शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

साहित्य भूषण पुरस्काराची रक्कम १० लाख, मंत्री उदय सामंत यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 15:56 IST

मालगुंड येथे पुस्तकांचे गाव उपक्रमाचे लोकार्पण 

गणपतीपुळे : विश्व मराठी साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या ‘साहित्य भूषण’ पुरस्काराची रक्कम यावर्षीपासून १० लाख रुपये करण्यात येत आहे. तसेच मालगुंड येथील केशवसुतांच्या स्मारकाच्या नूतनीकरणासाठी १ कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्रीउदय सामंत यांनी रविवारी मालगुंड येथे केली.मालगुंड (ता. रत्नागिरी) येथील कवी केशवसुत स्मारक येथे ‘पुस्तकांचे गाव’ उपक्रमाचा लोकार्पण सोहळा आणि कोकण साहित्य सन्मान दालनाचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. त्यावेळी मंत्री सामंत बोलत होते. अध्यक्षस्थानी कोमसापचे संस्थापक मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर, कवी अरुण म्हात्रे, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मराठी भाषा संचालक डॉ. शामकांत देवरे, उपजिल्हाधिकारी तथा मराठी भाषा अधिकारी शुभांगी साठे, सरपंच श्वेता खेऊर, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील उपस्थित होते.

मंत्री सामंत पुढे म्हणाले की, कोकणाला साहित्यिकांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. कोकणाने राज्याला दिलेले साहित्यिक पाहता, कोकण साहित्याच्या दृष्टीने प्रगत आहे. हे साहित्य आपण सर्वांनी पोहाेचवले पाहिजे, असे ते म्हणाले.मधु मंगेश कर्णिक यांनी कवी केशवसुत मालगुंडला जन्माला आले, हे महाराष्ट्राचे भाग्य आहे, असे सांगितले. संचालक डॉ. देवरे यांनी ‘पुस्तकांचे गाव’ या मागील शासनाची भूमिका सांगितली. अरुण म्हात्रे यांनी ‘शिपाई’ कविता सादर केली. रमेश कीर यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. आनंद शेलार यांनी आभार मानले. मालगुंड ग्रामपंचायतीत प्रथम पुस्तक दालनाचे उद्घाटन करण्यात आले.

साहित्य संमेलनासाठी पाच कोटीयापुढे बालसाहित्य संमेलन, युवा साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन होईल. या प्रत्येक साहित्य संमेलनासाठी पाच-पाच कोटींची तरतूद केलेली आहे, असे त्यांनी सांगितले.

साहित्यिक हे सांस्कृतिक परंपरेचा पायामराठी भाषा ताकदवान करण्याचे काम साहित्यिकांनी केले आहे. देशाच्या सांस्कृतिक विभागाचा पाया हा साहित्यिक आहेत. साहित्यिक नसतील तर सांस्कृतिक क्षेत्र पुढे जाऊ शकत नाही. याचा अर्थ आपल्या सगळ्या सांस्कृतिक परंपरेचा पाया महाराष्ट्रातील साहित्यिक आहेत, असे सामंत म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतministerमंत्री