शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

जिल्ह्यात क्षयरोग रुग्णांच्या संख्येत दोन वर्षांत लक्षणीय घट

By admin | Updated: March 24, 2015 00:13 IST

--जागतिक क्षयरोग दिन

रत्नागिरी : हवेमार्फत प्रसार होणाऱ्या क्षयरोगाकडे दुर्लक्ष केल्यास तो रुग्णाला मृत्युच्या दाढेत ओढतोच, शिवाय इतरांनाही त्याचा संसर्ग होतो. हा रोग बरा होणारा असला तरी जिल्ह्यात वर्षभरात त्याचे २२४२ रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, २०१३पेक्षा सन २०१४ वर्षात रुग्णांची संख्या कमी आहे. गेल्या काही दिवसात क्षयरोगाने जिल्ह्यातून ‘एक्झिट’ घेण्याची तयारी चालवली आहे. रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने २४ मार्च १८८२ रोजी क्षयरोगाच्या जंतूचा शोध लावला. त्यामुळे क्षयरोगावर उपचार करणे शक्य झाले. त्याची आठवण म्हणून २४ मार्च १९९३ पासून जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केल्याप्रमाणे संपूर्ण जगभर २४ मार्च हा राष्ट्रीय जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येत आहे.क्षयरोगाचा प्रसार हवेमार्फत होतो. क्षयरोग झालेली व्यक्ती औषधे घेत नसेल तर खोकल्यातून, शिंकेतून अथवा थुंकीतून क्षयाचे जीवाणू ती इतर लोकांमध्ये पसरविते. शरीरातील कोणत्याही अवयवास क्षयरोग होऊ शकतो. इतर अवयवांच्या तुलनेत फुफ्फुसाला क्षयरोग होण्याचे प्रमाण सर्वात अधिक आहे. जिल्ह्यात रत्नागिरी, राजापूर, कामथे, दापोली, चिखली, देवरुख, कळंबणी आणि लांजा अशा ८ ठिकाणी क्षयरोग नियंत्रण पथके स्थापन करण्यात आली आहेत. जिल्हा क्षयरोग केंद्र, ३ उपजिल्हा रुग्णालये, ८ ग्रामीण रुग्णालये, ६७ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३७८ आरोग्य उपकेंद्र, २ नगर परिषद दवाखाने ही सर्व रुग्णालये डॉट्स उपचार केंद्र म्हणून आरोग्य विभागाकडून घोषित करण्यात आली आहेत. या डॉट्स उपचार केंद्रामार्फत प्रत्येक गावात डॉट्स प्रोव्हायडर नेमून त्यांच्यामार्फत क्षयरुग्णांना प्रत्यक्ष देखरेखीखाली आठवड्यातून तीन वेळा डॉट्स औषधोपचार मोफत देण्यात येतो. क्षयरोगावरील औषधे महागडी आहेत. रुग्णाने खासगी रुग्णालयामध्ये उपचार केल्यास त्याला ४ ते ५ हजार रुपये खर्च येतो. मात्र, शासकीय रुग्णालयांमध्ये क्षयरोगावर मोफत औषधोपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे बहुतांश रुग्ण या रोगावर शासकीय रुग्णालयात औषधोपचार घेत आहेत. जिल्ह्यात सन २०१३मध्ये २४११ क्षयरोग रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी उपचाराखाली १२१८ रुग्ण असून, ९३१ रुग्ण औषधोपचारानंतर पूर्ण बरे झाले होते, तर ६२ रुग्णांचा क्षयरोगाने मृत्यू झाला होता. सन २०१४ साली आढळलेल्या २२४२ क्षयरोगाच्या रुग्णांपैकी १२२८ रुग्णांवर औषधोपचार सुरू असून, ९७५ बरे झाले आहेत. या रोगाने मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ५० आहे. मात्र, या रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट झालेली दिसून येत आहे. नियमित औषधोपचार न घेणाऱ्या, व्यसनाधिनता आणि शेवटच्या क्षणी औषधोपचार घेणाऱ्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, क्षयरोगावर वेळीच औषधोपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होतो, असे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. (शहर वार्ताहर)