शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
3
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
4
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
5
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
6
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
7
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
8
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
9
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
10
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
11
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
12
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
13
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
14
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
15
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
16
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
17
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
18
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
19
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
20
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?

जिल्ह्यात क्षयरोग रुग्णांच्या संख्येत दोन वर्षांत लक्षणीय घट

By admin | Updated: March 24, 2015 00:13 IST

--जागतिक क्षयरोग दिन

रत्नागिरी : हवेमार्फत प्रसार होणाऱ्या क्षयरोगाकडे दुर्लक्ष केल्यास तो रुग्णाला मृत्युच्या दाढेत ओढतोच, शिवाय इतरांनाही त्याचा संसर्ग होतो. हा रोग बरा होणारा असला तरी जिल्ह्यात वर्षभरात त्याचे २२४२ रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, २०१३पेक्षा सन २०१४ वर्षात रुग्णांची संख्या कमी आहे. गेल्या काही दिवसात क्षयरोगाने जिल्ह्यातून ‘एक्झिट’ घेण्याची तयारी चालवली आहे. रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने २४ मार्च १८८२ रोजी क्षयरोगाच्या जंतूचा शोध लावला. त्यामुळे क्षयरोगावर उपचार करणे शक्य झाले. त्याची आठवण म्हणून २४ मार्च १९९३ पासून जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केल्याप्रमाणे संपूर्ण जगभर २४ मार्च हा राष्ट्रीय जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येत आहे.क्षयरोगाचा प्रसार हवेमार्फत होतो. क्षयरोग झालेली व्यक्ती औषधे घेत नसेल तर खोकल्यातून, शिंकेतून अथवा थुंकीतून क्षयाचे जीवाणू ती इतर लोकांमध्ये पसरविते. शरीरातील कोणत्याही अवयवास क्षयरोग होऊ शकतो. इतर अवयवांच्या तुलनेत फुफ्फुसाला क्षयरोग होण्याचे प्रमाण सर्वात अधिक आहे. जिल्ह्यात रत्नागिरी, राजापूर, कामथे, दापोली, चिखली, देवरुख, कळंबणी आणि लांजा अशा ८ ठिकाणी क्षयरोग नियंत्रण पथके स्थापन करण्यात आली आहेत. जिल्हा क्षयरोग केंद्र, ३ उपजिल्हा रुग्णालये, ८ ग्रामीण रुग्णालये, ६७ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३७८ आरोग्य उपकेंद्र, २ नगर परिषद दवाखाने ही सर्व रुग्णालये डॉट्स उपचार केंद्र म्हणून आरोग्य विभागाकडून घोषित करण्यात आली आहेत. या डॉट्स उपचार केंद्रामार्फत प्रत्येक गावात डॉट्स प्रोव्हायडर नेमून त्यांच्यामार्फत क्षयरुग्णांना प्रत्यक्ष देखरेखीखाली आठवड्यातून तीन वेळा डॉट्स औषधोपचार मोफत देण्यात येतो. क्षयरोगावरील औषधे महागडी आहेत. रुग्णाने खासगी रुग्णालयामध्ये उपचार केल्यास त्याला ४ ते ५ हजार रुपये खर्च येतो. मात्र, शासकीय रुग्णालयांमध्ये क्षयरोगावर मोफत औषधोपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे बहुतांश रुग्ण या रोगावर शासकीय रुग्णालयात औषधोपचार घेत आहेत. जिल्ह्यात सन २०१३मध्ये २४११ क्षयरोग रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी उपचाराखाली १२१८ रुग्ण असून, ९३१ रुग्ण औषधोपचारानंतर पूर्ण बरे झाले होते, तर ६२ रुग्णांचा क्षयरोगाने मृत्यू झाला होता. सन २०१४ साली आढळलेल्या २२४२ क्षयरोगाच्या रुग्णांपैकी १२२८ रुग्णांवर औषधोपचार सुरू असून, ९७५ बरे झाले आहेत. या रोगाने मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ५० आहे. मात्र, या रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट झालेली दिसून येत आहे. नियमित औषधोपचार न घेणाऱ्या, व्यसनाधिनता आणि शेवटच्या क्षणी औषधोपचार घेणाऱ्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, क्षयरोगावर वेळीच औषधोपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होतो, असे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. (शहर वार्ताहर)