शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

कोकण तीन लाख कोटीच्या प्रकल्पाला मुकणार, कंपनीचा नाणारला गुडबाय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 13:31 IST

nanar refinery project Ratnagiri : तालुक्यातील बारसू - सोलगांव येथील जागेसाठी रिफायनरी कंपनीचे अखेरचे प्रयत्न सुरू असून यात देखील अपयश आल्यास कंपनी महाराष्ट्राच्या बाहेर प्रकल्प नेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

ठळक मुद्देनाणार प्रकल्प : रत्नागिरी रिफायनरी कंपनीचा नाणारला गुडबाय ! बारसू, सोलगांवमध्येशेवटचा प्रयत्नः अन्यथा गाशा गुंडाळणार

राजापूरः गेली दोन वर्षे राजकीय धुळवड उडवून राजापूर तालुक्याला राज्याच्या नकाशावर आणणाऱ्या नाणार येथील सात महसूली गावांतील चौदा वाड्यांना अखेर रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प कंपनीने बाय - बाय केले आहे. यामुळे शिवसेनेच्या दृष्टीने नाणार विषय संपलेला असतानाच आता रत्नागिरी रिफायनरी कंपनीनेही नाणारमधील जागेचा विषय संपुष्टात आणला आहे. दरम्यान तालुक्यातील बारसू - सोलगांव येथील जागेसाठी रिफायनरी कंपनीचे अखेरचे प्रयत्न सुरू असून यात देखील अपयश आल्यास कंपनी महाराष्ट्राच्या बाहेर प्रकल्प नेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

नाणारमधील पूर्वी प्रस्तावित असलेल्या चौदा गावांतील तब्बल साडेआठ हजार एकराचे जमीनमालक असलेल्या शेतकरी व भूधारकांनी त्या भागात रिफायनरी व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न करून शासनापर्यंत लेखी संमतीपत्रे पोहोचवली होती. मात्र उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख असताना जाहिर केलेली नाणार विरोधाची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही कायम ठेवल्याने अखेर रत्नागिरी रिफायनरी कंपनीने या जागेतून काढता पाय घेतला आहे. यामुळे नाणार होणार नाही हा शिवसेनेचा मनसुबा खरा ठरून शिवसेनेच्या नेतेमंडळींनी बाजी मारली आहे.

दरम्यान नाणारनंतर राजापूर तालुक्यातीलच शहरानजिकच्या बारसू - व सोलगांव याठिकाणच्या जागेत रिफायनरी कंपनीने आपला मोर्चा वळवला आहे. याठिकाणी शिवसेनेच्याच उद्योगमंत्र्यांनी एमआयडीसी अंतर्गत बारसू , सोलगांव , वरचीवाडी याठिकाणी २३०० एकरासाठी अधिसूचना काढलेली आहे. तर धोपेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील बारसू , पन्हळे , गोवळ ग्रामपंचायत हद्दीतील गोवळ , वरचीवाडी व खालचीवाडी, ग्रामपंचायत सोलगांव ग्रामपंचायत शिवणेखुर्द व देवाचेगोठणे ग्रामपंचायत हद्दीतील देवाचेगोठणे, बुरंबेवाडी, राऊतवाडी व सोगमवाडी आदि भाग मिळून सुमारे ११ हजार पाचशे एकर जमीनीची उपलब्धता आहे.

याठिकाणी धोपेश्वर गावची जमीन प्रस्तावित नाही. शिवाय विशेष म्हणजे तब्बल या साडेअकरा हजार एकरात एकाही गाव अथवा वाडीचे विस्थापन नसल्याने रिफायनरी कंपनीसाठी ही बाब लाभदायक ठरली आहे. नजिकच्या एक - दोन महिन्यात बारसू - सोलगांव भागात नाग रिकांच्या गाठीभेटी घेऊन प्रकल्पाबाबत माहिती देण्यात येणार आहे. या भागातही बऱ्याच ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात असल्याने सेनेची भूमिक महत्वाची ठरणार आहे . मात्र याठिकाणीही नाणारचीच री ओढण्यात आल्यास कंपनी जिल्ह्यातून गाशा गुंडाळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत .

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRajapurराजापुरRatnagiriरत्नागिरीShiv Senaशिवसेना