शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
4
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
5
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
6
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
7
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
8
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
9
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
10
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
11
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
12
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
13
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
14
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
15
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
16
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
17
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
18
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
19
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
20
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले

पावसाने पाठ फिरवल्यामुळे भात लावणीला ब्रेक, शेतकरी हवालदिल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 18:02 IST

पाऊस न पडल्यास आणखी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता

चिपळूण : सुरुवातीपासूनच हुलकावण्या देणाऱ्या पावसाने जुलै महिन्यातही पाठ फिरवल्याने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. गेल्या तीन दिवसांत पावसाची सरासरी घसरल्याने जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी भातलावणीचे काम ठप्प झाले आहे. ग्रामीण भागातील डोंगर उतारावरील शेती तर कोरडी पडली आहे. पाऊस आणखी लांबल्यास पुन्हा एकदा रोपांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.यावर्षी मृग नक्षत्रापासूनच सर्व नक्षत्रे कोरडी गेली. तब्बल २४ जूनपर्यंत पावसाने हजेरी लावली नव्हती. त्याचवेळी बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस दमदार पावसाला सुरुवात झाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यातही पावसाचा जोर चांगला होता. भाताची रोपे तयार झाल्याने पहिल्या आठवड्यात भात लावणीच्या कामाला वेग आला होता. मात्र, रविवारपासून (९ जुलै) पावसाने पूर्णतः उघडीप घेतली असून, कडक उन्हामुळे पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली आहे. परिणामी शेतजमिनी कोरड्या पडू लागल्या आहेत. या परिस्थितीमुळे ग्रामीण भागात भात शेतीची कामे ठप्प झाली आहेत.चिपळूण तालुक्यात एकूण १० हजार हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली येते. त्यापैकी केवळ १००५ हेक्टर क्षेत्रावर भातशेतीची लागवड झाली आहे. अजूनही ९० टक्के भात शेती लागवडीचे काम शिल्लक आहे. अशा परिस्थितीत पाऊस न पडल्यास आणखी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या चार दिवसांत तालुक्यात केवळ ४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यातील दोन दिवसांत १० मिलिमीटरदेखील पाऊस पडलेला नाही. ग्रामीण भागात कालवे, पाझर किंवा तलावांच्या स्वरूपात काही ठिकाणी पाणी उपलब्ध असले तरी ते शेतजमिनीत आणताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच परिसरातील विहिरींची पाणी पातळी पुन्हा घटल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भातलावणीची कामे रखडत चालली आहेत. चिपळूण तालुक्यात दहा हजार भातलागवडीचे क्षेत्र आहे. मात्र, त्यापैकी केवळ १० टक्केच भातलावणीची कामे झाली आहेत. एक-दोन दिवसांत चांगला पाऊस पडल्यास लावणीची कामे लवकर पूर्णत्वास जातील. शेतकऱ्यांनी एक रुपयाच्या विम्याचाही लाभ घ्यावा. - मनोज गांधी, कृषी पर्यवेक्षक, चिपळूण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरीRainपाऊस