छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची सुरक्षाच आता रामभरोसे राहिली आहे. या क्रीडांगणाला बंदिस्त गेट नसल्याने रात्रीच्यावेळी याठिकाणी पार्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. क्रीडांगणातील प्रेक्षक ...
गुहागरातील काताळे बंदरात आता लवकरच जहाज दुरुस्ती आणि जहाज तोडणीचा प्रकल्प उभा राहणार आहे. देशातील महत्त्वाच्या जहाज तोडणी प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प ठरणार आहे. काताळे येथील ७.२५ एकर क्षेत्रात हा प्रकल्प उभा राहणार आहे. ...
दादर - मडगाव पॅसेंजर रविवारी मध्यरात्री १.३० वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानकात आल्यानंतर पुढे न गेल्याने संतप्त प्रवाशांनी रविवारी ४ ते ६ आकस्मिक रेलरोको आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक दोन तास ठप्प झाली. अखेर रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रव ...
रत्नागिरी : दादर-मुंबईहून रविवारी पहाटे रत्नागिरी रेल्वे स्थानकात आलेली पॅसेंजर गाडी पुढे मडगावपर्यंत गेलीच नाही. यामुळे शेकडो प्रवासी रत्नागिरी स्थानकातच अडकून पडले. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी रविवारी पहाटे ४ ते ६ वाजेपर्यंत रत्नागिरी रेल्वे स्थानका ...
परदेशात दर्जेदार आंब्याची निर्यात करून शेतकऱ्यांना चांगले अर्थाजन व्हावे यासाठी शासनाने ‘मँगोनेट’ सुविधा सुरू केली. गेली चार वर्षे ही योजना सुरू आहे परंतु गतवर्षी पहिल्यांदाच ‘मँगोनेट’ प्रणालीद्वारे जिल्ह्यातील तीन शेतक-यांचा आंबा कुवेत व रशियामध्ये ...
चिपळूण नगर परिषदेचे बहुतांश कर ५० टक्क्यांहून कमी करण्याबाबतच्या ठरावावर सेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे आपले लेखी म्हणणे सादर केले. याविषयी जिल्हाधिकारी कोणता निर्णय देतात, याकडे लक्ष लागले आहे. ...
चिपळूण तालुक्यातील खांदाट -भोईवाडी येथे शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता स्कॉर्पिओ गाडी (एमएच ११ वाय २७०६) मागे घेत असताना स्कॉर्पिओच्या मागे असलेली सुमैय्या राजू मुल्ला ही तीन वर्षाची बालिका मागच्या चाकाखाली येऊन ठार झाली. ...
जिओ कंपनीचे केबल कामासाठी तालुक्यात आलेल्या कामगाराच्या ९ वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना ३ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्याने भारजा नदीपात्रात घडली. ...
शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादू नयेत याकरिता आपण वारंवार पाठपुरावा करत आहोत. शिक्षकांच्या सर्वांगिण हितासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केले. ...
राज्यात सर्वत्र तापमानाची झळ बसली असताना आंबा भाजण्याबरोबर गळ होण्याचे प्रमाण वाढले असून, आंबा लवकर तयार होऊ लागला. तयार आंबा शेतकरी वाशी (मुंबई) बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवू लागल्याने आवक वाढली आहे. दरात घसरण झाली आहे. हजार ते तीन हजार रूपये दराने आं ...