शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

स्थलांतराच्या नोटीस आता दरवर्षीच्याच

By admin | Updated: July 8, 2016 01:03 IST

ठोस उपायांचे काय? : वाडीवस्तीतील कुटुंबांची कायमस्वरुपी सोय नाहीच

दापोली : दरवर्षी पावसाळ्याला सुरूवात झाली की, धोकादायक ठिकाणी वसलेल्या वाडीवस्तीतील कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीस बजावल्या जातात. मात्र, या धोकादायक ठिकाणांवर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नसल्याचे ८९८ कुटुंबांना बजावण्यात आलेल्या स्थलांतराच्या नोटीसवरून समोर येत आहे.दापोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात जागांची विक्री होत असून, येथे विविध प्रकारे उत्खननही होते. आसूद काजऱ्याचीवाडी येथील रस्त्यालगत असलेली जागा जमीन मालकाने पुणे येथील व्यक्तिला विकली आहे. त्यामुळे ‘त्या’ जागेच्या नवीन मालकाने तेथे प्लाटींग करण्यास सुरूवात केली असून, तेथे विहिरीकरिता मोठ्या प्रमाणात उत्खननदेखील केले आहे. त्यामुळे पहिल्या पावसात या ठिकाणची माती कोसळून नजीकच्या काही घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील ४ कुटुंबांना स्थलांतरीत होण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.अशा प्रकारची अनेक धोकादायक ठिकाणे दापोली तालुक्यात असून, यामध्ये कर्दे, पाजपंढरी, हर्णै, केळशी, उंबरशेत, लाडघर, करजगाव, दाभोळ, मुरूड यांचा समावेश आहे. यामध्ये आता आसूद गावाची भर पडली असून, संबंधित ८९८ कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीस तहसील प्रशासनाकडून बजावण्यात आल्या आहेत. गेल्यावर्षी मुरूड येथील काही कुटुंबाना स्थलांतरीत होण्यासाठी तोंडी सांगण्यात आले होते. येथील डोंगरावरही उत्खनन झाले आहे. परंतु, सध्या हे काम बंद आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या या स्थलांतरीत कुटुंबांची मंदिर, शाळा येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.गावागावातील जागा जमिनी विकल्या गेल्याने व तेथे मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात असल्याने परिसरातील काही घरांना धोका निर्माण झाला आहे. यामुळे बेकायदा उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. आम्ही आमचे राहते घर का सोडायचे? असा प्रश्न हे ग्रामस्थ करत आहेत. उत्खननाची परवानगी शासन देते, त्यापूर्वी तेथे वाडीवस्ती आहे का? याची त्या प्रशासक अधिकाऱ्यांनी पाहणी करणे आवश्यक आहे. परंतु, तसं घडत नाही. दरड ही आज नाही कोसळली तरी कधी ना कधी कोसळणारचं आहे. दरवर्षी राहते घर सोडून आम्ही शाळा, मंदिरात जाऊन राहायचे का? असा प्रश्न हे ग्रामस्थ विचारू लागले आहेत. शासनाकडून दरवर्षी नोटीस बजावल्या जाते. परंतु, यावर कायमस्वरूपी मार्ग अद्याप निघालेला नाही. शासनाने डोंगर भागात उत्खननाची परवानगी देण्याआधी तेथील वाडीवस्तीची पाहणी करणे आवश्यक आहे.पावसाळा असो अथवा उन्हाळा धोका हा कायमच आहे. पावसाळ्यात शासनाचे अधिकारी येऊन पाहणी करून जातात व तेथील कुटुंबाना नोटीस बजावतात. यावर कायमस्वरूपी उपाययोजना शासनाने करावी, ज्या ठिकाणी उत्खननांमुळे गावांना धोका निर्माण झाला आहे अशा ठिकाणी संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच उत्खननाची परवानगी देताना पाहणी करूनच ती द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे अन्यथा उन्हाळ्यातही मोठमोठे दगड कोसळून येथील गावांचे माळीण होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे आज स्थलांतर केले तरी उद्याचं काय? हा प्रश्न अनुत्तरीतच असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)