शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

लोटे येथे मँगो पार्क उभारणार, उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 19:46 IST

गेल्या काळात वेदांतासारखे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचे दुःख आहेच; पण त्याहीपेक्षा मोठे प्रकल्प राज्यात आम्ही आणू, असे त्यांनी सांगितले.

आवाशी : कोकणात लोटे औद्योगिक वसाहतीत मँगो पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी (दि. ६) लोटे (ता. खेड) येथील उद्योग भवन येथे आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. गेल्या काळात वेदांतासारखे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचे दुःख आहेच; पण त्याहीपेक्षा मोठे प्रकल्प राज्यात आम्ही आणू, असे त्यांनी सांगितले.लोटे औद्योगिक वसाहतीला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी भेट दिली. या भेटीत त्यांनी उद्योग भवन येथे उद्योजक संघटना, स्थानिक नागरिक, समाजसेवी संघटना यांच्यासोबत संवाद साधला तसेच समस्यांबाबत निवेदनही स्वीकारली.मंत्री सामंत यांनी सांगितले की, लोटे औद्योगिक वसाहतीसंदर्भात प्राप्त सर्व निवेदनावर पुढच्या आठवड्यात बैठक घेण्यात येईल. या बैठकीत मँगो पार्कबाबतची माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. औद्योगिक वसाहतीला भेडसावणारी पाणी समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणी वर्धन करण्यासाठी मी तत्त्वतः मान्यता दिली आहे. याबाबत आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.लोटे औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. कामगारांना सुरक्षा साधने पुरवण्याची, प्रदूषण होऊ नये यासाठी कारखानदारांनी काम करावे, अशी सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. कोकणासह राज्यात नवीन प्रकल्प आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. त्याचाच भाग म्हणून लवकरच दिल्ली येथे जाऊन मी केंद्रीय मंत्र्यासोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रिफायनरी प्रकल्प हा बेरोजगारांच्या हाताला रोजगार देणारा आहे. प्रकल्पाचे महत्त्व स्थानिकांना पटवून देऊन तो करण्याच्या दृष्टीने हे सरकार सकारात्मक आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.माजी पर्यावरण मंत्र्यांना टोचलेलोटे औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय व्हावे यासाठी गत मंत्रिमंडळातील पर्यावरण मंत्र्यांसोबत मी बोललो होतो. परंतु, काही झाले नाही, असे सांगून अप्रत्यक्षपणे त्यांनी तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना टोचले. आगामी कालावधी याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

मध्यावधी निवडणुका नाहीत

आमच्या सरकारचा आकडा १७० वरून १८२ होणार आहे. त्यामुळे आपल्या सोबतचे आमदार व कार्यकर्ते कुठेही जाऊ नये म्हणून काही लोक हे सरकार कोसळणार आणि आमचा मुख्यमंत्री होणार असे सांगत आहेत. मात्र, मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, असे मंत्री सामंत म्हणाले़

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत