शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

पिकेल ते विकेल ही आघाडीने चोरलेली योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 16:15 IST

bjp, atulkalsekar, sindhudurg महाविकास आघाडी सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेतील काही योजना चोरुन पिकेल ते विकेल ही योजना सुरु केली आहे. या योजनेतील सर्व लाभ ह्यआत्मनिर्भर भारतह्णमधूनच देण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी केले. त्यांनी लिहिलेल्या ह्यनीलक्रांतीह्ण या पुस्तकाचे प्रकाशन गुहागरमध्ये झाले, यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देपिकेल ते विकेल ही आघाडीने चोरलेली योजनाअतुल काळसेकर यांचा सरकारवर थेट आरोप

गुहागर : महाविकास आघाडी सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेतील काही योजना चोरुन पिकेल ते विकेल ही योजना सुरु केली आहे. या योजनेतील सर्व लाभ आत्मनिर्भर भारतमधूनच देण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी केले. त्यांनी लिहिलेल्या ह्यनीलक्रांतीह्ण या पुस्तकाचे प्रकाशन गुहागरमध्ये झाले, यावेळी ते बोलत होते.जागतिक मत्स्यदिनानिमि काळसेकर यांच्या ह्यनीलक्रांतीह्ण या पुस्तिकेचे प्रकाशन गुहागर येथे भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्ह्याध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी अतुल काळसेकर म्हणाले की, आपल्याकडे कोणत्याही योजनेला विरोध करण्याची प्रवृत्ती आहे किंवा ती योजना आपल्यासाठी नाहीच, अशी आपली मानसिकता आहे. त्यामुळे योजनांचे क्रियान्वयनाचे प्रमाण अत्यल्प आहे.

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना २०२०-२५ ही मच्छिमारांचे जीवन बदलून टाकणारी योजना आहे. कोकणात मत्स्यव्यवसाय करणाऱ्या सर्वांसाठी काही ना काही उद्योग निर्मितीची संधी या योजनेत दिली आहे. मात्र, आपल्याकडे योजनाच समजत नाहीत. म्हणूनच या पुस्तकाची निर्मिती केल्याचे काळसेकर म्हणाले.यावेळी मच्छीमार नेते विठ्ठल भालेकर यांनी योजना येतात पण आर्थिक सहाय्य करण्यास बँक तयार होत नसल्याची खंत मांडली. भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू म्हणाले की, बँक नाही म्हणते म्हणून प्रस्ताव करायचे थांबू नका. अनेक प्रस्ताव तयार होऊ द्या. मग बँक नाही म्हणाली तर त्यांना तयार कसे करायचे हे आम्ही पाहू, असे सांगितले. या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस सुरेश सावंत, रामदास राणे, आशिष जोगळेकर, ॲड. मिलिंद जाडकर, तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे उपस्थित होते.

टॅग्स :Atul Kalasekarअतुल काळसेकरRatnagiriरत्नागिरीBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे