शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

नाणारचा राजकीय आखाडा भाजप एकाकी पडणार? भाजपला घेरण्याची रणनीती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 21:06 IST

रत्नागिरी : नाणारच्या रिफायनरी प्रकल्पाचे भारतीय जनता पक्षाकडून जोरदार समर्थन केले जात असताना प्रकल्प विरोधकही खूपच आक्रमक झाले आहेत.

ठळक मुद्दे २३ एप्रिलला सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे नाणारला येणार. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार १० मे रोजी नाणार दौऱ्यावर. २० एप्रिलला कॉँग्रेस खासदारांचे शिष्टमंडळ-प्रकल्पग्रस्त भेट. मनसे प्रकल्पविरोधात राज्यभरात आंदोलन करण्याच्या तयारीत.

रत्नागिरी : नाणारच्या रिफायनरी प्रकल्पाचे भारतीय जनता पक्षाकडून जोरदार समर्थन केले जात असताना प्रकल्प विरोधकही खूपच आक्रमक झाले आहेत. भाजपला नाणार मुद्द्यावरून घेरण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना, कॉँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी बाह्या सरसावल्या आहेत. त्यामुळे नाणार प्रकल्प  राजकीय आखाडा बनला आहे. 

राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने नाणार प्रकल्पाची अधिसूचना  काढली. मंत्रिमंडळ बैठकीत सेनेची नाणार प्रकल्पाच्या समर्थनाची भूमिका व प्रकल्प होत असलेल्या ठिकाणी प्रकल्प विरोधाची भूमिका ही दुहेरी राजनीती खूपच चर्चेची ठरली. मात्र, त्यानंतर स्थानिकांच्या विरोधाची धार अधिकच वाढल्याने शिवसेनेनेही या प्रकल्पाला विरोध सुरू केला. 

सेनेच्या या प्रकल्पविरोधी भूमिकेनंतरही संघर्ष समितीने प्रकल्प रद्द होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. यापैकी कॉँग्रेस व मनसेने प्रकल्पविरोधात स्थानिकांबरोबर समितीच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. नाणार या प्रकल्प होऊ घातलेल्या ठिकाणी लवकरच कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह अन्य खासदार भेट देऊन स्थानिकांची मते जाणून घेणार आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार १० मे रोजी प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी येऊन स्थानिक शेतकरी, मच्छीमार यांची बाजू ऐकून घेणार आहेत. नंतरच आपली भूमिका स्पष्ट करू, असे संघर्ष समितीचे नेते अशोक वालम यांना पवार यांनी सांगितले आहे. येत्या २३ एप्रिल रोजी सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचाही नाणार दौरा होणार आहे. 

नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणारा भाजप या संपूर्ण आखाड्यात एकाकी पडल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. प्रकल्पाला विरोध असतानाही केंद्र सरकारने सौदी अरेबियाच्या अरामको कंपनीशी सामंजस्य करार करून प्रकल्प उभारणीसाठी पहिले पाऊल उचलले आहे. या राजकीय आखाड्यात येत्या काही दिवसात नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

राज्यातच हा मोठा प्रकल्प व्हावा

तब्बल तीन लाख कोटींची गुंतवणूक असलेला रिफायनरी प्रकल्प राज्यातून बाहेर जाऊ नये. नाणारवासीयांचा विरोध असेल तर राज्यातच पर्यायी जागेची चाचपणी करता येईल काय, याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार केंद्र व राज्य सरकारशी चर्चा करणार आहेत. राज्यातच हा मोठा प्रकल्प व्हावा, अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस