शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Ratnagiri Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला सश्रम कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 18:18 IST

रत्नागिरी : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर कोल्हापूर येथे लैंगिक अत्याचार ...

रत्नागिरी : सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर कोल्हापूर येथे लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार २०२३मध्ये घडला हाेता. याप्रकरणी आरोपी रुपेश महादेव गुरव (वय ३१, रा. गोंडेसकल-गुरववाडी, लांजा) याला न्यायालयाने मंगळवारी २० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.पीडितेची तिच्या आईच्या फेसबुक खात्यावरून रुपेश गुरव याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीतून रुपेशने पीडितेला ‘तुला विशाळगड फिरायला घेऊन जाताे,’ असे सांगितले. त्यानंतर १ मे २०२३ रोजी ताे पीडितेला आपल्या दुचाकीवरून कोल्हापूर येथील एअरटेल टॉवर माने कॉलनी करवीर येथील एका खाेलीवर घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले.याप्रकरणी देवरुख पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करून तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ॲड. मेघना नलावडे यांनी १० साक्षीदार तपासले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी आरोपीला सश्रम कारावास ठाेठावला आहे. या खटल्यात मुख्य कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलिस हवालदार वर्षा चव्हाण यांनी व पोलिस उपनिरीक्षक योगेश खोंडे यांनी काम पाहिले.

अशी ठाेठावली शिक्षाभारतीय दंड विधान कायदा कलम ३६३ मध्ये ३ वर्ष कारावास आणि २ हजार दंड, ३७६ (२) (जे) मध्ये ७ वर्ष कारावास व २ हजार दंड, ३७६ (३) मध्ये २० वर्ष कारावास आणि ५ हजार रुपये दंड तसेच पोक्सो ४ मध्ये २० वर्ष कारावास व ५ हजार दंड आणि पोक्सो ८ मध्ये ३ वर्ष कारावास आणि २ हजार रुपये दंड अशी २० वर्ष सश्रम कारावास ठाेठावला आहे. तसेच १६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी १२ हजार दंड पीडितेला देण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय