शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

‘घर तेथे नॅडेप-कंपोस्ट’ युनिट; महाराष्ट्राच्या पहिल्या सेंद्रिय गावाने केली घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 11:52 IST

यशकथा : आता ग्रामसभेत ठराव करून ‘घर तेथे नॅडेप-कंपोस्ट’ युनिट बसविण्यात येणार आहे.

- मेहरून नाकाडे (रत्नागिरी)

कोणतीही रासायनिक खते, किंवा कीटकनाशकांचा वापर न करता शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या खानू गावाला महाराष्ट्रातील पहिले सेंद्रिय गाव म्हणून २०१६-१७ मध्ये गौरविण्यात आले. गावामध्ये घर तेथे शोषखड्डा असून गावाने तयार केलेल्या शोषखड्ड्याचे मॉडेल जिल्हा व जिल्हाबाहेरील गावागावातून वापरण्यात येत आहे. आता ग्रामसभेत ठराव करून ‘घर तेथे नॅडेप-कंपोस्ट’ युनिट बसविण्यात येणार आहे.

गावामध्ये २८ बचतगट आहेत. या बचतगटांची विविध उत्पादने आहेत. मात्र, ‘खानू खजाना’ या एकाच ब्रँडनेमने त्याची विक्री सुरू आहे, हे विशेष! गावातील शंभर एकर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली. लाल, काळ्या भाताचे बियाणेही तयार करून विक्री करण्यात येते. लाल तांदळामध्ये सोनफळ, मूडगा, तूर्ये, सरवट या प्राचीन लुप्त होत चाललेल्या वाणांचे जतन करण्यात आले. काळ्या तांदळात गोविंद भोग व काळबायो (स्थानिक वाण) लावण्यात येत आहे. यापुढे सेंद्रिय खतासाठी गावाबाहेर जाण्याची गरज भासणार नाही. खानू गावात ४३५ घरे असून, घरोघरी शोषखड्डा बनविण्यात आला.

यावर्षी ‘घर तेथे नॅडेप-कंपोस्ट’ युनिट बसविण्यात येणार आहे. महात्मा गांधी रोजगार हमी ग्रामीण योजनेंतर्गत कंपोस्टचे शंभर टक्के प्रस्ताव तयार करण्यात आले असून, ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून संमत करण्यात आला. घराशेजारी किंवा शेतात ग्रामस्थांनी कंपोस्ट युनिट बांधण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना सेंद्रिय खतासाठी दुसरीकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. घरातील ओला, सुका कचरा, परसदारातील पालापाचोळ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जाणार आहे. त्यासाठी इको फ्रेंडली फार्मस गटाचे प्रमुख व शेतीतज्ज्ञ संदीप कांबळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

गावामध्ये जैवविविधता समिती असून, वृक्षतोडीसाठी शंभर टक्के बंदी आहे. गावचे सरपंच, उपसरपंच याबरोबर सर्व ग्रामस्थांची एकजूट हेच गावच्या विकासाचे द्योतक म्हणावे लागेल. खानू गावचे क्षेत्र ९९९.९१.५९ हेक्टर असून, लोकसंख्या १८६६ आहे. पुरुष संख्या ९०२ ते ९६४ स्त्रियांची संख्या आहे. मुख्य पीक काजू, आंबा, भात, नागली, नारळ आहे. गावामध्ये ५११ गाई असून ६४ म्हशी आहेत. गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतर्फे रासायनिक खते, कीटकनाशके विक्री शंभर टक्के बंद असून शेतकरी बाहेरूनही रासायनिक खते, कीटकनाशके खरेदी करीत नाहीत. फळबाग लागवड योजनेंतर्गत २०१७-१८ मध्ये गावात ५० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. त्यासाठी ५० लाख १३ हजार ४५५ खर्च झाला. कृषी अधिकारी टी.एन. शिगवण यांचे सहकार्य लाभले. खानूत एकही क्षयरुग्ण, कुष्ठरोग रुग्ण नाही. खानू प्रा.आ. केंद्राला राज्य शासनाचा जिल्हास्तरीय ‘कायाकल्प’ पुरस्कार जाहीर झाला, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. एस.एस. रेवंडेकर यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी