शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्तीने मिऱ्या येथे एमआयडीसी लादणार नाही, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 18:18 IST

लाेकांना माझ्याविराेधात कितीही भडकवा; पण..

रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये उद्योग आणावा यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. येथील जनतेला रोजगार मिळावा, युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी तुमचा पालकमंत्री प्रयत्न करत आहे. ज्या ज्या ठिकाणी प्रकल्प आणण्याचे काम केले, जिथे एमआयडीसीची अधिसूचना निघाली आणि तिकडे विरोध झाला. पण स्थानिकांना रोजगार नको, प्रकल्प नको तर कोणावरही जबरदस्ती करून एमआयडीसी लादली जाणार नाही, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले.टाटा टेक्नाॅलाॅजीस व महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथे काैशल्यवर्धन केंद्राच्या उभारणीचे भूमिपूजन उद्याेगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी रत्नागिरी शहरातील मिऱ्या येथील एमआयडीसी उभारणीवरून सुरू झालेल्या विराेधावर भाष्य केले. भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी एमआयडीसीला विराेध केला असून, अधिसूचना रद्द करण्याची मागणी केली आहे. हाच मुद्दा धरून मंत्री सामंत यांनी जाेर जबरदस्ती करून एमआयडीसी लादणार नसल्याचे स्पष्ट केले.ते पुढे म्हणाले, मिऱ्यावासीयांच्या भावना भडकवून राजकारण केले जात आहे. माझ्यावर आरोप केले जात आहेत. मात्र आज सांगतो, माझ्या २० वर्षांच्या कार्यकाळात कोणत्याच समाजावर, गावावर अन्याय किंवा जबरदस्ती करून कोणतेच काम केले नाही. सगळ्यांना बरोबर नेऊन काम करण्याचे प्रामाणिक काम उद्योगमंत्री म्हणून मी केले आहे. मात्र, नाहक माझी बदनामी करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. लाेकांना माझ्याविराेधात कितीही भडकवा; पण जोपर्यंत रत्नागिरीतील जनतेचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत तोपर्यंत मी कोणालाही घाबरत नाही, असे मंत्री सामंत यांनी ठणकावून सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतMIDCएमआयडीसी