शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

आंबा झाला दुर्लभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:34 IST

रत्नागिरी : आंब्याचा पहिला हंगाम संपत आला असला, तरीही अजूनही स्थानिकांना आंब्याचा म्हणावा तितका आस्वाद घेता आला नाही. स्थानिक ...

रत्नागिरी : आंब्याचा पहिला हंगाम संपत आला असला, तरीही अजूनही स्थानिकांना आंब्याचा म्हणावा तितका आस्वाद घेता आला नाही. स्थानिक बाजारपेठेत आंब्याची आवक वाढलेली दिसत नाही. त्यामुळे सध्या स्थानिकांना आंबा दुर्लभ झाला आहे.

एकांकिकेला पारितोषिक

रत्नागिरी : येथील नवोदित लेखक अमोल पालये यांच्या ‘पहिली रात्र’ या एकांकिकेला राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. मुंबईत संवाद सेवा संस्थेच्यावतीने ही राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धा आयोजित केली होती. यापूर्वीही पालये यांच्या लेखनाला विविध पुरस्कार मिळाले आहेत.

पाणीटंचाई तीव्र

लांजा : तालुक्यातील कोचरी भोजवाडीतील पाणीटंचाई दिवसेंदिवस उग्र होऊ लागली आहे. मात्र याकडे सर्व लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांचे दुर्लक्ष झाले आहे. या ग्रामस्थांना पाण्यासाठी दोन किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागत आहे. येथील धनगरवाडी आणि भोजवाडीतील ग्रामस्थांनी पाणीपुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे.

नागरिकांना प्रवेशबंदी

रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयात सदैव नागरिकांची वर्दळ सुरू असते. मात्र सध्या कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. निगेटिव्ह चाचणी असलेल्यांनाच या कार्यालयात प्रवेश मिळेल, अशी सूचना या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे.

रुग्णवाहिकेची मागणी

देवरुख : तालुक्यातील वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नसल्याने अनेकवेळा गंभीर प्रसंग उद्भवतो. या परिसरात अपघात घडल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे या आरोग्य केंद्रात तात्काळ २४ तास उपलब्ध असलेली रुग्णवाहिका आणि चालक उपलब्ध करून देण्याची मागणी गावविकास समितीने जिल्हा प्रशासनाला केली आहे.

मंदिर कमानीचे भूमिपूजन

खेड : असगणी येथील महादेव मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या कमानी कामाचे भूमिपूजन नुकतेच झाले. यावेळी सरपंच अनंत मायनाक, माजी सरपंच श्रीकांत फडकले, गंगाराम इप्ते, संजय बुरटे, बंडू आंब्रे आदी उपस्थित होते. मनसेचे कामगार सरचिटणीस संदीप फडकले यांच्या माध्यमातून ही कमान उभारण्यात आली आहे.

पगार रखडले

रत्नागिरी : जिल्ह्यातील ४३ माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच कोकण विभागातील जिल्ह्यांना आवश्यक वेतन अनुदानही अद्याप मिळालेले नाही.

उद्रेक वाढला

देवरुख : सध्या संगमेश्वर तालुक्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. त्याचप्रमाणे कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच आरोग्य यंत्रणेत अपुरे मनुष्यबळ असल्याने या यंत्रणेलाही तारेवरची कसरत करावी लागत आहे.

उन्हाचा पारा चढतोय

मंडणगड : एप्रिल महिना संपत आला असल्याने आता उष्म्याची तीव्रता अधिक वाढू लागली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने सर्वत्र लॉकडाऊन सुरू असतानाच आता उष्माही मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. सामान्य नागरिक घरात असले, तरी आरोग्य यंत्रणा, शासकीय तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी बाहेर फिरत असल्याने त्यांना उन्हाचा त्रास होऊ लागला आहे.

कोरोना अहवालाला विलंब

रत्नागिरी : कोरोनाच्या आरटीपीसीआर तसेच अ‍ॅन्टिजेन चाचण्या सध्या सुरू झाल्या आहेत. काही आस्थापना तसेच शासकीय कार्यालयांकरिता कोरोना चाचण्या सक्तीच्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढू लागली आहे. मात्र त्या तुलनेत चाचण्यांसाठी असलेली यंत्रे कमी असल्याने या चाचण्यांचे अहवाल येण्यास विलंब होत आहे.