शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
4
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
5
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
6
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
7
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
8
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
9
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
10
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
11
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
12
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
13
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
14
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
15
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
16
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
17
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
18
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
19
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
20
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग

Ratnagiri News: नाम फाउंडेशनतर्फे ‘वाशिष्ठी’त गाळ उपशाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 18:15 IST

दुसऱ्या टप्प्यातील गाळ उपसा धीम्या गतीने

चिपळूण : पूरमुक्त चिपळूण शहरासाठी पुढाकार घेतलेल्या नाम फाउंडेशनने वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा कामाला सुरुवात केली आहे. या कामाचा शुभारंभ नामचे मल्हार पाटेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रशासन, जलसंपदा विभाग, चिपळूण बचाव समिती आणि जनता या सर्वांच्या सहयोगातून पहिल्या टप्प्यातील गाळ उपशाचे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण करू, असा विश्वास नाम फाउंडेशनचे विश्वस्त मल्हार पाटेकर यांनी व्यक्त केला.दुसऱ्या टप्प्यातील गाळ उपसा धीम्या गतीने सुरू असल्याने राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मुंबईत बैठक घेतली हाेती. या बैठकीत वाशिष्ठी नदीतील पहिल्या टप्प्यातील शिल्लक सर्व गाळ काढण्याची जबाबदारी नाम फाउंडेशनवर सोपविण्यात आली.प्रशासनाकडून आपल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळताच नाम फाउंडेशनने लाँग रिच बूम मशीनसह पाच पोकलेन व पाच डंपर चिपळुणात पाठविले. नाम फाउंडेशन व जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या या मोहिमेचा शुभारंभ पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला.शहरातील बाजारपूल परिसरातील गणेश विसर्जन घाट येथे गाळ उपसा कामाचा श्रीफळ वाढवण्यात आला. गाळ उपसा कामात कोणतीही अडचण अथवा समस्या निर्माण झाल्यास आवाज द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि कायम सोबत राहू, अशी ग्वाही बचाव समितीचे बापू काणे यांनी दिली. त्यानंतर जुवाड-उक्ताड बेट, गोवळकोट धक्का या भागातही गाळ उपसा कामाची सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर पाटेकर यांनी गाळ उपसा करणाऱ्या ठिकाणांची व कामाची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार, चिपळूण बचाव समितीचे अरुण भोजने, किशोर रेडीज, राजेश वाजे, उदय ओतारी, शाहनवाज शाह, नाम फाउंडेशनचे कोकण समन्वयक समीर जानवलकर, चिपळूण समन्वयक महेंद्र कासेकर, मंदार चिपळूणकर, छाया सकपाळ, पंचायत समिती सदस्य पूजा निकम, जफर कटमाले, पृथ्वी पवार, सचिन साडविलकर व अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीriverनदी