शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

एक संग्रहालय.. कलेचं, हौसेचं अन् जिद्दीचं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 13:06 IST

मनात जिद्द असेल आणि काहीतरी नवीन करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते.

अरुण आडिवरेकर 

रत्नागिरी : मनात जिद्द असेल आणि काहीतरी नवीन करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आपल्या घराचे आणि आपल्या माणसांचे नाव मोठे करण्याची तळमळच आपल्याला काहीतरी नवीन करण्याची ऊर्जा देते. आपल्या हौसेला मिळालेली जिद्दीची साथ या जोरावरच सोगमवाडी (ता. राजापूर)सारख्या दुर्गम गावात कला, वस्तू आणि काष्ठशिल्पांचे संग्रहालय उभे राहिले आहे. 

 

राजापूर तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा सोगमवाडी गावात १८९० साली बांधण्यात आलेला एक बंगला आहे. हा बंगला म्हणजे त्याकाळचा वकील बंगला, बाग बंगला किंवा सावकाराचा बंगला होय. या बंगल्याची रचना पाहिली तर ब्रिटीशकालीन बांधकाम आजही तग धरून असल्याचे दिसून येईल. याच बंगल्याच्या दिवाणखान्यात बबन नारकर यांनी हे संग्रहालय उभारले आहे. 

 

घरात असलेल्या वडिलोपार्जित वस्तूंचे जतन झाले पाहिजे, असे त्यांनी मनाशी ठरविले. पणजोबांपासून असलेली तांबे, पितळेची भांडी त्यांनी जपून ठेवली. पण केवळ ही जपून न ठेवता कालबाह्य झालेली आणि आज दृष्टीस न पडणारी ही भांडी इतरांनाही पाहता यावीत, त्याची माहिती त्यांना मिळावी यासाठी त्यांची धडपड सुरू होती. त्यासाठी काही करता येईल का, असा विचार त्यांच्या मनात येताच पुणे येथील एका अशाच पुरातन वस्तूंच्या संग्रहालयाची माहिती त्यांना मिळाली. याच संग्रहालयापासून प्रेरणा घेऊन त्यांनी आपला हा पुरातन बंगला संग्रहालय म्हणून नावारूपाला आणण्याचा निश्चय केला. अनेक ठिकाणी संग्रहालयांमध्ये वस्तूंपेक्षा त्यांचे काठ किंवा एखादा अवशेषच शिल्लक आहे. पण बबन नारकर यांच्या या संग्रहालयात पूर्ण भांडी असल्याचे पाहायला मिळते. या संग्रहालयात पणजोबांच्या पायातील खडाव्यापासून दळणाचं जातं, पाणी तापविण्याचं तपेलं, बुंदी काढण्याचा झारा, पाटा - वरवंटा, शेवया करावयाचा लाकडी साच्या, काटवट, व्यायामासाठी वापरण्यात येणारी लाकडी मगदूल जोडी, मोदक तयार करण्याचे भगून, पितळेची किसनी अशा नाना तºहेच्या वस्तू आहेत.

 

जे काही करायचं ते जुन्याला धरूनच करायचं, या उद्देशाने त्यांनी पुरातन वस्तूंबरोबरच काष्ठशिल्पाची निर्मिती केली आहे. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करून त्यांनी या वस्तू जतन केल्या आहेत. अगदी चुलीसाठी जळावू म्हणून वापरण्यात येणाºया लाकडांचाही त्यात समावेश आहे. करवंटीपासून गणेशमूर्ती त्याचबरोबर सोडणे, बांबूमूळ, नारळ, शिंपले, झाडांची पाळे, फांद्या, खोड, बांद बांडगूळ यापासून प्राणी, पक्षी, सर्प, मासे, खेकडे, झिंगे, तलवारी, कासवे त्यांनी तयार केली आहेत.

