शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

लांजा : वीज पडून, वाहिनी तुटून तीन जनावरे ठार, गुराखी जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 17:13 IST

गेली दोन दिवस विजांचा कडकडाट सह आणि ढगांचा गडगडाटीसह कोसळणार्या परतीच्या पावसाने लांजा तालुक्याला चांगलाच फटका बसला आहे. तालुक्यातीँल माचाळ या  ठिकाणी पडलेल्या विजेने तिन जनावरे जागीच

ठळक मुद्देशेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले घटनेचा पंचनामा करण्यात आला.

लांजा : गेली दोन दिवस विजांचा कडकडाट सह आणि ढगांचा गडगडाटीसह कोसळणार्या परतीच्या पावसाने लांजा तालुक्याला चांगलाच फटका बसला आहे. तालुक्यातीँल माचाळ या  ठिकाणी पडलेल्या विजेने तिन जनावरे जागीच ठार गुराखी गंभीर जखमी झाला. लांजा भटवाडी येथे वादळी वाऱ्याने विद्युत वाहिन्या तुटून दोन गायी व एक वासराचा जागीच मृत्यू झाल्याच्या दोन घटना शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान घडल्या. तालुक्यात  दोन ठिकाणी घडलेल्या घटनांनी संबंधित शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले  आहेत अशी सहा गुरे दगावली आहेत.       

सायंकाळच्याच दरम्यान गेले दोन दिवस ढगांच्या गडगडाटी व वादळी वाऱ्यासह मुसळधार पडणाऱ्या पावसाने साऱ्याचीच तारांबळ उडवली आहे. वादळी पावसामुळे भातशेती जमीनदोस्त होत आहे. त्यामुळे हाताशी आलेले भातपिक गमावण्याची भितीही शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. भात शेतीसह वादळी पावसाने तालुक्यातील शेतकऱ्याची जनावरे दगावल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या वादळी पावसाने लांजा तालुक्यातील माचाळ पाटीलवाडी येथील शिवाजी खंडू पाटील हे माळराणावर आपली गुरे घेऊन चारण्यासाठी दुपारी ३.३० वाजता घेऊन गेले होते.

दरम्यान शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान पडलेल्या वादळी पावसामध्ये अचानक तीन गुरांवर विज पडली. यामध्ये एक रेडा व दोन म्हैसी जागीच ठार झाल्या तर गुरांच्या शेजारीच उभे असलेले शिवाजी पाटील यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला यामध्ये पाटील हे बेशुद्धावस्थेत खाली पडले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाटील यांना उपचारासाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये  दाखल केले. मात्र पाटील यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना रत्नागरी येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पालू ग्रामपंचायतीचे सरपंच सुहास नामे, उपसरपंच भारत कांबळे, मंडल अधाकारी, कृषी अधिकारी व तलाठी आर.आर खेडेकर व ग्रामपंचायत सदस्यांनी भेट दिली.या घटनेचा पंचनामा केला असता  ७० ते ८० हजाराचे नुकसान झाले आहे.

 लांजा शहरातील भटवाडी येथील ह्रषिकेश गोखले या शेतकऱ्याच्या दोन गाभण गायी व एक वासरु अशी तीन जनावरे महावितरणची विद्युत वाहिनी तुटून पडून जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. यामध्ये गोखले यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मृत झालेल्या गायी या गिरी जातीच्या होत्या. सकाळी नियमीत गुरे चारण्यासाठी महिला स्वतः कंपाऊडचा दरवाजा उघडून गुरांना पुढे पाठवत असे. मात्र सकाळी गुरांना सोडल्यानंत्तर गुरे कंपाऊंडकडे गेली आणि नकळत जमिनीवर पडलेल्या महावितरणच्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने दोन गायी व एक पाडा ठार झाल्या. यामध्ये शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. या घटनेची ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोनवरुन माहिती दिली.मात्र दोन तास झाले तरी महावितरणचे अधिकारी घटनास्थळी पोहचले नव्हते. उशिराने दाखल झालेल्या  अधिकाऱ्यांना  ग्रामस्थांनी  चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर घटनेचा पंचनामा करण्यात आला. या घटनेची खबर मिळताच नगराध्यक्ष सुनिल तथा राजू कुरूप , नगरसेविका प्रणिता बोडस आदीसह ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते .  

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी