शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

रत्नागिरी आगाराकडून प्रवाशांची कुचेष्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 6:22 PM

एस्. टी. गाड्यांवर खडूचे फलक

 आॅनलाईन लोकमत/अरुण आडिवरेकर

रत्नागिरी, दि. २४ : ^^‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ अशी बिरूदावली मिरवणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने प्रवाशांचीच कुचेष्टा मांडली आहे. रत्नागिरी शहरातून फिरणाऱ्या गाड्यांवर सध्या खडूने लिहिलेले फलक पाहायला मिळत आहेत. हे फलक दूरवरून प्रवाशांना दिसत नसल्याने गाडी चुकण्याचे प्रकारही घडत आहेत.

रत्नागिरी विभागाच्या या कारभारानंतर आता राज्य परिवहन महामंडळाच्या भरतीत ‘सुवाच्च अक्षर असणे आवश्यक’ अशी अट आल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. सर्वसामान्यांची ‘जीवनवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळातर्फे एस्. टी.कडे प्रवासी वळण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजना राबवताना प्रवाशांच्या सोयीसाठी कोणत्याही उपाययोजना करताना महामंडळ दिसत नाही.

नवनवीन योजना राबवताना प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा देण्याबाबत उदासिनता दिसून येत आहे. त्यामुळे या कारभाराबाबतच साशंकता निर्माण झाली आहे. रत्नागिरी शहरातून फिरणाऱ्या शहरी वाहतुकीच्या गाड्यांवर लावण्यात येणाऱ्या फलकांची वानवा असल्याचे यातून दिसत आहे. या फलकांऐवजी गाड्यांवरील काचेवर खडूने फलक लिहिले जात आहेत. खडूने लिहिलेले हे फलक नीट दिसतही नसल्याने प्रवाशांची अडचण होत आहे. गाडीसाठी बसथांब्यावर उभ्या असणाऱ्या प्रवाशांना हे फलक दिसत नसल्याने गाडी पुढ्यातून निघून गेल्यानंतरही गाडी कोणती आहे, हेच लक्षात येत नाही.

शहरातील बहुतांशी भागात जाणाऱ्या गाड्यांवर खडूने लिहिले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या गाड्यांचे फलक लिहिण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडे निधीची कमतरता आहे का? असाच सवाल केला जात आहे. ऐन पावसाळ्यातच गाडीवर खडूने लिहिले जात असल्याने पाऊस पडल्यानंतर हा फलक पाण्यामुळे गायब होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातही गाडी चुकल्यानंतर प्रवाशांना पुन्हा पुढच्या गाडीसाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. एस्. टी.च्या शहरी वाहतूक गाड्यांवर लिहिण्यात येणारे हे खडूचे फलक पाहिल्यानंतर आता नव्याने होणाऱ्या भरतीमध्ये चालक व वाहक पदांसाठी ‘सुवाच्च अक्षर असणे आवश्यक’, अशी अट महामंडळाने घातल्यास त्याबाबत आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.