शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

कोकण रेल्वे मार्गावर ९७४ कर्मचाऱ्यांची गस्त, १० जूनपासून पावसाळी वेळापत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2020 3:35 PM

कोकण रेल्वे मार्गावर १० जूनपासून मान्सून वेळापत्रक लागू करण्यात आले असून १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी हे वेळापत्रक कार्यान्वित राहील. पावसाळयातील प्रवाशांंच्या सुरक्षितेसाठी कोकण रेल्वे सर्व त्या सुरक्षा उपायांसह सज्ज झाली आहे. या कालावधीत ९७४ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मार्गावर २४ तास गस्त राहणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे

ठळक मुद्देकोकण रेल्वे मार्गावर ९७४ कर्मचाऱ्यांची २४ तास गस्त, १० जूनपासून पावसाळी वेळापत्रकप्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी कोकण रेल्वे सज्ज

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १० जूनपासून मान्सून वेळापत्रक लागू करण्यात आले असून १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी हे वेळापत्रक कार्यान्वित राहील. पावसाळयातील प्रवाशांंच्या सुरक्षितेसाठी कोकण रेल्वे सर्व त्या सुरक्षा उपायांसह सज्ज झाली आहे. या कालावधीत ९७४ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मार्गावर २४ तास गस्त राहणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहेलॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तू आणि श्रमिकांच्या घरवापसीसाठी अहोरात्र मेहनत घेतलेल्या कोकण रेल्वेने याच कालावधीत आपली मान्सूनपूर्व सुरक्षा उपाययोजनांची कामेही पूर्ण केली आहेत. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेकडून कोलाड ते ठोकूर या आपल्या ७४० किलोमीटरच्या पट्ट्यात मान्सून पूर्व कामांना काही दिवसांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती.

पावसात कोकण रेल्वे मार्गावर पाणी येऊ नये, यासाठी पाण्याचे मार्ग मोकळे करणे आणि मार्गानजीकच्या कटिंगची पाहणी करून धोकादायक वाटणारी कटिंग काढून टाकणे, याला प्राधान्य देण्यात आले. गेल्या काही वर्षात पावसाळापूर्व उपाययोजनांमुळे गेल्या सात वर्षात मार्गावर दरड व माती येण्याचे प्रकार खूप कमी झाले आहेत.धोकादायक कटिंग आहेत, अशा ठिकाणी विशेष उपाययोजना केल्या असून या ठिकाणी २४ तास कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहेत. अशा ठिकाणांवर रेल्वेचा वेगही नियंत्रित ठेवण्यात येणार आहे. आपत्कालीन स्थितीत तत्काळ मदत मिळावी यासाठी ठराविक अंतरांवर पोकलेन मशिन्स सारखी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.मुसळधार पावसाच्या काळात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्याची खबर देणारी यंत्रणा मार्गावर तीन पुलांवर ठिकाणी सुसज्ज आहे. पुराचे पाणी धोकादायक पातळीच्या वर आल्यास ही यंत्रणा सतर्क करते. माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडपी येथे पर्जन्यमापक यंत्रणा मार्गावरील ९ स्थानकांमध्ये सुसज्ज असून, अतिवृष्टी काळात ही यंत्रणा सूचना करेल.

मान्सूनच्या काळात बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव या तीन ठिकाणी नियंत्रण कक्ष २४ तास रेल्वेच्या सुरक्षित वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी कार्यरत राहणार आहे. पावसाळयातील सुरक्षित प्रवासासाठी कोकण रेल्वे सर्व सुरक्षा उपायांसह सज्ज झाली आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरी