शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

पावसाने पाठ फिरवल्यामुळे भात लावणीला ब्रेक, शेतकरी हवालदिल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 18:02 IST

पाऊस न पडल्यास आणखी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता

चिपळूण : सुरुवातीपासूनच हुलकावण्या देणाऱ्या पावसाने जुलै महिन्यातही पाठ फिरवल्याने शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. गेल्या तीन दिवसांत पावसाची सरासरी घसरल्याने जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी भातलावणीचे काम ठप्प झाले आहे. ग्रामीण भागातील डोंगर उतारावरील शेती तर कोरडी पडली आहे. पाऊस आणखी लांबल्यास पुन्हा एकदा रोपांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.यावर्षी मृग नक्षत्रापासूनच सर्व नक्षत्रे कोरडी गेली. तब्बल २४ जूनपर्यंत पावसाने हजेरी लावली नव्हती. त्याचवेळी बिपरजॉय चक्रीवादळामुळे पाऊस सुरू झाला आणि त्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस दमदार पावसाला सुरुवात झाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यातही पावसाचा जोर चांगला होता. भाताची रोपे तयार झाल्याने पहिल्या आठवड्यात भात लावणीच्या कामाला वेग आला होता. मात्र, रविवारपासून (९ जुलै) पावसाने पूर्णतः उघडीप घेतली असून, कडक उन्हामुळे पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली आहे. परिणामी शेतजमिनी कोरड्या पडू लागल्या आहेत. या परिस्थितीमुळे ग्रामीण भागात भात शेतीची कामे ठप्प झाली आहेत.चिपळूण तालुक्यात एकूण १० हजार हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली येते. त्यापैकी केवळ १००५ हेक्टर क्षेत्रावर भातशेतीची लागवड झाली आहे. अजूनही ९० टक्के भात शेती लागवडीचे काम शिल्लक आहे. अशा परिस्थितीत पाऊस न पडल्यास आणखी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या चार दिवसांत तालुक्यात केवळ ४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यातील दोन दिवसांत १० मिलिमीटरदेखील पाऊस पडलेला नाही. ग्रामीण भागात कालवे, पाझर किंवा तलावांच्या स्वरूपात काही ठिकाणी पाणी उपलब्ध असले तरी ते शेतजमिनीत आणताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच परिसरातील विहिरींची पाणी पातळी पुन्हा घटल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भातलावणीची कामे रखडत चालली आहेत. चिपळूण तालुक्यात दहा हजार भातलागवडीचे क्षेत्र आहे. मात्र, त्यापैकी केवळ १० टक्केच भातलावणीची कामे झाली आहेत. एक-दोन दिवसांत चांगला पाऊस पडल्यास लावणीची कामे लवकर पूर्णत्वास जातील. शेतकऱ्यांनी एक रुपयाच्या विम्याचाही लाभ घ्यावा. - मनोज गांधी, कृषी पर्यवेक्षक, चिपळूण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरीRainपाऊस