शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

Ramdas Kadam: 'आता शिवसेना भवनचे दरवाजे सताड उघडे, नेतेपदाची खिरापत वाटणं सुरुंय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 20:21 IST

आपल्या जामगे येथील निवासस्थानी आलेल्या रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली.

हर्षल शिरोडकर

खेड : आता शिवसेना भवनचे दरवाजे सताड उघडे असतात. कोणीही या. कोण नेता, कोण उपनेता अशी खिरापत वाटणे सध्या सुरू आहे. आमदार, खासदार, मंत्र्यांना जर आधीच भेटला असतात, तर ही वेळ आली नसती. केवळ बाळासाहेबांचा मुलगा म्हणून लोकांना किती वर्षे तुम्ही ब्लॅकमेल करणार आहात, असा सणसणीत प्रश्न माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला आहे.

आपल्या जामगे येथील निवासस्थानी आलेल्या रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात उद्धव ठाकरे मंत्रालयात फक्त तीनवेळा आले. कोकणावर वादळाचे, महापुराचे संकट आले. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार चार दिवस कोकणात येऊन बसले. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले नाहीत आणि आता बापबेटे बाहेर पडले आहेत. आता शिवसेना भवनाचे दरवाजे सताड उघडले आहेत. या कोणीही. बसा. भेटा, असे सुरू आहे. हे आधीच झाले असते तर ही वेळ आली नसती, असे कदम म्हणाले.राष्ट्रवादीच्या लोकांना पैसे देऊन अजितदादा पवार यांनी शिवसेनेच्या आमदारांना संपवण्याची संधी घेतली. आमदारांचे म्हणणे ऐकून थोडे जरी लक्ष उद्धव ठाकरे यांनी घातले असते तर ही वेळ आली नसती, असेही ते स्पष्टपणे म्हणाले.

पवार यांच्या मांडीवर

बाळासाहेबांचा मुलगा म्हणून लोकांना किती वर्षे ब्लॅकमेल करणार, असा थेट प्रश्नही कदम यांनी यावेळी केला. बाळासाहेबांच्या विचारांशी तुम्ही सहमत होतात का? त्यांचे विचार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात होते. मग शरद पवार यांच्या मांडीवर बसताना बाळासाहेबांची आठवण झाली का? का विसर पडला? या साऱ्याची उत्तरे उद्धव ठाकरे यांना द्यावी लागतील, असेही ते म्हणाले. त्यांनी भावनात्मक डायलॉगबाजी थांबवावी, असा टोलाही त्यांनी हाणला.

मीही दौरा करेन

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. त्यांना जाऊ दे ना. त्यांच्यापाठोपाठ मीही महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. वास्तव लोकांसमोर ठेवणार आहे. ५२ वर्षे पक्ष उभा करण्यासाठी काम केले आहे. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मुख्यमंत्रीपद मिळाले. आदित्य ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांचा मुलगा म्हणून मंत्रिपद मिळाले. पण पक्ष आम्ही वाढवलाय, हे लोकांना सांगू असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमRatnagiriरत्नागिरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbaiमुंबई