शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जाेर ओसरला; नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या खाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 15:39 IST

गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस

रत्नागिरी : जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे इशारा पातळीच्यावर पाेहाेचलेल्या जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळीही कमी झाली आहे. संगमेश्वरातील शास्त्री नदी व राजापुरातील अर्जुना नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आली असून, खेडमधील जगबुडी नदीचे पाणी मात्र अजूनही इशारा पातळीवरच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ७२.६७ टक्के (२४४४.७२ मिलीमीटर) पाऊस पडला आहे.हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ दिला असतानाच शुक्रवारपासून पावसाचा जाेर काहीसा कमी झाला आहे. रविवारीही सकाळपासून पावसाने उसंत घेतली हाेती. मुसळधार काेसळणाऱ्या पावसामुळे संगमेश्वरातील शास्त्री नदी, राजापुरातील अर्जुना नदी आणि खेडमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली हाेती. या नद्यांचे पाणी इशारा पातळीच्यावर पाेहाेचले हाेते. त्यामुळे संगमेश्वर, खेड आणि राजापुरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली हाेती.मात्र, शुक्रवारपासून पावसाचा जाेर ओसरला असून, सरीवर पाऊस काेसळत आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीतही घट झाली आहे. पावसाचा जाेर ओसरल्याने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

शास्त्री आणि अर्जुना नदीचे पाणी इशारा पातळीच्या खाली आले आहे. मात्र, जगबुडी नदीचे पाणी अजूनही इशारा पातळीवरच आहे. रविवारी दुपारी १२ वाजता या नदीचे पाणी ५.५० मीटरपर्यंत पाेहाेचले हाेते. नदीचे पाणी ओसरत असल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

गतवर्षीपेक्षा जास्त पाऊसजिल्ह्यात १ जूनपासून काेसळलेल्या पावसाने गतवर्षीपेक्षा जास्त सरासरी गाठली आहे. यावर्षी १ जूनपासून २८ जुलैपर्यंत सरासरी २४४४.७२ मिलीमीटर म्हणजेच ७२.६७ टक्के पाऊस पडला आहे. मात्र, गतवर्षी याच कालावधीत सरासरी २०५८.२६ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली हाेती. त्यावेळी ६१.१८ टक्के पाऊस पडला हाेता. यावर्षी आतापर्यंत ११.४९ टक्के जास्त पाऊस पडला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसriverनदी