शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

Ramdas Kadam: 'आता शिवसेना भवनचे दरवाजे सताड उघडे, नेतेपदाची खिरापत वाटणं सुरुंय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 20:21 IST

आपल्या जामगे येथील निवासस्थानी आलेल्या रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली.

हर्षल शिरोडकर

खेड : आता शिवसेना भवनचे दरवाजे सताड उघडे असतात. कोणीही या. कोण नेता, कोण उपनेता अशी खिरापत वाटणे सध्या सुरू आहे. आमदार, खासदार, मंत्र्यांना जर आधीच भेटला असतात, तर ही वेळ आली नसती. केवळ बाळासाहेबांचा मुलगा म्हणून लोकांना किती वर्षे तुम्ही ब्लॅकमेल करणार आहात, असा सणसणीत प्रश्न माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला आहे.

आपल्या जामगे येथील निवासस्थानी आलेल्या रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात उद्धव ठाकरे मंत्रालयात फक्त तीनवेळा आले. कोकणावर वादळाचे, महापुराचे संकट आले. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार चार दिवस कोकणात येऊन बसले. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले नाहीत आणि आता बापबेटे बाहेर पडले आहेत. आता शिवसेना भवनाचे दरवाजे सताड उघडले आहेत. या कोणीही. बसा. भेटा, असे सुरू आहे. हे आधीच झाले असते तर ही वेळ आली नसती, असे कदम म्हणाले.राष्ट्रवादीच्या लोकांना पैसे देऊन अजितदादा पवार यांनी शिवसेनेच्या आमदारांना संपवण्याची संधी घेतली. आमदारांचे म्हणणे ऐकून थोडे जरी लक्ष उद्धव ठाकरे यांनी घातले असते तर ही वेळ आली नसती, असेही ते स्पष्टपणे म्हणाले.

पवार यांच्या मांडीवर

बाळासाहेबांचा मुलगा म्हणून लोकांना किती वर्षे ब्लॅकमेल करणार, असा थेट प्रश्नही कदम यांनी यावेळी केला. बाळासाहेबांच्या विचारांशी तुम्ही सहमत होतात का? त्यांचे विचार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात होते. मग शरद पवार यांच्या मांडीवर बसताना बाळासाहेबांची आठवण झाली का? का विसर पडला? या साऱ्याची उत्तरे उद्धव ठाकरे यांना द्यावी लागतील, असेही ते म्हणाले. त्यांनी भावनात्मक डायलॉगबाजी थांबवावी, असा टोलाही त्यांनी हाणला.

मीही दौरा करेन

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. त्यांना जाऊ दे ना. त्यांच्यापाठोपाठ मीही महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. वास्तव लोकांसमोर ठेवणार आहे. ५२ वर्षे पक्ष उभा करण्यासाठी काम केले आहे. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मुख्यमंत्रीपद मिळाले. आदित्य ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांचा मुलगा म्हणून मंत्रिपद मिळाले. पण पक्ष आम्ही वाढवलाय, हे लोकांना सांगू असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमRatnagiriरत्नागिरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbaiमुंबई