शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

पर्यटनवृध्दीसाठी रत्नागिरीला नवा लूक : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 8:30 PM

Thiba Palace Tourisam Ratnagiri- पर्यटनाच्या दृष्टीने रत्नागिरी शहर राज्यातील नामवंत शहर व्हावे, यासाठी . जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या माध्यमातून हा बदल केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक निधी विविध खात्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देथिबा राजवाड्यात जे. जे. स्कूल ऑफ आर्ट म्युझियम मारुती मंदिर सर्कल सुशोभिकरणासाठी १ कोटी रूपयांचा निधी मंजूर

रत्नागिरी : पर्यटनाच्या दृष्टीने रत्नागिरी शहर राज्यातील नामवंत शहर व्हावे, यासाठी शहराला नवा लूक देण्याचा प्रयत्न असून, साळवी स्टॉप ते मांडवी व शहरांतर्गत असलेले चौक वेगळ्या पद्धतीने विकसित करण्याचा मानस आहे.

जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या माध्यमातून हा बदल केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक निधी विविध खात्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे तज्ज्ञ प्राध्यापक रत्नागिरीत दाखल झाले होते. त्यांनी थिबा राजवाड्याची पाहणी केली. थिबा राजवाड्यात जे. जे. स्कूल ऑफ आर्ट म्युझियम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्याचा पाठपुरावा करण्यासाठी पुन्हा जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे तज्ज्ञ प्राध्यापक रत्नागिरी शहरात आले आहेत. त्यांनी थिबा राजवाड्यासह शहरातील मुख्य चौकात मारुती मंदिर सर्कल, श्यामराव पेजे पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सावरकर चौक, मांडवी जेटी आदींची पाहणी केली.मारुती मंदिर सर्कल सुशोभिकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. चौकांच्या सुशोभिकरणासाठी पर्यटन, जिल्हा नियोजन त्या माध्यमातून निधी उपलब्ध करून कामाला सुरुवात केली जाणार आहे.

टाकाऊपासून कायमस्वरूपी रेखीव काम जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी शहरात करणार आहेत. या सर्वांच्या माध्यमातून शहराला नवा लूक दिला जाणार आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नाविन्यपूर्ण शहर होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

थिबा राजवाडा जतन, संवर्धनाचे काम थांबले आहे. पुरातत्त्व विभागातर्फे या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पाठपुरावा करण्याची सूचना मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.वैयक्तिक कारणराज्यातील लोणेरे, जळगाव येथील दोन विद्यापीठाच्या कुलगुरूंनी राजीनामा त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे दिला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेले वर्षभर ते राजीनामा देण्याच्या तयारीत होते. राजकीय हस्तक्षेपामुळे कुलगुरूंनी राजीनामा दिला हे आरोप चुकीचे व खोडसाळ आहे. त्यावरून राजकारण करणे चुकीचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Thiba Palaceथिबा पॅलेसRatnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतtourismपर्यटन