शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

कोकणासाठी महावितरणने प्रोत्साहन निधी मागावा : भास्कर जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 18:54 IST

mahavitaran Bhaskar Jadhav Ratnagiri-मराठवाडा, विदर्भची थकबाकी महाराष्ट्रातील अन्य विभागांपेक्षा दुपटीने आहे. त्या तुलनेत महावितरणची रत्नागिरी जिल्ह्यात थकबाकीच नाही. कोकणातील जनता शासनाची, बँकेची थकबाकी ठेवत नाही. त्यामुळे शासनाने कोकणाच्या विकासासाठी प्रोत्साहन निधी तरी द्यावा, अशी मागणी महावितरणने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्य सरकारकडे करावी, असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी गुहागरमध्ये केले. ते महावितरणच्या एक गाव एक दिवस उपक्रमांच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.

ठळक मुद्दे महावितरणकडून एक गाव एक दिवस, उपक्रमाचा गुहागरात शुभारंभ ग्राहकांना सन्मानाची वागणूक देऊन साचेबध्द उत्तर देऊ नका-भास्कर जाधव

असगोली : मराठवाडा, विदर्भची थकबाकी महाराष्ट्रातील अन्य विभागांपेक्षा दुपटीने आहे. त्या तुलनेत महावितरणचीरत्नागिरी जिल्ह्यात थकबाकीच नाही. कोकणातील जनता शासनाची, बँकेची थकबाकी ठेवत नाही. त्यामुळे शासनाने कोकणाच्या विकासासाठी प्रोत्साहन निधी तरी द्यावा, अशी मागणी महावितरणने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्य सरकारकडे करावी, असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी गुहागरमध्ये केले. ते महावितरणच्या एक गाव एक दिवस उपक्रमांच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.गुहागर पंचायत समितीच्या सभागृहात शुभारंभाचा कार्यक्रम पार पडला. महावितरणचे गणेश गलांडे यांनी ह्यएक गाव एक दिवसह्ण उपक्रमाची माहिती दिली. वीज ग्राहकांना सन्मानाची वागणूक द्या. साचेबंद उत्तर देऊन त्याला परत पाठवू नका. वीज अपघातानंतर जबाबदारी स्वीकारा, अशा सूचना भास्कर जाधव यांनी महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना केल्या.या वेळी सभापती विभावरी मुळे, उपसभापती सुनील पवार, अतिरिक्त गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, पंचायत समिती सदस्य पांडुरंग कापले, सीताराम ठोंबरे, विनायक मुळे नगरसेविका नीलिमा गुरव, मृणाल गोयथळे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता गणेश गलांडे, आबलोलीच्या सहाय्यक अभियंता जयश्री माळकर, रानवीचे सहाय्यक अभियंता बसवराज कलशेट्टी, गुहागरच्या कनिष्ठ अभियंता प्रियांका वाठोरे, शृंगारतळीतील सहाय्यक अभियंता सनी पवार, तळवलीचे कनिष्ठ अभियंता रोहित दाबेराव, पालशेतच्या सहाय्यक अभियंता सुमित्रा सपकाळ उपस्थित होते. प्रास्ताविक जयश्री माळकर यांनी केले.कोकणासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करावाकोकणाला न्याय द्यायचा असेल तर या उपक्रमाबरोबरच स्वतंत्र प्रस्ताव तयार करावा लागेल. आमच्याकडे थकबाकी नाही. महाराष्ट्राला केंद्र सरकाच्या अर्थसंकल्पातून, निती आयोगातून निधी कमी मिळतो, कारण आपल्याकडे थकबाकी नाही आणि सर्वाधिक महसूल महाराष्ट्रातून मिळतो. तीच परिस्थिती कोकणाची. आमच्याकडे विजेची, कर्जाची थकबाकी नाही. म्हणून आमच्याकडे विकासाबाबत दुर्लक्ष केले जाते. हा विषय आकडेवारीनिशी सरकारकडे मांडावा, अशी मागणी केली पाहिजे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांशी सौजन्याने वागावे, अशीही सूचना भास्कर जाधव यांनी केली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणBhaskar Jadhavभास्कर जाधवRatnagiriरत्नागिरी