शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मिनी महाबळेश्वर दापोलीचा पारा चढला, वीस वर्षात सर्वाधिक तापमानाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 16:47 IST

कधीकाळी ब्रिटिशांनाही थंड हवेचे ठिकाण म्हणून दापोलीची भुरळ पडली होती. परंतु अलीकडे होत असलेल्या तापमान वाढीमुळे मिनी महाबळेश्वर ही दापोलीची ओळख पुसली जात आहे.

दापोली : कोकणातील थंड हवेचे ठिकाण, मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोलीतही आता पारा चांगलाच चढत आहे. गुरुवारी दापोलीमध्ये तब्बल ४०.०८ अंश इतके कमाल तर रात्री २२.०६ अंश इतके किमान तापमान नोंदवले गेले आहे.

आल्हाददायक वातावरणामुळे दरवर्षी लाखो पर्यटक दापोलीला भेट देतात. कधीकाळी ब्रिटिशांनाही थंड हवेचे ठिकाण म्हणून दापोलीची भुरळ पडली होती. परंतु अलीकडे होत असलेल्या तापमान वाढीमुळे मिनी महाबळेश्वर ही दापोलीची ओळख पुसली जात आहे.

दापोली तालुक्यात विकासाच्या नावाखाली होणारी बेसुमार जंगलतोड, मानवनिर्मित वणवे, कचऱ्याचे कोणतेही व्यवस्थापन नसल्याने शहरातील डम्पिंग ग्राऊंडला लागणारी वारंवार आग, बेसुमार वाळू उपसा, सांघिक वृक्षसंवर्धन मोहिमेचा अभाव, पाणी अडवा पाणी जिरवा, रेन वाॅटर हार्वेस्टिंगबाबतची अनास्था या आणि अशा संबंधित अनेक कारणांसह ग्लोबल वाॅर्मिंगच्या झळा बसत आहेत. त्यामुळे येथे तापमानवाढ होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

दापोलीचे अर्थकारण आंबा, काजू, करवंद, जांभूळ, सुपारी, नारळ ही पिके आणि पर्यटन यावर आधारित आहे. मात्र तापमानवाढीचा परिणाम या सर्वच गोष्टींवर होत आहे. भविष्यातही जागतिक तापमानवाढीमुळे या मिनी महाबळेश्वरकडे अधिकाधिक पर्यटक येतील, अशी अपेक्षा आहे. मात्र त्याकरिता दापोलीचे अस्तित्व टिकवण्यासाठी कृषी विद्यापीठ, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन आणि तमाम नागरिकांत मानसिक बदल घडवून कृती आराखडा तयार करावा, अशी अपेक्षा केली जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीweatherहवामानdapoli-acदापोली