शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पिकेल ते विकेल ही आघाडीने चोरलेली योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 16:15 IST

bjp, atulkalsekar, sindhudurg महाविकास आघाडी सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेतील काही योजना चोरुन पिकेल ते विकेल ही योजना सुरु केली आहे. या योजनेतील सर्व लाभ ह्यआत्मनिर्भर भारतह्णमधूनच देण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी केले. त्यांनी लिहिलेल्या ह्यनीलक्रांतीह्ण या पुस्तकाचे प्रकाशन गुहागरमध्ये झाले, यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देपिकेल ते विकेल ही आघाडीने चोरलेली योजनाअतुल काळसेकर यांचा सरकारवर थेट आरोप

गुहागर : महाविकास आघाडी सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेतील काही योजना चोरुन पिकेल ते विकेल ही योजना सुरु केली आहे. या योजनेतील सर्व लाभ आत्मनिर्भर भारतमधूनच देण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी केले. त्यांनी लिहिलेल्या ह्यनीलक्रांतीह्ण या पुस्तकाचे प्रकाशन गुहागरमध्ये झाले, यावेळी ते बोलत होते.जागतिक मत्स्यदिनानिमि काळसेकर यांच्या ह्यनीलक्रांतीह्ण या पुस्तिकेचे प्रकाशन गुहागर येथे भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्ह्याध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अतुल काळसेकर म्हणाले की, आपल्याकडे कोणत्याही योजनेला विरोध करण्याची प्रवृत्ती आहे किंवा ती योजना आपल्यासाठी नाहीच, अशी आपली मानसिकता आहे. त्यामुळे योजनांचे क्रियान्वयनाचे प्रमाण अत्यल्प आहे.

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना २०२०-२५ ही मच्छिमारांचे जीवन बदलून टाकणारी योजना आहे. कोकणात मत्स्यव्यवसाय करणाऱ्या सर्वांसाठी काही ना काही उद्योग निर्मितीची संधी या योजनेत दिली आहे. मात्र, आपल्याकडे योजनाच समजत नाहीत. म्हणूनच या पुस्तकाची निर्मिती केल्याचे काळसेकर म्हणाले.यावेळी मच्छीमार नेते विठ्ठल भालेकर यांनी योजना येतात पण आर्थिक सहाय्य करण्यास बँक तयार होत नसल्याची खंत मांडली. भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू म्हणाले की, बँक नाही म्हणते म्हणून प्रस्ताव करायचे थांबू नका. अनेक प्रस्ताव तयार होऊ द्या. मग बँक नाही म्हणाली तर त्यांना तयार कसे करायचे हे आम्ही पाहू, असे सांगितले. या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस सुरेश सावंत, रामदास राणे, आशिष जोगळेकर, ॲड. मिलिंद जाडकर, तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे उपस्थित होते.

टॅग्स :Atul Kalasekarअतुल काळसेकरRatnagiriरत्नागिरीBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे