शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारी बंदीचे रत्नागिरीत सर्वाधिक उल्लंघन?, दहा नौकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 19:43 IST

राज्य सरकारने १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांसाठी सागरी मासेमारीला पावसाळ्यात बंदी घातली आहे. मात्र, बंदी आदेश झुगारून अद्याप मासेमारी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देमासेमारी बंदीचे रत्नागिरीत सर्वाधिक उल्लंघन?, दहा नौकांवर कारवाई प्रमाण अत्यल्प असल्याचा स्थानिक मच्छिमारांचा दावा

रत्नागिरी : राज्य सरकारने १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांसाठी सागरी मासेमारीला पावसाळ्यात बंदी घातली आहे. मात्र, बंदी आदेश झुगारून अद्याप मासेमारी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बंदीच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये बंदी आदेश मोडून मासेमारी करणाऱ्या १० नौकांवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. मात्र, रत्नागिरी विभागात मोठ्या प्रमाणात बंदी आदेशाचे उल्लंघन होत असताना नौकांवरील कारवाईचे प्रमाण अत्यल्प असल्याचा दावा स्थानिक मच्छिमारांमधून केला जात आहे.राज्याच्या सागरी क्षेत्रात पावसाळ्यात दरवर्षी दोन महिने मासेमारी बंदी आदेश लागू करण्यात येतो. यंदाही १ जूनपासून हा बंदी आदेश जारी झाला. मात्र, पहिल्याच दिवशी या आदेशाचे ७ मासेमारी नौकांनी उल्लंघन केले.

या नौकांमध्ये अतिक हमीद मिरकर (मिरकरवाडा, रत्नागिरी) यांची नौका मोहम्मद सियाम, साजीद हसनमियॉँ मिरकर (भाटकरवाडा, रत्नागिरी) यांची गोवर्धन प्रसाद, संजय रघुनाथ चव्हाण, (साखरहेदवी, गुहागर) यांची दशभूज लक्ष्मीगणेश, विष्णू भाग्या ढोर्लेकर (वेळणेश्वर, गुहागर) यांची पांडुरंग प्रसाद, आत्माराम हरी वासावे (रा. साखरीआगार, गुहागर) यांची पिंपळेश्वर सागर, दिलीप राघोबा नाटेकर (नवानगर, गुहागर) यांची सर्वेश्वरी, मोहम्मद रफीक अ. भाटकर (राजिवडा, रत्नागिरी) यांची नौका मोहम्मद शयान यांचा समावेश आहे. या सातही नौकांवरील २५,८०० रुपयांची मासळी जप्त करण्यात आली असून, गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.त्यानंतर ३ जूनला मत्स्य व्यवसाय विभागाने आणखी तीन मासेमारी नौकांवर बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने कारवाई केली आहे. या नौकांमध्ये बशीर जैनुद्दीन सांग्रे (जयगड, रत्नागिरी) यांची बिस्मिल्ला स्टार्ट, विवेक सुर्वे (जयगड, रत्नागिरी) यांची जयगडचा राजा १, फत्तेमहम्मद हुसैन मुजावर (चालक, रा. जयगड) यांची हवा अल हसन यांचा समावेश आहे.यातील पहिल्या दोन नौकांना अधिकृत नंबरच नाही. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या अनेक नौका कार्यरत असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. या तीन नौकांमधून ४५१४ रुपयांची मासळी जप्त करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी मत्स्य व्यवसाय, रत्नागिरीचे सहाय्यक आयुक्त आनंद पालव, जयगडच्या परवाना अधिकारी तृप्ती जाधव, सुरक्षा पर्यवेक्षक तुषार करगुटकर यांनी केली आहे.२०१६च्या कायद्यानुसार राज्य सरकारने १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर हे चार महिनेच पर्ससीन मासेमारीला परवानगी दिली आहे. त्यामुळे १ जानेवारी ते ३१ मेपर्यंत पर्ससीन मासेमारीला बंदी आहे. असे असतानाही बंदीच्या काळातही पर्ससीन मासेमारी बेकायदा सुरू होती. आता पूर्ण बंदी असतानाही पुन्हा एकदा बंदी धुडकावून लावण्याचा प्रयत्न अनेक मासेमारी नौकांनी केला आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा दुबळी ठरत असून, बंदी मोडण्याची घातक प्रथा निर्माण होत असल्याने मच्छिमारांमध्ये अस्वस्थता आहे. 

टॅग्स :Mirkarwada Bandarमिरकरवाडा बंदरRatnagiriरत्नागिरी