शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

लांजा : वीज पडून, वाहिनी तुटून तीन जनावरे ठार, गुराखी जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 17:13 IST

गेली दोन दिवस विजांचा कडकडाट सह आणि ढगांचा गडगडाटीसह कोसळणार्या परतीच्या पावसाने लांजा तालुक्याला चांगलाच फटका बसला आहे. तालुक्यातीँल माचाळ या  ठिकाणी पडलेल्या विजेने तिन जनावरे जागीच

ठळक मुद्देशेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले घटनेचा पंचनामा करण्यात आला.

लांजा : गेली दोन दिवस विजांचा कडकडाट सह आणि ढगांचा गडगडाटीसह कोसळणार्या परतीच्या पावसाने लांजा तालुक्याला चांगलाच फटका बसला आहे. तालुक्यातीँल माचाळ या  ठिकाणी पडलेल्या विजेने तिन जनावरे जागीच ठार गुराखी गंभीर जखमी झाला. लांजा भटवाडी येथे वादळी वाऱ्याने विद्युत वाहिन्या तुटून दोन गायी व एक वासराचा जागीच मृत्यू झाल्याच्या दोन घटना शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान घडल्या. तालुक्यात  दोन ठिकाणी घडलेल्या घटनांनी संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले  आहेत अशी सहा गुरे दगावली आहेत.       

सायंकाळच्याच दरम्यान गेले दोन दिवस ढगांच्या गडगडाटी व वादळी वाऱ्यासह मुसळधार पडणाऱ्या पावसाने साऱ्याचीच तारांबळ उडवली आहे. वादळी पावसामुळे भातशेती जमीनदोस्त होत आहे. त्यामुळे हाताशी आलेले भातपिक गमावण्याची भितीही शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. भात शेतीसह वादळी पावसाने तालुक्यातील शेतकऱ्याची जनावरे दगावल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या वादळी पावसाने लांजा तालुक्यातील माचाळ पाटीलवाडी येथील शिवाजी खंडू पाटील हे माळराणावर आपली गुरे घेऊन चारण्यासाठी दुपारी ३.३० वाजता घेऊन गेले होते.

दरम्यान शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान पडलेल्या वादळी पावसामध्ये अचानक तीन गुरांवर विज पडली. यामध्ये एक रेडा व दोन म्हैसी जागीच ठार झाल्या तर गुरांच्या शेजारीच उभे असलेले शिवाजी पाटील यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला यामध्ये पाटील हे बेशुद्धावस्थेत खाली पडले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाटील यांना उपचारासाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये  दाखल केले. मात्र पाटील यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना रत्नागरी येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पालू ग्रामपंचायतीचे सरपंच सुहास नामे, उपसरपंच भारत कांबळे, मंडल अधाकारी, कृषी अधिकारी व तलाठी आर.आर खेडेकर व ग्रामपंचायत सदस्यांनी भेट दिली.या घटनेचा पंचनामा केला असता  ७० ते ८० हजाराचे नुकसान झाले आहे.

 लांजा शहरातील भटवाडी येथील ह्रषिकेश गोखले या शेतकऱ्याच्या दोन गाभण गायी व एक वासरु अशी तीन जनावरे महावितरणची विद्युत वाहिनी तुटून पडून जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. यामध्ये गोखले यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मृत झालेल्या गायी या गिरी जातीच्या होत्या. सकाळी नियमीत गुरे चारण्यासाठी महिला स्वतः कंपाऊडचा दरवाजा उघडून गुरांना पुढे पाठवत असे. मात्र सकाळी गुरांना सोडल्यानंत्तर गुरे कंपाऊंडकडे गेली आणि नकळत जमिनीवर पडलेल्या महावितरणच्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने दोन गायी व एक पाडा ठार झाल्या. यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. या घटनेची ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोनवरुन माहिती दिली.मात्र दोन तास झाले तरी महावितरणचे अधिकारी घटनास्थळी पोहचले नव्हते. उशिराने दाखल झालेल्या  अधिकाऱ्यांना  ग्रामस्थांनी  चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर घटनेचा पंचनामा करण्यात आला. या घटनेची खबर मिळताच नगराध्यक्ष सुनिल तथा राजू कुरूप , नगरसेविका प्रणिता बोडस आदीसह ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते .  

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी