शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
2
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
3
पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय
4
सोनं पुन्हा १ लाखाच्या जवळ? चांदीही ३००० नी महागली, तुमच्या शहरातील दर काय?
5
कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?
6
'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
7
सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं
8
Suicide Blast: पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
9
नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट
10
'हेरा फेरी ३'च्या आधीही बाबूरावने अक्षय कुमारला दिलेला गुलीगत धोका; या सिनेमाला दिलेला नकार
11
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
12
१४,००० मुले उपाशी; २२ देशांचा इस्रायलवर दबाव, इस्रायलवर निर्बंध लागू करण्याचा दिला इशारा
13
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
14
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
15
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!
16
पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती; 
17
तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट
18
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
19
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
20
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट

आंबा झाला दुर्लभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:34 IST

रत्नागिरी : आंब्याचा पहिला हंगाम संपत आला असला, तरीही अजूनही स्थानिकांना आंब्याचा म्हणावा तितका आस्वाद घेता आला नाही. स्थानिक ...

रत्नागिरी : आंब्याचा पहिला हंगाम संपत आला असला, तरीही अजूनही स्थानिकांना आंब्याचा म्हणावा तितका आस्वाद घेता आला नाही. स्थानिक बाजारपेठेत आंब्याची आवक वाढलेली दिसत नाही. त्यामुळे सध्या स्थानिकांना आंबा दुर्लभ झाला आहे.

एकांकिकेला पारितोषिक

रत्नागिरी : येथील नवोदित लेखक अमोल पालये यांच्या ‘पहिली रात्र’ या एकांकिकेला राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. मुंबईत संवाद सेवा संस्थेच्यावतीने ही राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धा आयोजित केली होती. यापूर्वीही पालये यांच्या लेखनाला विविध पुरस्कार मिळाले आहेत.

पाणीटंचाई तीव्र

लांजा : तालुक्यातील कोचरी भोजवाडीतील पाणीटंचाई दिवसेंदिवस उग्र होऊ लागली आहे. मात्र याकडे सर्व लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांचे दुर्लक्ष झाले आहे. या ग्रामस्थांना पाण्यासाठी दोन किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागत आहे. येथील धनगरवाडी आणि भोजवाडीतील ग्रामस्थांनी पाणीपुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे.

नागरिकांना प्रवेशबंदी

रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयात सदैव नागरिकांची वर्दळ सुरू असते. मात्र सध्या कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. निगेटिव्ह चाचणी असलेल्यांनाच या कार्यालयात प्रवेश मिळेल, अशी सूचना या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे.

रुग्णवाहिकेची मागणी

देवरुख : तालुक्यातील वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नसल्याने अनेकवेळा गंभीर प्रसंग उद्भवतो. या परिसरात अपघात घडल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे या आरोग्य केंद्रात तात्काळ २४ तास उपलब्ध असलेली रुग्णवाहिका आणि चालक उपलब्ध करून देण्याची मागणी गावविकास समितीने जिल्हा प्रशासनाला केली आहे.

मंदिर कमानीचे भूमिपूजन

खेड : असगणी येथील महादेव मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या कमानी कामाचे भूमिपूजन नुकतेच झाले. यावेळी सरपंच अनंत मायनाक, माजी सरपंच श्रीकांत फडकले, गंगाराम इप्ते, संजय बुरटे, बंडू आंब्रे आदी उपस्थित होते. मनसेचे कामगार सरचिटणीस संदीप फडकले यांच्या माध्यमातून ही कमान उभारण्यात आली आहे.

पगार रखडले

रत्नागिरी : जिल्ह्यातील ४३ माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच कोकण विभागातील जिल्ह्यांना आवश्यक वेतन अनुदानही अद्याप मिळालेले नाही.

उद्रेक वाढला

देवरुख : सध्या संगमेश्वर तालुक्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. त्याचप्रमाणे कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच आरोग्य यंत्रणेत अपुरे मनुष्यबळ असल्याने या यंत्रणेलाही तारेवरची कसरत करावी लागत आहे.

उन्हाचा पारा चढतोय

मंडणगड : एप्रिल महिना संपत आला असल्याने आता उष्म्याची तीव्रता अधिक वाढू लागली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने सर्वत्र लॉकडाऊन सुरू असतानाच आता उष्माही मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. सामान्य नागरिक घरात असले, तरी आरोग्य यंत्रणा, शासकीय तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी बाहेर फिरत असल्याने त्यांना उन्हाचा त्रास होऊ लागला आहे.

कोरोना अहवालाला विलंब

रत्नागिरी : कोरोनाच्या आरटीपीसीआर तसेच अ‍ॅन्टिजेन चाचण्या सध्या सुरू झाल्या आहेत. काही आस्थापना तसेच शासकीय कार्यालयांकरिता कोरोना चाचण्या सक्तीच्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढू लागली आहे. मात्र त्या तुलनेत चाचण्यांसाठी असलेली यंत्रे कमी असल्याने या चाचण्यांचे अहवाल येण्यास विलंब होत आहे.