शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दापाेलीतील 'त्या' तीन वृध्द महिलांचा दागिन्यांसाठीच खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2022 4:58 PM

मृत तीन महिलांच्या अंगावरील १ लाख ६२ हजार १५० रुपये किंमतीचे साेन्याचे दागिने जबरीने चाेरून नेल्याचे पाेलीस तपासात समाेर आले आहे.

दापोली : तालुक्यातील वणौशी खोतवाडीत दोन सवती आणि अन्य एक महिला अशा तिघींचा संशयास्पद मृत्यू झाला. या तिघींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पार्वती परबत पाटणे (वय ९०), सत्यवती परबत पाटणे (८०) तसेच इंदुबाई शांताराम पाटणे (८०) अशी या तिघींची नावे आहेत. त्यांच्या गळ्यातील दीड लाखाचे दागिने गायब असल्याने दागिन्यांसाठीच या तिघींचा खून झाल्याचे पाेलीस तपासात निष्पन्न झाले आहे.दापाेली पाेलिसांनी याबाबत चाेरीचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तीन महिलांच्या अंगावरील १ लाख ६२ हजार १५० रुपये किंमतीचे साेन्याचे दागिने जबरीने चाेरून नेल्याचे पाेलीस तपासात समाेर आले आहे. सत्यवती पाटणे, पार्वती पाटणे व रुक्मिणी पाटणे यांच्या डाेक्यात प्रहार करुन नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा पाेलिसांना अंदाज आहे. या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पाेलीस अधिकारी शशिकिरण काशीद हे करत आहेत.पार्वती आणि सत्यवती या सवती होत्या. इंदुबाई या त्यांच्या जाऊ शेजारच्या घरात राहत होत्या. या तिन्ही वयोवृद्ध महिला रात्री नेहमी एकत्र झोपत असत. नेहमीप्रमाणे त्या गुरुवारी एकत्र झोपल्या. परंतु सकाळी हा दुर्दैवी प्रकार उघड झाला. हा प्रकार नेमका रात्री घडला की, सकाळी घडला, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पार्वती व सत्यवती या दोघींनाही मूलबाळ नसल्याने त्यांचा पुतण्या त्यांचा सांभाळ करत होता. शेजारीच असणाऱ्या इंदुबाई पाटणे यांचा मुलगा कामानिमित्त मुंबईत असतो. त्याही घरी एकट्या असत. त्यामुळे त्या झोपण्यासाठी पार्वती, सत्यवतीकडे जात असत. तीन महिलांचा एकाच ठिकाणी खून झाल्याची रत्नागिरी जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. पाेलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्यादृष्टीने पाेलीस तपास सुरु आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीdapoli-acदापोलीCrime Newsगुन्हेगारी