शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

शिवसेना ठाकरे गटाच्या आमदाराची चक्क सत्ताधाऱ्यांकडून पाठराखण, चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 12:33 IST

हे प्रेम नव्या राजकारणाची नांदी आहे का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात पुढे येत आहे.

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांत रत्नागिरीच्याराजकारणात नकळत मोठे बदल होऊ लागले आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेकडून रिफायनरीच्या समर्थनाचा लढा एकट्यानेच लढणाऱ्या आमदार राजन साळवी यांना सत्ताधारी पक्षाकडून चांगला पाठिंबा दिला जात आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार साळवी यांच्यावरील हे प्रेम नव्या राजकारणाची नांदी आहे का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात पुढे येत आहे.शिंदे गटाने स्वतंत्र भूमिका घेतल्यानंतर राजापूरचे आमदार राजन साळवी हेही शिंदे गटात सहभागी हाेतील, असा अंदाज होता. मात्र, आमदार साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतच राहण्याची भूमिका घेतली. त्याची दखल घेत पक्षाने त्यांना उपनेतेपद दिले. त्यामुळे जिल्ह्याची पक्षाची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली जातील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, काही दिवसांतच पक्षाने गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना शिवसेनेचे नेतेपद दिले. त्यावरून साळवी यांच्या समर्थकांमध्ये काहीशी नाराजी पसरली होती.शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आमदार साळवी शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा अनेकदा रंगली. प्रत्येकवेळा आमदार साळवी यांनी त्याचा इन्कार केला. तरीही या चर्चा थांबलेल्या नाहीत. दरवेळी नव्या नव्या मुद्द्यांवरून याबाबतची चर्चा सुरूच आहे. गेल्या काही दिवसात ऊर्जामंत्री उदय सामंत यांनी त्यांची पाठराखण सुरू केल्यामुळे पुन्हा एकदा याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.केसालाही धक्का लागू देणार नाहीआमदार राजन साळवी यांनी रिफायनरीच्या समर्थनाची भूमिका घेतली असल्याने प्रकल्प परिसरात साळवी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. या एकूणच पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री उदय सामंत यांनी खणखणीत भूमिका घेत आमदार साळवी यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असे ठणकावले आहे. याआधीही त्यांना सुरक्षा देण्यातही मंत्री सामंत यांनी पुढाकार घेतला होता.सामंजस्याचे राजकारण  मंत्री उदय सामंत यांनी गेल्या काही वर्षांत आपल्या कामाच्या पद्धतीत मोठा बदल केला आहे. त्यांनी कोणत्याही नेत्याविरोधात आक्रमक, प्रक्षोभक किंवा खालच्या थराचे वक्तव्य त्यांनी केलेले नाही. टोकाची टीका केलेल्या खासदारांनाही त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. मात्र, आमदार साळवी यांच्याबाबत त्यांची भूमिका अधिकच मऊ असल्याचे गेल्या काही दिवसात प्रकर्षाने पुढे येत आहे. ते आमदार साळवी यांचे वारंवार कौतुक करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच रत्नागिरीच्या राजकारणात काही ना काही उलथापालथी होण्याची अपेक्षा केली जात आहे.मंत्रालयातील बैठकीत कौतुकरिफायनरीबाबत मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंत्री उदय सामंत यांनी आमदार राजन साळवी यांनी घेतलेल्या भूमिकेचे खूप मोठ्या प्रमाणात कौतुक केले होते. आमदार साळवी यांनी मांडलेल्या मागण्यांना त्यांनी सरकारतर्फे तत्काळ हिरवा कंदिलही दाखवला. बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेतही त्यांनी आमदार साळवी यांचे विशेष कौतुक केले. त्यांनी केलेल्या या कौतुकामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेRajan Salviराजन साळवी