शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
6
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
7
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
8
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
9
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
10
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
12
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
13
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
14
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
15
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
17
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
18
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
19
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
20
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

जिल्ह्यात क्षयरोग रुग्णांच्या संख्येत दोन वर्षांत लक्षणीय घट

By admin | Updated: March 24, 2015 00:13 IST

--जागतिक क्षयरोग दिन

रत्नागिरी : हवेमार्फत प्रसार होणाऱ्या क्षयरोगाकडे दुर्लक्ष केल्यास तो रुग्णाला मृत्युच्या दाढेत ओढतोच, शिवाय इतरांनाही त्याचा संसर्ग होतो. हा रोग बरा होणारा असला तरी जिल्ह्यात वर्षभरात त्याचे २२४२ रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, २०१३पेक्षा सन २०१४ वर्षात रुग्णांची संख्या कमी आहे. गेल्या काही दिवसात क्षयरोगाने जिल्ह्यातून ‘एक्झिट’ घेण्याची तयारी चालवली आहे. रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने २४ मार्च १८८२ रोजी क्षयरोगाच्या जंतूचा शोध लावला. त्यामुळे क्षयरोगावर उपचार करणे शक्य झाले. त्याची आठवण म्हणून २४ मार्च १९९३ पासून जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केल्याप्रमाणे संपूर्ण जगभर २४ मार्च हा राष्ट्रीय जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येत आहे.क्षयरोगाचा प्रसार हवेमार्फत होतो. क्षयरोग झालेली व्यक्ती औषधे घेत नसेल तर खोकल्यातून, शिंकेतून अथवा थुंकीतून क्षयाचे जीवाणू ती इतर लोकांमध्ये पसरविते. शरीरातील कोणत्याही अवयवास क्षयरोग होऊ शकतो. इतर अवयवांच्या तुलनेत फुफ्फुसाला क्षयरोग होण्याचे प्रमाण सर्वात अधिक आहे. जिल्ह्यात रत्नागिरी, राजापूर, कामथे, दापोली, चिखली, देवरुख, कळंबणी आणि लांजा अशा ८ ठिकाणी क्षयरोग नियंत्रण पथके स्थापन करण्यात आली आहेत. जिल्हा क्षयरोग केंद्र, ३ उपजिल्हा रुग्णालये, ८ ग्रामीण रुग्णालये, ६७ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३७८ आरोग्य उपकेंद्र, २ नगर परिषद दवाखाने ही सर्व रुग्णालये डॉट्स उपचार केंद्र म्हणून आरोग्य विभागाकडून घोषित करण्यात आली आहेत. या डॉट्स उपचार केंद्रामार्फत प्रत्येक गावात डॉट्स प्रोव्हायडर नेमून त्यांच्यामार्फत क्षयरुग्णांना प्रत्यक्ष देखरेखीखाली आठवड्यातून तीन वेळा डॉट्स औषधोपचार मोफत देण्यात येतो. क्षयरोगावरील औषधे महागडी आहेत. रुग्णाने खासगी रुग्णालयामध्ये उपचार केल्यास त्याला ४ ते ५ हजार रुपये खर्च येतो. मात्र, शासकीय रुग्णालयांमध्ये क्षयरोगावर मोफत औषधोपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे बहुतांश रुग्ण या रोगावर शासकीय रुग्णालयात औषधोपचार घेत आहेत. जिल्ह्यात सन २०१३मध्ये २४११ क्षयरोग रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी उपचाराखाली १२१८ रुग्ण असून, ९३१ रुग्ण औषधोपचारानंतर पूर्ण बरे झाले होते, तर ६२ रुग्णांचा क्षयरोगाने मृत्यू झाला होता. सन २०१४ साली आढळलेल्या २२४२ क्षयरोगाच्या रुग्णांपैकी १२२८ रुग्णांवर औषधोपचार सुरू असून, ९७५ बरे झाले आहेत. या रोगाने मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ५० आहे. मात्र, या रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट झालेली दिसून येत आहे. नियमित औषधोपचार न घेणाऱ्या, व्यसनाधिनता आणि शेवटच्या क्षणी औषधोपचार घेणाऱ्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, क्षयरोगावर वेळीच औषधोपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होतो, असे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. (शहर वार्ताहर)