शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

नाणारचा राजकीय आखाडा भाजप एकाकी पडणार? भाजपला घेरण्याची रणनीती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 21:06 IST

रत्नागिरी : नाणारच्या रिफायनरी प्रकल्पाचे भारतीय जनता पक्षाकडून जोरदार समर्थन केले जात असताना प्रकल्प विरोधकही खूपच आक्रमक झाले आहेत.

ठळक मुद्दे २३ एप्रिलला सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे नाणारला येणार. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार १० मे रोजी नाणार दौऱ्यावर. २० एप्रिलला कॉँग्रेस खासदारांचे शिष्टमंडळ-प्रकल्पग्रस्त भेट. मनसे प्रकल्पविरोधात राज्यभरात आंदोलन करण्याच्या तयारीत.

रत्नागिरी : नाणारच्या रिफायनरी प्रकल्पाचे भारतीय जनता पक्षाकडून जोरदार समर्थन केले जात असताना प्रकल्प विरोधकही खूपच आक्रमक झाले आहेत. भाजपला नाणार मुद्द्यावरून घेरण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना, कॉँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी बाह्या सरसावल्या आहेत. त्यामुळे नाणार प्रकल्प  राजकीय आखाडा बनला आहे. 

राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपने नाणार प्रकल्पाची अधिसूचना  काढली. मंत्रिमंडळ बैठकीत सेनेची नाणार प्रकल्पाच्या समर्थनाची भूमिका व प्रकल्प होत असलेल्या ठिकाणी प्रकल्प विरोधाची भूमिका ही दुहेरी राजनीती खूपच चर्चेची ठरली. मात्र, त्यानंतर स्थानिकांच्या विरोधाची धार अधिकच वाढल्याने शिवसेनेनेही या प्रकल्पाला विरोध सुरू केला. 

सेनेच्या या प्रकल्पविरोधी भूमिकेनंतरही संघर्ष समितीने प्रकल्प रद्द होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. यापैकी कॉँग्रेस व मनसेने प्रकल्पविरोधात स्थानिकांबरोबर समितीच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. नाणार या प्रकल्प होऊ घातलेल्या ठिकाणी लवकरच कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह अन्य खासदार भेट देऊन स्थानिकांची मते जाणून घेणार आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार १० मे रोजी प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी येऊन स्थानिक शेतकरी, मच्छीमार यांची बाजू ऐकून घेणार आहेत. नंतरच आपली भूमिका स्पष्ट करू, असे संघर्ष समितीचे नेते अशोक वालम यांना पवार यांनी सांगितले आहे. येत्या २३ एप्रिल रोजी सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचाही नाणार दौरा होणार आहे. 

नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणारा भाजप या संपूर्ण आखाड्यात एकाकी पडल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे. प्रकल्पाला विरोध असतानाही केंद्र सरकारने सौदी अरेबियाच्या अरामको कंपनीशी सामंजस्य करार करून प्रकल्प उभारणीसाठी पहिले पाऊल उचलले आहे. या राजकीय आखाड्यात येत्या काही दिवसात नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

राज्यातच हा मोठा प्रकल्प व्हावा

तब्बल तीन लाख कोटींची गुंतवणूक असलेला रिफायनरी प्रकल्प राज्यातून बाहेर जाऊ नये. नाणारवासीयांचा विरोध असेल तर राज्यातच पर्यायी जागेची चाचपणी करता येईल काय, याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार केंद्र व राज्य सरकारशी चर्चा करणार आहेत. राज्यातच हा मोठा प्रकल्प व्हावा, अशी इच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस