शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

कोकण तीन लाख कोटीच्या प्रकल्पाला मुकणार, कंपनीचा नाणारला गुडबाय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 13:31 IST

nanar refinery project Ratnagiri : तालुक्यातील बारसू - सोलगांव येथील जागेसाठी रिफायनरी कंपनीचे अखेरचे प्रयत्न सुरू असून यात देखील अपयश आल्यास कंपनी महाराष्ट्राच्या बाहेर प्रकल्प नेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

ठळक मुद्देनाणार प्रकल्प : रत्नागिरी रिफायनरी कंपनीचा नाणारला गुडबाय ! बारसू, सोलगांवमध्येशेवटचा प्रयत्नः अन्यथा गाशा गुंडाळणार

राजापूरः गेली दोन वर्षे राजकीय धुळवड उडवून राजापूर तालुक्याला राज्याच्या नकाशावर आणणाऱ्या नाणार येथील सात महसूली गावांतील चौदा वाड्यांना अखेर रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प कंपनीने बाय - बाय केले आहे. यामुळे शिवसेनेच्या दृष्टीने नाणार विषय संपलेला असतानाच आता रत्नागिरी रिफायनरी कंपनीनेही नाणारमधील जागेचा विषय संपुष्टात आणला आहे. दरम्यान तालुक्यातील बारसू - सोलगांव येथील जागेसाठी रिफायनरी कंपनीचे अखेरचे प्रयत्न सुरू असून यात देखील अपयश आल्यास कंपनी महाराष्ट्राच्या बाहेर प्रकल्प नेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

नाणारमधील पूर्वी प्रस्तावित असलेल्या चौदा गावांतील तब्बल साडेआठ हजार एकराचे जमीनमालक असलेल्या शेतकरी व भूधारकांनी त्या भागात रिफायनरी व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न करून शासनापर्यंत लेखी संमतीपत्रे पोहोचवली होती. मात्र उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख असताना जाहिर केलेली नाणार विरोधाची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही कायम ठेवल्याने अखेर रत्नागिरी रिफायनरी कंपनीने या जागेतून काढता पाय घेतला आहे. यामुळे नाणार होणार नाही हा शिवसेनेचा मनसुबा खरा ठरून शिवसेनेच्या नेतेमंडळींनी बाजी मारली आहे.

दरम्यान नाणारनंतर राजापूर तालुक्यातीलच शहरानजिकच्या बारसू - व सोलगांव याठिकाणच्या जागेत रिफायनरी कंपनीने आपला मोर्चा वळवला आहे. याठिकाणी शिवसेनेच्याच उद्योगमंत्र्यांनी एमआयडीसी अंतर्गत बारसू , सोलगांव , वरचीवाडी याठिकाणी २३०० एकरासाठी अधिसूचना काढलेली आहे. तर धोपेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील बारसू , पन्हळे , गोवळ ग्रामपंचायत हद्दीतील गोवळ , वरचीवाडी व खालचीवाडी, ग्रामपंचायत सोलगांव ग्रामपंचायत शिवणेखुर्द व देवाचेगोठणे ग्रामपंचायत हद्दीतील देवाचेगोठणे, बुरंबेवाडी, राऊतवाडी व सोगमवाडी आदि भाग मिळून सुमारे ११ हजार पाचशे एकर जमीनीची उपलब्धता आहे.

याठिकाणी धोपेश्वर गावची जमीन प्रस्तावित नाही. शिवाय विशेष म्हणजे तब्बल या साडेअकरा हजार एकरात एकाही गाव अथवा वाडीचे विस्थापन नसल्याने रिफायनरी कंपनीसाठी ही बाब लाभदायक ठरली आहे. नजिकच्या एक - दोन महिन्यात बारसू - सोलगांव भागात नाग रिकांच्या गाठीभेटी घेऊन प्रकल्पाबाबत माहिती देण्यात येणार आहे. या भागातही बऱ्याच ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात असल्याने सेनेची भूमिक महत्वाची ठरणार आहे . मात्र याठिकाणीही नाणारचीच री ओढण्यात आल्यास कंपनी जिल्ह्यातून गाशा गुंडाळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत .

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRajapurराजापुरRatnagiriरत्नागिरीShiv Senaशिवसेना