शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

शिवसेना ठाकरे गटाच्या आमदाराची चक्क सत्ताधाऱ्यांकडून पाठराखण, चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 12:33 IST

हे प्रेम नव्या राजकारणाची नांदी आहे का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात पुढे येत आहे.

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांत रत्नागिरीच्याराजकारणात नकळत मोठे बदल होऊ लागले आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेकडून रिफायनरीच्या समर्थनाचा लढा एकट्यानेच लढणाऱ्या आमदार राजन साळवी यांना सत्ताधारी पक्षाकडून चांगला पाठिंबा दिला जात आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार साळवी यांच्यावरील हे प्रेम नव्या राजकारणाची नांदी आहे का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात पुढे येत आहे.शिंदे गटाने स्वतंत्र भूमिका घेतल्यानंतर राजापूरचे आमदार राजन साळवी हेही शिंदे गटात सहभागी हाेतील, असा अंदाज होता. मात्र, आमदार साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतच राहण्याची भूमिका घेतली. त्याची दखल घेत पक्षाने त्यांना उपनेतेपद दिले. त्यामुळे जिल्ह्याची पक्षाची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली जातील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, काही दिवसांतच पक्षाने गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना शिवसेनेचे नेतेपद दिले. त्यावरून साळवी यांच्या समर्थकांमध्ये काहीशी नाराजी पसरली होती.शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आमदार साळवी शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा अनेकदा रंगली. प्रत्येकवेळा आमदार साळवी यांनी त्याचा इन्कार केला. तरीही या चर्चा थांबलेल्या नाहीत. दरवेळी नव्या नव्या मुद्द्यांवरून याबाबतची चर्चा सुरूच आहे. गेल्या काही दिवसात ऊर्जामंत्री उदय सामंत यांनी त्यांची पाठराखण सुरू केल्यामुळे पुन्हा एकदा याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.केसालाही धक्का लागू देणार नाहीआमदार राजन साळवी यांनी रिफायनरीच्या समर्थनाची भूमिका घेतली असल्याने प्रकल्प परिसरात साळवी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. या एकूणच पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री उदय सामंत यांनी खणखणीत भूमिका घेत आमदार साळवी यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असे ठणकावले आहे. याआधीही त्यांना सुरक्षा देण्यातही मंत्री सामंत यांनी पुढाकार घेतला होता.सामंजस्याचे राजकारण  मंत्री उदय सामंत यांनी गेल्या काही वर्षांत आपल्या कामाच्या पद्धतीत मोठा बदल केला आहे. त्यांनी कोणत्याही नेत्याविरोधात आक्रमक, प्रक्षोभक किंवा खालच्या थराचे वक्तव्य त्यांनी केलेले नाही. टोकाची टीका केलेल्या खासदारांनाही त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. मात्र, आमदार साळवी यांच्याबाबत त्यांची भूमिका अधिकच मऊ असल्याचे गेल्या काही दिवसात प्रकर्षाने पुढे येत आहे. ते आमदार साळवी यांचे वारंवार कौतुक करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच रत्नागिरीच्या राजकारणात काही ना काही उलथापालथी होण्याची अपेक्षा केली जात आहे.मंत्रालयातील बैठकीत कौतुकरिफायनरीबाबत मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंत्री उदय सामंत यांनी आमदार राजन साळवी यांनी घेतलेल्या भूमिकेचे खूप मोठ्या प्रमाणात कौतुक केले होते. आमदार साळवी यांनी मांडलेल्या मागण्यांना त्यांनी सरकारतर्फे तत्काळ हिरवा कंदिलही दाखवला. बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेतही त्यांनी आमदार साळवी यांचे विशेष कौतुक केले. त्यांनी केलेल्या या कौतुकामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेRajan Salviराजन साळवी