शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मास्क न घालणारे लोक आता कारवाईच्या तोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 15:25 IST

coronavirus, ratnagiri, mask, कोरोनाच्या अनुषंगाने सर्वत्र मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. पोलिसांकडूनही मास्कसह हेल्मेट नसेल तर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे मास्कचा वापर नागरिकांच्या अंगवळणी पडला असला तरी शारीरिक अंतर राखण्याचा विसर पडत आहे. मास्कसक्ती असल्याने अनेक जण नाक तसेच तोंडावर मास्क न लावता केवळ गळ्यात अडकवून फिरत असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसत आहे.

ठळक मुद्देमास्क न घालणारे लोक आता कारवाईच्या तोंडीमास्कची सक्ती अंगवळणी, मात्र सोशल डिस्टन्सिंगचा विसर

शोभना कांबळेरत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने सर्वत्र मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. पोलिसांकडूनही मास्कसह हेल्मेट नसेल तर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे मास्कचा वापर नागरिकांच्या अंगवळणी पडला असला तरी शारीरिक अंतर राखण्याचा विसर पडत आहे. मास्कसक्ती असल्याने अनेक जण नाक तसेच तोंडावर मास्क न लावता केवळ गळ्यात अडकवून फिरत असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसत आहे.ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढल्याने जिल्ह्याच्या आरोग्य विभागाची अधिकच धावपळ सुरू झाली. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नागरिकांना मास्क, सॅनिटायझर आणि शारीरिक अंतर राखण्याचे आवाहन केले. याच दरम्यान जिल्ह्यातही अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली.

गणेशोत्सवासाठी नागरिक खरेदीसाठी गर्दी करू लागले. त्यामुळे संसर्ग अधिक वाढला. जिल्ह्यात या दोन महिन्यात कोरोना रूग्णांची संख्या भरमसाठ वाढली. त्यामुळे कोरोनाबाबत खबरदारी घेण्याच्या दृष्टीने नागरिकांमध्ये बेफिकीरी दिसून येताच प्रशासनाला नाईलाजाने कारवाई करण्याचा पवित्रा घ्यावा लागला.त्यामुळे सप्टेंबर महिन्यात मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईला सुरूवात झाली आहे. खरेदी करताना, शासकीय कार्यालयांमध्ये कामासाठी जाताना, बँकेत जाताना मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले. तसेच या ठिकाणीही मास्कशिवाय प्रवेश नसल्याचे फलकही लावण्यात आले. त्यामुळे नागरिकांना मास्क लावणे अनिवार्य झाले.

रत्नागिरी नगरपरिषदेने शहरात पोलिसांच्या सहकार्याने मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरूवात केली. पोलिसांनीही मास्कसह हेल्मेट अशी दुहेरी कारवाईचा बडगा उगारताच दुचाकीस्वारांनी तर या कारवाईचा धसकाच घेतला.मास्कच्या सक्तीमुळे आता नागरिक मास्क न विसरता वापरू लागले आहेत. मात्र, सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत आहे.

सध्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात कोरोनाची रूग्ण संख्या आटोक्यात येत असल्याचे दिसत असले तरी मृत्यू अजूनही होत आहेत. त्यामुळे नागरिकांना मास्क, सॅनिटायझर याबरोबरच शारीरिक अंतर राखण्याची शिस्त बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.दोन लाखांचा दंड

रत्नागिरी नगर परिषद आणि पोलीस विभाग यांच्या सहकार्याने सप्टेंबर महिन्यात मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ९ ऑक्टोबरपर्यंत करण्यात आलेल्या या कारवाईत मास्क न लावलेल्या ४०९ जणांकडून २ लाख ४ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.गांभीर्य नाही

काही नागरिकांना अजुनही कोरोनाबाबतचे गांभीर्य दिसत नाही. अनेक लोकांना मास्क नाक आणि तोंड झाकण्यासाठी असतो, हेच माहीत नाही. त्यामुळे काही जण मास्क नाक व तोंड उघडे ठेवून लावतात. काहीजण मास्क हनुवटीला लावून तर काही गळ्यात घालून फिरत असतात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी