शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

शीळ धरणात कमी पाणीसाठा; रत्नागिरी शहरात येत्या सोमवारपासून एक दिवसा आड पाणीपुरवठा

By मेहरून नाकाडे | Updated: May 10, 2024 18:04 IST

रत्नागिरी : रत्नागिरी शहराला सद्यस्थितीत एकमेव ‘शीळ’ धरणावरून पाणी पुरवठा सुरू आहे. वाढत्या उष्म्यामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने ...

रत्नागिरी : रत्नागिरी शहराला सद्यस्थितीत एकमेव ‘शीळ’ धरणावरूनपाणी पुरवठा सुरू आहे. वाढत्या उष्म्यामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने धरणातीलपाणीसाठा खालावत आहे. मान्सून पर्यंत नागरिकांना पाणीपुरवठा पुरेसा करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेतर्फे सोमवार दि. १३ मे पासून एक दिवसा आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.‘अल निनो’ या समुद्र प्रवाहाच्या सक्रियेतूचा यावर्षीच्या पर्जन्यमानावर परिणाम झाला आहे. गतवर्षी सरासरी पर्जन्यमान झाल्यामुळे शीळधरणात कमी पाणीसाठा झाला होता. शिवाय उष्मा वाढल्यामुळे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. सध्या शीळ धरणात ०.८१४ दशलक्षघनमीटर इतका उपयुक्त म्हणजेचे २० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.यावर्षी मान्सूनचे आगमन विलंबाने झाल्यास व धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आल्यास दुसरा कोणताही जलस्त्रोत किंवा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे भीषण पाणटंचाई उद्भवू शकते. नागरिकांना पाणी टंचाईची झळ बसू नये यासाठी एक दिवसा आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरणWaterपाणी