शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

नारळ टोळीला कायद्याच्या बडग्याने वठणीवर आणूया : मारुती खेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:32 IST

राजापूर : नारळ ठेवून शपथा घ्यायला लावणारी मंडळी कोण हे राजापूर तालुक्यातील ग्रामस्थांना चांगलेच ठावूक आहे. जोवर या नारळ ...

राजापूर : नारळ ठेवून शपथा घ्यायला लावणारी मंडळी कोण हे राजापूर तालुक्यातील ग्रामस्थांना चांगलेच ठावूक आहे. जोवर या नारळ टोळीवर कारवाईचा बडगा दाखवून वठणीवर आणण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत तोपर्यंत भावी पिढीचे भवितव्य दोलायमानच राहणार असल्याची खरमरीत टीका शिवसेनेचे मुंबईतील माजी नगरसेवक व ओणीतील रहिवासी मारुती खेडकर यांनी केली आहे.

तालुक्यातील समाजसेवक, समाजसेवी संघटना, ग्रामपंचायती या सर्वांनी आपले उग्ररूप दाखविण्यास सुरूवात केली तर या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना पळताभुई थोडी होईल. प्रकल्प समर्थक लोकशाही मार्गाने आपला लढा लढत आहेत तर प्रकल्पविरोधक गावकाराला हाताशी धरून स्थानिक ग्रामस्थांना नारळावर हात ठेवून शपथ घेण्यास लावत आहेत. असे करणारे गावकार विघ्नसंतोषी असून, एकविसाव्या शतकात सुज्ञ बनलेल्या तरूण व गावकऱ्यांनीच याला यापुढे विरोध केला पाहिजे. तुमच्या पाठीशी रिफायनरी प्रकल्प समन्वय समिती आहे, असे खेडकर यांनी म्हटले आहे.

रिफायनरी प्रकल्प हा आपल्या भावी पिढीचे भवितव्य ठरविणारा प्रकल्प आहे हे विसरून चालणार नाही. हा लढा एकट्याचा नाही. संपूर्ण तालुकावासीयांचा आहे. एमआयडीसीसाठी आधीच २,३०० एकरची अधिसूचना निघालेली आहे तर रिफायनरीसाठी लागणारी अतिरिक्त जमीन स्थानिक जमीनदार देण्यास तयार आहेत. आपण संघटीतरित्या विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे. प्रकल्प समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार यांच्या खांद्याला खांदा लावून आपली एकजूट अखंड ठेवावी. प्रकल्प आपला आहे व आपलाच राहील अशीही गर्जना खेडकर यांनी केली आहे.