शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

महिलांसाठी महाराष्ट्रातील पहिला खेकडा बीजोत्पादन प्रकल्प रत्नागिरीत : उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 16:06 IST

सिंधुरत्न योजनेअंतर्गत जिल्ह्यात विविध योजना राबविणार असल्याची दिली माहिती.

रत्नागिरी : सिंधुरत्न योजनेअंतर्गत महिलांसाठी महाराष्ट्रातील पहिला खेकडा बीजोत्पादन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील १०० महिलांसाठी हा प्रकल्प उभारला जाणार आहे. ४ कोटी खर्चाच्या या प्रकल्पातील मच्छिविक्रेत्या महिलांना ५० किलोमीटरच्या क्षेत्रात फिरता यावे, यासाठी ७५ हजार रुपयांपर्यंत स्कूटर अनुदान स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहे. याचबरोबर जिल्ह्यातील आंबा बागायतदार, मच्छिमार, शेतकरी यांच्यासाठी विविध योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री सामंत यांनी शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनासोबत बैठक आयोजित केली होती. यावेळी घेण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती देण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.

जिल्ह्यातील आंबा बागायतदार यांना चार मालवाहतूक व्हॅन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला पणन विभागाकडे दाेन व्हॅन देण्यात येणार असून त्या कशा चालतात, याचे निरीक्षण केल्यानंतर उर्वरित दोन दिल्या जातील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. यंदा आंब्याचे उत्पन्न कमी आल्याचे बागायतदारांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत कृषी विभागाशी चर्चा करून त्यांना मदत करण्याबाबत निश्चित विचार होईल, असे ते म्हणाले. जिल्ह्यातील जे शेतकरी भात, नाचणी किंवा मसाला लागवड करू इच्छितात, त्यांना मोफत बियाणे देण्याची योजनाही सिंधुरत्न योजनेतून राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बचत गटाच्या महिलांना दूध संकलन व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी सिंधुरत्न योजनंअंतर्गत २ कोटींचा दूध संकलन प्रकल्प जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे, अशी माहितीही मंत्री सामंत यांनी दिली. तसेच सिंधुरत्न योजनेतून पर्यटनवाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत, त्यादृष्टीने मालगुंड येथील प्राणिसंग्रहालयासाठी सतत पाठपुरावा करण्यात येत होता. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारकडून या प्राणिसंग्रहालयासाठी एक कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहितीही मंत्री सामंत यांनी यावेळी दिली.

रत्नागिरी जिल्ह्यात हळदीचे उत्पादन चांगल्याप्रकारे घेतले जात आहे. त्यादृष्टीने दापोली येथे संशोधन केंद्राचे उपकेंद्र करावे, अशी माागणी करण्यात आल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरी