शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

बायोगॅस प्रकल्पाचा नवा फासा

By admin | Updated: May 14, 2016 23:45 IST

रत्नागिरी नगर परिषद : चार महिन्यांपूर्वीच्या घोषणेचे झाले काय?

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरीरत्नागिरी शहरात घनकचरा प्रकल्पाचे तीनतेरा वाजल्यानंतर कचरा समस्येला बायोगॅस प्रकल्पाचा उतारा देण्याची घोषणा जानेवारी २०१६ मध्ये करण्यात आली. या प्रकल्पाचे पुढे काय झाले याचा जनतेला काहीही मागमूस नाही. त्यामुळे कारभाऱ्यांनी पुन्हा एकदा बायोगॅस प्रकल्पाचा नवा ‘फासा’ टाकला आहे की काय, रत्नागिरीकरांना स्वप्न दाखवली जात आहेत काय, या चर्चेला उधाण आले आहे. घनकचरा प्रकल्पाबाबत पालिकेचे नेमके काय नियोजन आहे, त्याचा जाहीर खुलासा करण्याची मागणीही होत आहे. रत्नागिरी शहरातील प्रत्येक अपार्टमेंटच्या आवारात कचऱ्यावर प्रक्रिया करणारे यंत्र बसविण्याची सक्ती करून तेथील कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करण्याचे स्वप्न कारभाऱ्यांनी आधी दाखविले. त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. हा विषय आता कारभाऱ्यांच्याही विस्मरणात गेला असल्याची स्थिती आहे. रत्नागिरीकरही ही घोषणा विसरून गेले असावेत. त्यानंतर शहरातील प्रत्येक प्रभागात ५ ते ७ गुंठे जागेत छोट्या स्वरुपातील ७ घनकचरा प्रकल्प उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. त्याची पाहणीही करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकल्पांमुळे शहरातील ५० टक्के कचऱ्यावर प्रक्रिया होईल व ५० टक्के कचऱ्यावर दांडेआडोम येथील प्रकल्पात प्रक्रिया केली जाईल, असेही सांगण्यात आले. दांडेआडोम प्रकल्प बारगळला. परंतु, प्रत्येक प्रभागात घनकचरा प्रकल्प उभारण्याच्या घोषणेचा मागमूस नाही. कचरा समस्या त्यानंतरही ‘जैसे थे’ आहे. केवळ साळवी स्टॉप ऐवजी कोकणनगर एवढाच कचऱ्याचा प्रवास झाला आहे. घनकचरा प्रकल्पात प्रक्रिया होण्यापर्यंतचा हा प्रवास कधी होणार? असा सवाल यामुळे निर्माण झाला आहे. कचरा समस्या सोडविण्यासाठी अशा घोषणांमागे घोषणा झाल्यानंतर जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाबाबत बायोगॅसचा उतारा देण्यात आला. या नव्या प्रस्तावानुसार उभारण्याची घोषणा झालेल्या प्रकल्पाकरिता ५ गुंठे जागा पालिका क्षेत्रातच घेतली जाईल व तेथे दररोज संकलित होणाऱ्या २२ टन कचऱ्यापैकी ५ टन कचऱ्यापासून बायोगॅस व त्यातून वीज निर्मिती करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. या घोषणेलाही आता ४ महिने उलटून गेले आहेत. त्याचा प्रस्ताव तयार झाला काय, याबाबत कसलीही वाच्यता करण्यात आलेली नाही. त्यामुळे घनकचऱ्याबाबत पालिकेची ही आणखी एक नवीन घोषणा हवेत विरली का, अशी चर्चा सुरू आहे. पालिकेची बायोगॅस प्रकल्पाबाबतची विचाराधीन योजना नक्कीच चांगली आहे. दररोज संकलित होणाऱ्या कचऱ्यातून ओला कचरा वेगळा करून तो बायोगॅस प्रकल्पासाठी वापरण्याची संकल्पना आहे. त्यातून विजेची निर्मितीही होईल. परंतु, रत्नागिरीच्या कारभाऱ्यांना झालेय तरी काय? कचऱ्याची समस्या गेल्या १५ वर्षात का सुटली नाही. आश्वासनांचे बुडबुडे किती दिवस फोडणार, असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे. निवडणुकीची तयारी : घनकचरा प्रकल्पाचे गांभीर्य आहे कुणाला?पुरे झाली आश्वासने, आता घनकचरा किंवा बायोगॅस प्रकल्प राबवावा, कचऱ्याची समस्या काही प्रमाणात तरी मिटेल, असे काम करावे, ही नागरिकांची अपेक्षा आहे. निवडणुका आल्या की, घोषणा देण्यासाठी तोंडी लावण्यापुरते या प्रकल्पांबाबत बोलू नका तर प्रामाणिकपणे काम करा, अशी शहरवासीयांची भूमिका चर्चेतून पुढे येत आहे. मात्र, कारभारी, राजकारणी येत्या नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मश्गुल आहेत. आतापासूनच प्रचार सुरू झाला आहे. गटारे दुरुस्ती, रस्त्यांचे डांबरीकरण करून नागरिकांना खूश करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, महत्वाच्या घनकचरा प्रकल्पाचे गांभीर्य कुणालाही नाही, अशी टीका शहरातून होत आहे. कचरा जाळा आवारातच...शहरातील कचरा नागरिकांना त्यांच्याच घराच्या आवारात वा अपार्टमेंटच्या आवारात जाळून नष्ट करण्याची अटही भविष्यात घालावी लागण्याची शक्यता आहे. कचरा सर्वांकडेच जमा होतो, त्याची जबाबदारी नागरिकांनीही उचलायला हवी, असे मतही व्यक्त होत आहे.