शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

Uday Samant: शिवसेनेचा त्रागा, सामंतांनी पकडला फक्त संयमाचा धागा; दिला सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 17:31 IST

आमदार उदय सामंत यांनी अजून कोणावरही टीका न करता संयमाची भूमिका घेतली

मनोज मुळ्येरत्नागिरी : राज्यात घडलेल्या राजकीय नाट्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेतही मोठी खळबळ उडाली. जिल्ह्यातील आमदार उदय सामंत आणि आमदार योगेश कदम यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेचे दोन भाग होणे अटळ झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून सातत्याने त्रागाच केला जात आहे. मात्र आमदार उदय सामंत यांनी अजून कोणावरही टीका न करता संयमाची भूमिका घेतली आहे. त्याचवेळी योग्य वेळी उत्तर देण्याचा सूचक इशाराही दिला आहे.शिंदे गटात सहभागी झालेल्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये पहिल्या दिवशी रत्नागिरीतील कोणाचाही समावेश नव्हता. मात्र प्रथम योगेश कदम आणि नंतर उदय सामंत यांनी त्या गटात प्रवेश केला. योगेश कदम यांची समस्या वेगळीच आहे. तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ते आधीपासूनच शिवसेनेतून बाजूला फेकले गेले होते. त्यामुळे ते शिंदे गटात जाण्याची शक्यता शिवसेना नेत्यांनाही होती. त्यामुळे  त्यांच्या जाण्यावर शिवसेनेकडून तितकीशी टीका झाली नाही.शिवसेनेच्या नेत्यांनी विशेषत: खासदार विनायक राऊत यांनी आमदार उदय सामंत यांनाच प्रमुख लक्ष्य केले आहे. उपरा, बाटगा अशी अनेक विशेषणे त्यांनी सामंत यांच्याबाबत वापरली आहेत. सामंत यांची राजकीय ताकद, त्यांची क्षमता, त्यांची कार्यपद्धती या साऱ्याची खासदार राऊत यांना कल्पना आहे. त्यामुळे सामंत यांच्या बाजूने जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे. म्हणूनच शिवसेनेकडून सामंत यांना विशेष लक्ष केले जात आहे. या टीकेमुळे त्यांच्याजवळ जाऊ शकणारे पदाधिकारी व कार्यकर्ते अडवण्याचा उद्देश बाळगून ही टीका केली जात आहे.तीव्र शब्दांत टीका होत असली तरी अजूनही आमदार उदय सामंत यांनी शिवसेनेवर किंवा खासदार विनायक राऊत यांच्यावर एकदाही टीका केलेली नाही. त्यांनी अजूनही आपली सर्व वक्तव्ये संयम राखून व्यक्त केली आहेत.आताही आपली भूमिका मांडताना त्यांनी खासदार राऊत यांच्या शब्दांमुळे आपल्याला दु:ख झाल्याचे, वाईट वाटल्याचे, खंत वाटल्याचे म्हटले आहे. पण ते ज्येष्ठ नेते असल्यामुळे आपण त्यांच्यावर टीका करणार नाही, अशीच प्रतिक्रिया माध्यमांकडे व्यक्त केली आहे.

सामंत यांची मुत्सद्देगिरीउदय सामंत गेली अडीच वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याविरोधात भाजपकडून आमदार नितेश राणे यांनी खूपदा टीका केली होती. मात्र त्याला टीकेने उत्तर न देण्याची राजकीय मुत्सद्देगिरी उदय सामंत यांनी सातत्याने दाखवली आहे. त्यामुळे मंत्रिपदाचा अडीच वर्षाच्या काळात त्यांनी कोणावरही टीका केल्याचे उदाहरण नाही.

निवडणुकीत मोठी मदत२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आमदार उदय सामंत यांनी खासदार विनायक राऊत यांना मोठी मदत केली होती. या मदतीमुळेच २०१४ च्या निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या ३६ टक्के मते मिळवणाऱ्या शिवसेनेला २०१९च्या निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या ५० टक्के मते मिळाली आहेत. त्यावेळी उदय सामंत घेतलेल्या पुढाकारामुळे शिवसेनेची मते वाढली. मात्र आपल्यावरील टीकेला उत्तर देताना ही बाबही सामंत यांनी पुढे आलेली नाही.

अनेकजण तळ्यात मळ्यातआमदार उदय सामंत यांनी अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांना उभे केले आहे. पुढच्या काळातही त्यांच्याकडे मंत्रिपद असेल. त्यामुळे त्यांच्यासोबत जायचे की पक्षात राहायचे, याबाबत अजूनही अनेकजण तळ्यात मळ्यात आहेत. हे राजकीय नाट्य घडल्यानंतर सामंत अजून रत्नागिरीत आलेले नाहीत. ते जेव्हा येतील, तेव्हा हे चित्र स्पष्ट होइल.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाUday Samantउदय सामंत