शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

महिलांसाठी महाराष्ट्रातील पहिला खेकडा बीजोत्पादन प्रकल्प रत्नागिरीत : उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 16:06 IST

सिंधुरत्न योजनेअंतर्गत जिल्ह्यात विविध योजना राबविणार असल्याची दिली माहिती.

रत्नागिरी : सिंधुरत्न योजनेअंतर्गत महिलांसाठी महाराष्ट्रातील पहिला खेकडा बीजोत्पादन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील १०० महिलांसाठी हा प्रकल्प उभारला जाणार आहे. ४ कोटी खर्चाच्या या प्रकल्पातील मच्छिविक्रेत्या महिलांना ५० किलोमीटरच्या क्षेत्रात फिरता यावे, यासाठी ७५ हजार रुपयांपर्यंत स्कूटर अनुदान स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहे. याचबरोबर जिल्ह्यातील आंबा बागायतदार, मच्छिमार, शेतकरी यांच्यासाठी विविध योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री सामंत यांनी शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनासोबत बैठक आयोजित केली होती. यावेळी घेण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती देण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.

जिल्ह्यातील आंबा बागायतदार यांना चार मालवाहतूक व्हॅन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला पणन विभागाकडे दाेन व्हॅन देण्यात येणार असून त्या कशा चालतात, याचे निरीक्षण केल्यानंतर उर्वरित दोन दिल्या जातील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. यंदा आंब्याचे उत्पन्न कमी आल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत कृषी विभागाशी चर्चा करून त्यांना मदत करण्याबाबत निश्चित विचार होईल, असे ते म्हणाले. जिल्ह्यातील जे शेतकरी भात, नाचणी किंवा मसाला लागवड करू इच्छितात, त्यांना मोफत बियाणे देण्याची योजनाही सिंधुरत्न योजनेतून राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बचत गटाच्या महिलांना दूध संकलन व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी सिंधुरत्न योजनंअंतर्गत २ कोटींचा दूध संकलन प्रकल्प जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे, अशी माहितीही मंत्री सामंत यांनी दिली. तसेच सिंधुरत्न योजनेतून पर्यटनवाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत, त्यादृष्टीने मालगुंड येथील प्राणिसंग्रहालयासाठी सतत पाठपुरावा करण्यात येत होता. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारकडून या प्राणिसंग्रहालयासाठी एक कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहितीही मंत्री सामंत यांनी यावेळी दिली.

रत्नागिरी जिल्ह्यात हळदीचे उत्पादन चांगल्याप्रकारे घेतले जात आहे. त्यादृष्टीने दापोली येथे संशोधन केंद्राचे उपकेंद्र करावे, अशी माागणी करण्यात आल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरी