शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्रगतीसाठी लोकसहभाग गरजेचा

By admin | Updated: July 6, 2016 00:33 IST

इसहाक खतीब : स्वप्न सत्यात उतरले याचा मनस्वी आनंद

राज्यातील प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत समृध्द शाळा ठरवण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग स्तरावरून जोरदार अंमलबजावणी झाली आहे. या कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्याने प्रथम स्थान पटकावले आहे, तर नजीकच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्याचे नाव अग्रभागी असेल, असा दावा येथील गटशिक्षणाधिकारी विजय बाईत यांनी केला आहे. शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा, असा खेड तालुक्याचा नावलौकीक आहे, त्या पार्श्वभूमीवर बाईत यांच्याशी साधलेला थेट संवाद...!प्रश्न : खेडमध्ये शैक्षणिक वातावरण कसं आहे? विशेष करून जिल्हा परिषद शाळांची प्रगती कशी आहे?उत्तर : तालुकाभरातील एकूण ३७४पैकी ३१८ शाळा डिजिटल झाल्या आहेत. यातील ५० शाळा अध्ययन आणि अध्ययनाकरिता वैयक्तिक स्वरूपात आपण स्वत: दत्तक घेतल्या आहेत. तालुक्यातील ब श्रेणीतील शाळा अ श्रेणीमध्ये आणण्याच्या प्रयत्नांना चांगले यश आले आहे. या शाळा १०० टक्के प्रगत होण्याच्या दिशेने सध्या वाटचाल सुरू आहे, तर सावित्रीबाई फुले दत्तक योजनेअंतर्गत खेड तालुक्यातून ४३ लाख ५३ हजार रूपये जमा झाले असून, त्याद्वारे तालुक्यातील १८३ मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवला जात आहे.प्रश्न : समृध्द शाळांसाठी काय प्रयत्न सुरु आहेत?उत्तर : समृध्द शाळांसाठी आवश्यक असे सर्व प्रयत्न करण्यात आले असून, त्यांना चांगले यश आले आहे. शिक्षण आयुक्तांनी खेड तालुक्याची दखल घेतली असून, त्यांनी नुकताच तालुक्याचा अहवाल मागवून घेतला आहे. यामुळे आमच्या आशा पल्लवीत झाल्या असून, जिल्हाभरात खेड तालुका ‘टॉप’वर असेल, यात शंका नाही. शाळांच्या या प्रगतीमागे लोकसहभागाचे गुपीत दडले आहे. लोकसहभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने तालुकाभरात शाळा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत फार मोठी प्रगती होताना दिसत आहे. शासनाच्या अहवालानुसार शैक्षणिक प्रगतीचा आलेख मोबाईल, डिजिटल स्कूल, आयएसओ मानांकन शाळा ज्ञानरचनावादी शाळा, तंत्रस्नेही अशा उपक्रमांनी उंचावत असल्याचे प्रकर्षाने समोर आले आहे. पण या प्रगतीमागे आता लोकसहभागाचे गुपीत लपले असून, प्राप्त मदतीमुळेच हे शक्य झाले आहे.प्रश्न : शिक्षणात सध्या कोणते बदल झाले आहेत?उत्तर : शक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होत असल्याचा अभिमान आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा १०० टक्के प्रगत होणार आहेत. यासाठी सर्वांनीच ध्यास घेतला आहे. खेड तालुक्यातील ३७४पैकी आता २६२ शाळा प्रगत झाल्या आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाची अंमलबजावणी सन २०१५-१६ या शैैक्षणिक वर्षापासून झाली. प्रश्न : समृध्द शाळांच्या उभारणीसाठी कोणते प्रयत्न सुरु आहेत?उत्तर : एबीएल व बाला हे दोन नवे उपक्रम कृतीद्वारे प्रत्यक्षात विद्यार्थ्यांमध्ये उतरवले जात आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. समृध्द शाळांची उभारणी होताना यातून दिसून येत आहे. जसा रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम स्थानावर आहे, तसा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुका जिल्ह्यात क्रमांक एकचा ठरण्यासाठी सर्वांनीच बाजी लावली आहे. तालुक्यातील धामणदिवी गावातील पहिली ते आठवीपर्यंतची जिल्हा परिषद शाळा नं. १ आणि होडकाड गावातील दत्तवाडी येथील इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा नं. १ या दोन शाळांनी आयएसओ-९००० हे मानांकन मिळवले आहे. आजही अनेक शाळा आयएसओ मानांकनाच्या प्रतीक्षेत आहेत, हे शिक्षक आणि लोकप्रतिनिधींच्या कामांचे यश म्हणावे लागेल. प्रश्न : डिजीटल शाळांच्या प्रक्रियेत खेड तालुका कोठे आहे?उत्तर : खेड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ३७४ शाळा आहेत. या सर्वच शाळांचा डिजिटल होण्याकडे कल आहे. त्यातील ३१८ शाळा डिजिटल झाल्या आहेत. यामध्ये एलसीडी प्रोजेक्टरच्या साहाय्याने ९१ शाळा, टॅबच्या सहाय्याने ४७ शाळा आणि संगणकाच्या सहायाने १७६ शाळा डिजिटल झाल्याची माहिती त्यांनी दिली. डिजिटलच्या या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवले जात असून, प्रत्यक्ष ते कृतीत उतरवले जात आहे. याशिवाय शिक्षकांकडील अँड्राईड मोबाईलद्वारे ‘शैक्षणिक अ‍ॅप’च्या सहाय्याने अध्ययन केले जात आहे. या अध्ययन पध्दतीमुळे विद्यार्थ्यांना लवकर आकलन होत असल्याने विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिक्षक व केंद्रप्रमुख विद्यार्थी घडवण्यासाठी चांगले काम करीत असून, उत्तम लोकसहभागामुळे शिक्षकांना बळ मिळत आहे. क्षेत्रीय अधिकारी आणि विस्तार अधिकारी आपापल्या प्रभागाचे काम चोखपणे करीत आहेत.- श्रीकांत चाळके