनामुक्तीचा मोठा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 2:56 PM

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णसंख्येत रोज मोठी भर पडत असल्याने वाढलेला तणाव आता ऑक्टोबरमध्ये खूप अंशी निवळला आहे. आता रुग्णसंख्या घटली असून, कोरोनामुक्तीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्ह्यातील लोकांनाही दिलासा मिळाला आहे. आजच्या घडीला जिल्ह्यात ८,४१८ रुग्णांपैकी ७,७९८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. हे प्रमाण आता ९२.६३ टक्के इतके झाले आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याला सुखद धक्का; कोरोनामुक्तीचा मोठा टक्का ऑगस्टने नाचवले, सप्टेंबरने घालवले, ऑक्टोबरने वाचवले

मनोज मुळ्येरत्नागिरी : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णसंख्येत रोज मोठी भर पडत असल्याने वाढलेला तणाव आता ऑक्टोबरमध्ये खूप अंशी निवळला आहे. आता रुग्णसंख्या घटली असून, कोरोनामुक्तीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्ह्यातील लोकांनाही दिलासा मिळाला आहे. आजच्या घडीला जिल्ह्यात ८,४१८ रुग्णांपैकी ७,७९८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. हे प्रमाण आता ९२.६३ टक्के इतके झाले आहे.अजूनही लस सापडलेली नसल्याने कोरोनावर नेमका इलाज सापडलेला नाही. मात्र, तरीही आरोग्य यंत्रणेकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमुळे कोरोनातून पूर्ण बरे झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण मात्र सातत्याने कायम राहिले आहे.मार्च महिन्यात जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळला. पहिल्या काही दिवसात जिल्ह्यात सहा रुग्ण आढळले. मात्र, हे रुग्ण लवकर बरेही झाले. त्यानंतर जवळपास १५ दिवस जिल्ह्यात एकही रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त होण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र त्यानंतर रुग्ण झपाट्याने सापडू लागले.

ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सवादरम्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. हा महिना आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे पहिले १८ दिवस या काळात रुग्ण वाढीचा वेग खूप मोठा होता. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पहिल्यापासून कायम आहे. आता रुग्णसंख्या घटल्याने कोरोनामुक्तांचा टक्का वाढला आहे.ऑगस्टमध्ये मुक्ती कमीचऑगस्ट महिन्यात गणेशोत्सव काळात रुग्णसंख्या वाढण्याचा वेग खूप मोठा होता. त्यावेळी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या सातत्यपूर्ण होती. मात्र रुग्ण वाढल्यामुळे बरे होणाऱ्यांचे प्रमाण खूपच घटल्यासारखे दिसत होते. हे प्रमाण ६८.५ टक्के इतके कमी झाले होते. मात्र सप्टेंबरपासून ते वाढतच गेले आहे.तब्बल ३७४ कोरोनामुक्तसप्टेंबर महिन्याच्या १९ तारखेपासून रूग्ण घटले आणि कोरोनामुक्त वाढत गेले. २४ सप्टेंबरला कोरोनामुक्तीचे प्रमाण ७६.७६ टक्के इतके होते. मात्र २५ सप्टेंबरला एकाच दिवसात विक्रमी ३७४ रुग्ण बरे झाले. त्यामुळे कोरोनामुक्तांचे प्रमाण चार टक्क्यांनी वाढून ८०.७९ टक्के इतके झाले.दुसऱ्यांदा होऊ शकतोजे एकदा कोरोनामुक्त झाले आहेत, त्यांना नियमित काळजी घ्यावी लागणार आहे. अनेकांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यात कोरानाची लक्षणे अधिक तीव्र दिसून आली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी