शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

..नाहीतर शून्य जाऊन दोनच शिल्लक राहतील; भाजप नेत्याने उद्धव ठाकरेंना लगावला टोला

By अरुण आडिवरेकर | Updated: November 26, 2024 15:44 IST

रत्नागिरी : ज्यांची संख्या जास्त त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद जाईल, हे ज्यादिवशी शरद पवार यांनी जाहीर केले त्या दिवसापासून महाविकास आघाडीचा ...

रत्नागिरी : ज्यांची संख्या जास्त त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद जाईल, हे ज्यादिवशी शरद पवार यांनी जाहीर केले त्या दिवसापासून महाविकास आघाडीचा रनिंग रेट खाली कोसळत गेला. हिंदुत्वाची कास सोडून उद्धव ठाकरे ज्या विचित्र दुष्टचक्रात अडकले होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने जेवढ कमावल होत तेवढ उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाने गमावलं आहे, अगदी लुगडच गमावल आहे, असा टोला भाजपचे निवडणूक समन्वयक आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी लगावला. जनतेने भरभरुन दिलेले ६० सांभाळता आले नाहीत, त्यांच्या पदरी शेवटी २० आले. आता ते २० सांभाळून ठेवा नाहीतर शून्य जाऊन दोनच शिल्लक राहतील असा टोला लगावला. भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीसाठी ते मंगळवारी रत्नागिरीत आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, मुख्यमंत्री पदावरुन महायुतीत कोणताही वाद नाही. तीन पक्ष असले तरी त्यांचे न्यायाधीश दिल्लीत बसतात. महाविकास आघाडीच न्यायालय हे जजलेस होतं, महायुतीचे न्यायाधीश योग्य प्रकारे जजमेंट करतील आणि महाराष्ट्राला मुख्यमंत्री देतील, असे जठार म्हणाले.घराबाहेर पडा, लोकांची कामे कराज्यांना जनतेने भरभरुन दिलेले ६० सांभाळता आले नाहीत, त्यांच्या पदरी शेवटी २० आले. आता ते २० सांभाळून ठेवा नाहीतर शून्य जाऊन दोनच शिल्लक राहतील. घराबाहेर पडा, लाेकांची कामे करा, थोडे पैसे खर्च करा, असा टोलाही लगावला. उद्धव ठाकरे यांना आता जर विरोधी पक्ष नेते करायचा असेल, तर उरला सुरलेला पक्ष त्यांनी शरद पवार किंवा काँग्रेसमध्ये विलीन करावा. पक्ष विलीन करून विरोधी पक्षनेते पद घ्यावं, असे जठार म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ratnagiriरत्नागिरीPramod Jatharप्रमोद जठारUddhav Thackerayउद्धव ठाकरेthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024