रत्नागिरी : पत्रकार वारिशे मृत्यू प्रकरणी रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेताना आधी मुख्यमंत्री म्हटले. लगेचच आपले म्हणणे सुधारुन घेताना त्यांनी नियतीच्या मनात काय आहे कुणास ठाऊस असे मिश्किलपणे सांगितले.खासदार राऊत यांनी रत्नागिरीत शुक्रवारी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत तपास यंत्रणांबाबत शंका व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख करताना प्रथम मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस म्हटले. मात्र लगेचच त्यात त्यांनी सुधारणा केली. फडणवीस यांचे नाव घेताना नेहमी मुख्यमंत्री असेच तोंडात येते. हे नियतीचे काय संकेत आहेत, माहिती नाही, असेही ते मिश्किलपणे म्हणाले.हा योगायोग नाहीआंगणेवाडीच्या यात्रेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की कोणीही आडवे आले तरी रिफायनरी होणार आणि दुसऱ्याच दिवशी वारिशेची हत्या होते, हा योगायोग नाही. त्यामुळे वारिशे यांच्या कुटुंबियांना सरकारने ५० लाख रुपये द्यावेत, अशी शिवसेनेची मागणी असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस?, चूक लक्षात येताच खासदार संजय राऊत मिश्किलपणे म्हणाले...
By मनोज मुळ्ये | Updated: February 17, 2023 13:46 IST