शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

त्रिकुटामुळे महाराष्ट्र गुजरातपुढे नतमस्तक, जयंत पाटील यांचे टीकास्त्र

By संदीप बांद्रे | Updated: November 8, 2024 17:31 IST

मोदींच्या खोट्या योजनांनी जनतेला फसवले

चिपळूण : महाराष्ट्रातले १७ मोठे प्रकल्प गुजरातमध्ये  गेले, अनेक महत्वाचे कार्यालये स्थलांतरित केली. लाखो तरुणांचा रोजगार पळवला, तरी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे त्रिकुट एक शब्द देखील काढायला तयार नाही. मोदी आणि शहा समोर ते नतमस्तक झाले आहेत. महाराष्ट्र गुजरातला आंदण दिला आहे. त्यातून महाराष्ट्राची अधोगती सुरु झाली आहे. दरडोई उत्पन्नातही घसरले आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. प्रत्येक पातळीवर सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे महायुती सरकारचे वाभाडे काढत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्याचे आवाहन केले.चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या प्रचारार्थ चिपळूण शहरातील इंदिरा गांधी संस्कृतीक केंद्रासमोरील मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करण्यासाठी माजी मंत्री राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. सभेत जयंत पाटील यांनी पक्षफुटी तसेच भाजपवर जोरदार निशाणा साधला.ते म्हणाले की, आधी ज्यांनी घोटाळे केले तेच आज भाजप बरोबर सरकारमध्ये मंत्री बनले आहेत. नवाब मलिक यांच्यावर चक्क देशद्रोहाचे आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. तेच नवाब मलिक आज भाजप महायुतीचे उमेदवार आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्या मुलीला देखील महायुतीने उमेदवारी दिली आहे. एकवर एक फ्री योजना सुरू आहे. म्हणजेच खोटेनाटे आरोप करायचे, जेलमध्ये टाकायचे, नंतर त्यांना बाहेर काढून आपल्या पक्षाकडे घ्यायचे ही भाजपचे सत्तेचे समीकरण राहिले आहे, असा थेट आरोप जयंत पाटील यांनी केला. छगन भुजबळ यांच्या एका मुलाखतीचा दाखला देत जयंत पाटील म्हणाले छगन भुजबळ स्वतः म्हणालेत की, आम्हाला भाजप बरोबर जावे लागले. जर गेलो नसतो, तर आमच्यावर ईडी, इन्कमटॅक्स असे विविध कारवाई झाली असती आणि जेलमध्ये बसावे लागले असते. पुन्हा जेलमध्ये जाण्याची भीती वाटत होती. तेव्हा या कारवाया टाळण्यासाठी आम्हाला जावे लागले. जे जे भाजप बरोबर गेले त्यांच्यावर कारवाई होणार होती. त्याभीती पोटी ते लोक चक्क भापला शरण गेले, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.महागाई, बेरोजगारीने उच्चांक गाठला मी राज्याचा अर्थमंत्री असताना महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न देशाच्या तुलनेत १५ टक्के होते. आता ते १३ टक्क्यांवर आले आहे. दोन टक्के दरडोई उत्पन्न घटने म्हणजे लाखों कोटी रुपये उत्पन्न घटले आहे. जे स्वतः महाराष्ट्राचे उत्पन्न होते त्यामध्ये झालेली घट ही गंभीर आहे. महागाई आणि बेरोजगारीने तर महाराष्ट्रात उच्चांक गाठला आहे. महिला अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. महाराष्ट्र अधोगतीकडे चालला आहे. तरी देखील सरकार ढिम्म आहे, असा थेट आरोप देखील यावेळी जयंत पाटील यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४chiplun-acचिपळूणJayant Patilजयंत पाटीलMahayutiमहायुतीGujaratगुजरातthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024