 

याचबरोबरच त्यांच्या या संग्रहालयात जुने ग्रंथ आणि कायदा पुस्तकांचाही समावेश आहे. ‘शेगावचे गजानन महाराज, योगविशिष्ठी, रामायण, महाभारत, हरी विजय’ यासारखे ग्रंथ याठिकाणी पाहायला मिळतात. हे ग्रंथ चित्र स्वरूपात असल्याचे बबन नारकर सांगतात. एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा दिली तर ती शिक्षा कोणत्या स्वरूपाची आहे, हे दर्शविणारी चित्रे यामध्ये आहेत. 

 

रिटायर व्हायचं नाही

आयुष्यात कधीच रिटायर व्हायचं नाही, असे मी ठरवले होते. त्यामुळेच ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’ या कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. आपल्या आजूबाजूला भरपूर काही आहे, फक्त त्याकडे पाहण्याची दृष्टी हवी. निसर्गात ५० ते ८० टक्के काष्ठशिल्प असतात. फक्त आपण त्याकडे बारकाईने पाहून त्याला योग्य तो आकार दिला पाहिजे. जुन्या वस्तूंचे मोल न कळल्यामुळेच त्या कालबाह्य झाल्या आहेत. त्यांचे जतन करण्याची गरज आहे.

- बबन नारकर

 

ग्रंथ  संपदा

जुन्या ग्रंथांचाही ठेवा बबन नारकर यांनी जपून ठेवला आहे.  ग्रंथांमध्ये मोडीमधील हिशोबाची नोंदवही आहे. या ग्रंथांच्या छपाईच्या अगोदर २ रूपये, ३ रूपये, ५ रूपये आगाऊ  दिले जात होते. त्याचा उल्लेखही या ग्रंथांमध्ये करण्यात आला आहे. त्याकाळातील कायद्याची पुस्तकेही याठिकाणी असून, गुन्हे तेच पण गाव, नाव, वाडी, कायदे कलमे आता बदलली आहेत.

 

स्वातंत्र्याची बैठक याच घरात

ज्या दिवाणखान्यात हे संग्रहालय उभारण्यात आले आहे, त्याच दिवाणखान्यात ब्रिटीशांना एकजूट दाखविण्यासाठी दिनांक २६ जानेवारी १९४० रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त सभा आयोजित करण्यात आली होती. याबाबत कै. भानू परशुराम सोगम यांना दिनांक १९ जानेवारी १९४० रोजी पत्र आले होते. हे पत्र आजही पाहायला मिळते.

 

बाळासाहेबांचे पहिले सैनिक

बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेत त्यांनी काम केले आहे. १९६२पासून ते त्यांच्या प्रत्येक सभा, दौºयांमध्ये सोबत होते. अगदी सन १९९२पर्यंत ते बाळासाहेबांबरोबर होते. व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांची आणि बाळासाहेबांची ओळख झाली. बाळासाहेबांनी संघटना स्थापन केल्यानंतर ते त्याचे पहिले सैनिक होते.

 

बाग म्हणजे कृषी विद्यापीठच

याच बंगल्याच्या पाठीमागे बाग आहे. ही बाग म्हणजे त्यावेळचे कृषी विद्यापीठच होते. या बागेत पेरूची सर्व प्रकारची झाडे, जायफळाचे २०० फूट उंच झाड, मोसंबी, नारंगी, संत्रा, डाळिंब, म्हावळुंग, कॉफी, पोपनीस, लिंबू अशी झाडे होती. तर जाई, जुई, मोगरा, कृष्णकमळ, सोनचाफा, नागवेल, नागचाफा, सफेद चाफा, आंब्याची सर्व प्रकारची झाडे होती. याच बागेत ब्रिटीशकालीन तळे असून, त्याकाळी पिण्यासाठी त्याचे पाणी वापरले जात होते.

 

कसे जायचे?

याठिकाणी राजापूर आणि रत्नागिरीहून जाता येते. राजापूर जवाहर चौकातून धोपेश्वर गोवळ, शिवणे मार्गाने सोगमवाडीकडे जाता येते. तर रत्नागिरीहून जाताना सोलगाव तिठ्यावरून देवाचेगोठणे गावच्या आधी सोगमवाडीकडे जाण्यासाठी रस्ता आहे.