शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

‘घर तेथे नॅडेप-कंपोस्ट’ युनिट; महाराष्ट्राच्या पहिल्या सेंद्रिय गावाने केली घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 11:52 IST

यशकथा : आता ग्रामसभेत ठराव करून ‘घर तेथे नॅडेप-कंपोस्ट’ युनिट बसविण्यात येणार आहे.

- मेहरून नाकाडे (रत्नागिरी)

कोणतीही रासायनिक खते, किंवा कीटकनाशकांचा वापर न करता शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या खानू गावाला महाराष्ट्रातील पहिले सेंद्रिय गाव म्हणून २०१६-१७ मध्ये गौरविण्यात आले. गावामध्ये घर तेथे शोषखड्डा असून गावाने तयार केलेल्या शोषखड्ड्याचे मॉडेल जिल्हा व जिल्हाबाहेरील गावागावातून वापरण्यात येत आहे. आता ग्रामसभेत ठराव करून ‘घर तेथे नॅडेप-कंपोस्ट’ युनिट बसविण्यात येणार आहे.

गावामध्ये २८ बचतगट आहेत. या बचतगटांची विविध उत्पादने आहेत. मात्र, ‘खानू खजाना’ या एकाच ब्रँडनेमने त्याची विक्री सुरू आहे, हे विशेष! गावातील शंभर एकर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली. लाल, काळ्या भाताचे बियाणेही तयार करून विक्री करण्यात येते. लाल तांदळामध्ये सोनफळ, मूडगा, तूर्ये, सरवट या प्राचीन लुप्त होत चाललेल्या वाणांचे जतन करण्यात आले. काळ्या तांदळात गोविंद भोग व काळबायो (स्थानिक वाण) लावण्यात येत आहे. यापुढे सेंद्रिय खतासाठी गावाबाहेर जाण्याची गरज भासणार नाही. खानू गावात ४३५ घरे असून, घरोघरी शोषखड्डा बनविण्यात आला.

यावर्षी ‘घर तेथे नॅडेप-कंपोस्ट’ युनिट बसविण्यात येणार आहे. महात्मा गांधी रोजगार हमी ग्रामीण योजनेंतर्गत कंपोस्टचे शंभर टक्के प्रस्ताव तयार करण्यात आले असून, ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून संमत करण्यात आला. घराशेजारी किंवा शेतात ग्रामस्थांनी कंपोस्ट युनिट बांधण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना सेंद्रिय खतासाठी दुसरीकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. घरातील ओला, सुका कचरा, परसदारातील पालापाचोळ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाणार आहे. त्यासाठी इको फ्रेंडली फार्मस गटाचे प्रमुख व शेतीतज्ज्ञ संदीप कांबळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

गावामध्ये जैवविविधता समिती असून, वृक्षतोडीसाठी शंभर टक्के बंदी आहे. गावचे सरपंच, उपसरपंच याबरोबर सर्व ग्रामस्थांची एकजूट हेच गावच्या विकासाचे द्योतक म्हणावे लागेल. खानू गावचे क्षेत्र ९९९.९१.५९ हेक्टर असून, लोकसंख्या १८६६ आहे. पुरुष संख्या ९०२ ते ९६४ स्त्रियांची संख्या आहे. मुख्य पीक काजू, आंबा, भात, नागली, नारळ आहे. गावामध्ये ५११ गाई असून ६४ म्हशी आहेत. गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतर्फे रासायनिक खते, कीटकनाशके विक्री शंभर टक्के बंद असून शेतकरी बाहेरूनही रासायनिक खते, कीटकनाशके खरेदी करीत नाहीत. फळबाग लागवड योजनेंतर्गत २०१७-१८ मध्ये गावात ५० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. त्यासाठी ५० लाख १३ हजार ४५५ खर्च झाला. कृषी अधिकारी टी.एन. शिगवण यांचे सहकार्य लाभले. खानूत एकही क्षयरुग्ण, कुष्ठरोग रुग्ण नाही. खानू प्रा.आ. केंद्राला राज्य शासनाचा जिल्हास्तरीय ‘कायाकल्प’ पुरस्कार जाहीर झाला, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. एस.एस. रेवंडेकर यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी