शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
4
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
5
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
6
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
7
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
8
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
9
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
10
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
11
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
12
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
13
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
14
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
15
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
16
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
17
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
18
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
19
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
20
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम

समुद्री कासवांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर !

By admin | Updated: July 13, 2016 00:48 IST

मंडणगड, वेळास येथे जाती

आकाश शिर्के -- रत्नागिरी--कधी कधी एखाद्याचे वैशिष्ट्यच त्याच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरते, समुद्री कासवांबाबतही सध्या तेच होत आहे. कासवाचे मांस माणसांबरोबरच काही प्राणीही चवीने खात असल्याने सध्या समुद्री कासवांची संख्या झपाट्याने घटू लागली आहे. या जाती नामशेष होण्याआधी त्यांचे जतन करण्यावर भर देण्याची वेळ आली आहे.समुद्री कासवे सुमारे १०० ते १२५ वर्षे जगतात. ती जास्तीत जास्त ७८ ते ११२ सेंटीमीटर इतकी वाढतात. लहान हिरवे कासव हे उभयहारी असून, मृदुकाय जेलीफिश व स्पाँजेस खातात. परंतु ही कासवे प्रौढावस्थेत गेल्यावर पूर्णपणे शाहाकारी होतात. आॅलिव्ह रिडले हे कासव मात्र मासांहारी आहे. त्याच्या आहारात मासे, कवचधारी प्राणी, मृदूकाय प्राणी, माशांची अंडी इत्यादींचा समावेश असतो.समुद्री कासवे अंडी घालण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावरील एकाच जागेची निवड करतात. त्याचठिकाणी अंडी घालून समुद्रात निघून जातात. या अंड्यांचे रक्षण करण्याची किंवा त्यातून पिल्ले बाहेर येईपर्यंत ती सांभाळण्याची तसदी कासवे घेत नाहीत. अंड्यातून बाहेर आलेली कासवाची पिल्ले समुद्राकडे जातात. त्याचवेळी ती मुंगूस, कोल्हे, कुत्रे, मोठे खेकडे, शार्कमासे यांची शिकार होतात. त्यामुळे समुद्रीकासवे निर्वंश होण्याच्या मार्गावर आहेत. एकीकडे कासवांचा वंश वाढत नाही आणि दुसरीकडे मोठ्या कासवांची मांसासाठी हत्या केली जाते. हे मांस चविष्ट असल्यामुळे त्याला मोठी मागणी असते आणि त्यामुळेच अशा कासवांची हत्या केली जाते. त्यामुळे त्यांचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भारत तसेच इतर राष्ट्रांनी या दुर्मीळ व निर्वंश होत चाललेल्या समुद्री कासवांच्या हत्येवर निर्बंध आणणे गरजेचे आहे.भारतामध्ये मरिन टर्टल कन्झर्वेशन अ‍ॅक्शन (एमटीसीए), सोसायटी फॉर प्रीव्हेन्शन आॅफ क्रुअल्टी टू अ‍ॅनिमल्स, विशाखापट्टणम सोसायटी फॉॅर प्रीव्हेन्शन आॅफ क्रुअल्टी आॅफ अ‍ॅनिमल्स या संस्था तसेच रत्नागिरी जिल्ह्यात सह्याद्री निसर्गमित्र, चिपळूण ही संस्था कासव संवर्धनात विशेष कार्यरत आहे. निसर्गमित्र संस्थेतर्फे मंडणगड तालुक्यातील वेळास येथील ग्रामस्थांच्या मदतीने कासवांच्या सवंर्धनाचे काम केले जात आहे. केवळ संवर्धनच नाही, तर त्याबाबतची जागृती करण्यावरही या संस्थेने भर दिला आहे.मंडणगड, वेळास येथे जातीसमुद्री कासवे वाळूमध्ये अंडी घालतात. काही लोक ही अंडी खातात. या अंड्यांना बाजारातही मोठ्या प्रमाणात भाव मिळतो. कासवाची पिल्ले पौर्णिमेच्या दिवशी समुद्राचा दिशेने जातात. अनेकदा ही कासवे अंधारात समुद्रात जाण्याऐवजी रस्त्यावर येतात आणि गाडीखाली चिरडून त्यांचा मृत्यू होतो. मासेमारीच्या जाळ्यात अडकूनही या कासवांचा मृत्यू होतो. २००२ साली ओडिसामध्ये अनेक कासवांचा मृत्यू याच कारणामुळे झाला होता. कासवांच्या कवचाला मोठ्या प्रमाणात भाव मिळत असल्याने त्यासाठीही कासवाची हत्या होते. - डॉ. ए. यु. पागारकरमत्स्यालय, रत्नागिरी