शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सकाळी काँग्रेसमध्ये, दुपारी भाजपची सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 13:25 IST

Rajapur Sarpacnch Bjp Ratnagiri- निवडणुकीत काँग्रेसकडून विजयी झालेल्या महिला सदस्याने बुधवारी सकाळी अचानक भाजपत जाहीर प्रवेश करून दुपारी सरपंचपद मिळवले. तालुक्यातील पांगरे बुद्रुक ग्रामपंचायतीमधील या नाट्यमय घडामोडीने तालुक्यात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

ठळक मुद्देसकाळी काँग्रेसमध्ये, दुपारी भाजपची सरपंचनाट्यमय घडामोडीने तालुक्यात चांगलीच खळबळ

राजापूर : निवडणुकीत काँग्रेसकडून विजयी झालेल्या महिला सदस्याने बुधवारी सकाळी अचानक भाजपत जाहीर प्रवेश करून दुपारी सरपंचपद मिळवले. तालुक्यातील पांगरे बुद्रुक ग्रामपंचायतीमधील या नाट्यमय घडामोडीने तालुक्यात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.राजापूर तालुक्यातील पांगरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडणुकीत हा सनसनाटी प्रकार पाहायला मिळाला. काँग्रेसकडून निवडून आलेल्या वैष्णवी संतोष कुळ्ये यांनी अचानक भाजपात प्रवेश करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. त्यानंतर, भाजपकडून सरपंचपदाची निवडणूक लढवून त्यांनी शिवसेनेच्या अवंतिका जयवंत पवार यांचा पराभव केला. पाठोपाठ भाजपच्या अनुजा सत्तेश पवार यांनी शिवसेनेचे विश्वनाथ दत्ताराम सावंत यांचा पराभव करून उपसरपंचपदाची निवडणूकही जिंकली.काँग्रेसच्या अन्य दोन सदस्यांनी भाजपच्या दोन्ही उमेदवारांना मतदान केले. त्यामुळे ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आली आहे. पांगरेमधील सरपंच व उपसरपंचाच्या निवडणुकीसाठी प्रभाकर तुकाराम बेंद्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.पांगरे बुद्रुक ग्रामपंचायतीत कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. सात जागांपैकी शिवसेना व काँग्रेसने ३/३ जागा जिंकल्या, तर एक जागा भाजपाने पटकावली होती. त्यामुळे सरपंच व उपसरपंचपदासाठी जोरदार चुरस निर्माण झाली होती. कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने युती वा आघाडीचे समीकरण जुळविले जाण्याची शक्यता वर्तविली जात होती.

राज्यातील राजकारणात शिवसेना व भाजपचे संबंध बिघडले असले, तरी शिवसेनेचे तीन व भाजपचा एक असे चार सदस्य युती करून सत्ता स्थापणार की, येथेही महाविकास आघाडीची सत्ता येणार, याकडे सर्वांचे लक्ष होते.प्रत्यक्षात, सर्वच राजकीय आडाखे चुकीचे ठरविणारी घटना बुधवारी घडली. काँग्रेसकडून सरपंचपदाच्या प्रमुख दावेदार असलेल्या वैष्णवी संतोष कुळ्ये यांनी अचानक भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांच्या उपस्थितीत भाजपत जाहीर प्रवेश केला. त्यांना भाजपकडून सरपंचपदासाठी, तर भाजपच्या एकमेव निवडून आलेल्या सदस्या अनुजा सत्तेश पवार यांना उपसरपंच पदाची, तर शिवसेनेकडून सरपंच पदासाठी अवंतिका जयवंत पवार आणि उपसरपंचपदासाठी विश्वनाथ सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, भाजपने शिवसेनेसह काँग्रेसला धोबीपछाड देताना पांगरे बुद्रुकमध्ये कमळ फुलविले.

 

टॅग्स :sarpanchसरपंचBJPभाजपाRajapurराजापुरRatnagiriरत्नागिरी