शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

कोकणासाठी महावितरणने प्रोत्साहन निधी मागावा : भास्कर जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 18:54 IST

mahavitaran Bhaskar Jadhav Ratnagiri-मराठवाडा, विदर्भची थकबाकी महाराष्ट्रातील अन्य विभागांपेक्षा दुपटीने आहे. त्या तुलनेत महावितरणची रत्नागिरी जिल्ह्यात थकबाकीच नाही. कोकणातील जनता शासनाची, बँकेची थकबाकी ठेवत नाही. त्यामुळे शासनाने कोकणाच्या विकासासाठी प्रोत्साहन निधी तरी द्यावा, अशी मागणी महावितरणने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्य सरकारकडे करावी, असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी गुहागरमध्ये केले. ते महावितरणच्या एक गाव एक दिवस उपक्रमांच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.

ठळक मुद्दे महावितरणकडून एक गाव एक दिवस, उपक्रमाचा गुहागरात शुभारंभ ग्राहकांना सन्मानाची वागणूक देऊन साचेबध्द उत्तर देऊ नका-भास्कर जाधव

असगोली : मराठवाडा, विदर्भची थकबाकी महाराष्ट्रातील अन्य विभागांपेक्षा दुपटीने आहे. त्या तुलनेत महावितरणचीरत्नागिरी जिल्ह्यात थकबाकीच नाही. कोकणातील जनता शासनाची, बँकेची थकबाकी ठेवत नाही. त्यामुळे शासनाने कोकणाच्या विकासासाठी प्रोत्साहन निधी तरी द्यावा, अशी मागणी महावितरणने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्य सरकारकडे करावी, असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी गुहागरमध्ये केले. ते महावितरणच्या एक गाव एक दिवस उपक्रमांच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.गुहागर पंचायत समितीच्या सभागृहात शुभारंभाचा कार्यक्रम पार पडला. महावितरणचे गणेश गलांडे यांनी ह्यएक गाव एक दिवसह्ण उपक्रमाची माहिती दिली. वीज ग्राहकांना सन्मानाची वागणूक द्या. साचेबंद उत्तर देऊन त्याला परत पाठवू नका. वीज अपघातानंतर जबाबदारी स्वीकारा, अशा सूचना भास्कर जाधव यांनी महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना केल्या.या वेळी सभापती विभावरी मुळे, उपसभापती सुनील पवार, अतिरिक्त गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, पंचायत समिती सदस्य पांडुरंग कापले, सीताराम ठोंबरे, विनायक मुळे नगरसेविका नीलिमा गुरव, मृणाल गोयथळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता गणेश गलांडे, आबलोलीच्या सहाय्यक अभियंता जयश्री माळकर, रानवीचे सहाय्यक अभियंता बसवराज कलशेट्टी, गुहागरच्या कनिष्ठ अभियंता प्रियांका वाठोरे, शृंगारतळीतील सहाय्यक अभियंता सनी पवार, तळवलीचे कनिष्ठ अभियंता रोहित दाबेराव, पालशेतच्या सहाय्यक अभियंता सुमित्रा सपकाळ उपस्थित होते. प्रास्ताविक जयश्री माळकर यांनी केले.कोकणासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करावाकोकणाला न्याय द्यायचा असेल तर या उपक्रमाबरोबरच स्वतंत्र प्रस्ताव तयार करावा लागेल. आमच्याकडे थकबाकी नाही. महाराष्ट्राला केंद्र सरकाच्या अर्थसंकल्पातून, निती आयोगातून निधी कमी मिळतो, कारण आपल्याकडे थकबाकी नाही आणि सर्वाधिक महसूल महाराष्ट्रातून मिळतो. तीच परिस्थिती कोकणाची. आमच्याकडे विजेची, कर्जाची थकबाकी नाही. म्हणून आमच्याकडे विकासाबाबत दुर्लक्ष केले जाते. हा विषय आकडेवारीनिशी सरकारकडे मांडावा, अशी मागणी केली पाहिजे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांशी सौजन्याने वागावे, अशीही सूचना भास्कर जाधव यांनी केली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणBhaskar Jadhavभास्कर जाधवRatnagiriरत्नागिरी