शहरं
Join us  
Trending Stories
1
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
2
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
3
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
4
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
5
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
6
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
7
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
8
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
9
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
10
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
11
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
12
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
13
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
14
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
15
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
16
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
17
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
18
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
19
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
20
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट

Ratnagiri- फासकीत अडकून बिबटयाचा मृत्यू, गुरख्यांनी परस्पर लावली विल्हेवाट; तब्बल पंधरा दिवसांनी उघडकीस आला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 12:26 IST

वनविभागाने दोघा गुरख्यांना घेतले ताब्यात

विनोद पवार

राजापूर : तालुक्यातील खरवते गावात आंबा बागेत लावलेल्या फासकीत अडकून मृत्युमुखी पडलेल्या बिबटयाची बागेत काम करणाऱ्या दोन गुरख्यांनी खड्डयात पुरून परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार पुढे आला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली. वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत या प्रकाराची चौकशी सुरू केली असून दोघा गुरख्यांना ताब्यात घेतले आहे. खरवते हेदाडवाडी येथे हा प्रकार घडला असून सुमारे 15 दिवसापुर्वी या बिबटयाचा मृत्यु झालेला असावा अशी माहिती रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांनी दिली.राजेश पुरण चौधरी व जगतराम चौधरी (रा. तिकापूर जि. कैलाली (नेपाळ) या दोघा गुरख्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर वन्य जीव संरक्षण कायदा 1972  चे कलम 9, 39, 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे बागांमध्ये फासक्या लावून वन्य प्राण्यांचे जीव घेण्याचे प्रकार निंदनिय असल्याच्या संतप्त प्रतिक्रीया तालुक्यात उमटत असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.याबाबत माहिती अशी की, मौजे खरवते येथे नितीन व सुनील पद्माकर कुलकर्णी यांच्या मालकी गट नंबर १६/ आंबा बाग तुषार व तुळशीदास तात्या सोरप यांना करार तत्वावर दिली आहे. सोरप यांनी बाग राखणीकरता राजेश चौधरी व जगतराम चौधरी यांना ठेवले होते. बागेत साधारण पंधरा दिवसापूर्वी फासकिमध्ये अडकुन बिबट्या मृत झाला होता. कामगार राजेश चौधरी व जगतराम चौधरी यांनी या मृत बिबट्यास खड्डा काढून पुरले व त्याची परस्पर विल्हेवाट लावली. याबाबत राजापूरचे वनपाल सदानंद घाडगे यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता ही घटना उघडकीस आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी खड्डातून मृत बिबट्याला बाहेर काढून अवशेष ताब्यात घेत पशुसंवर्धन अधिकारी लांजा यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याची तपासणी करुन ताब्यात घेतले. 15 दिवस उलटून गेल्याने तो पुर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी कामगार राजेश चौधरी व जगतराम चौधरी या दोघा गुरख्यांना वन्य जीव संरक्षण कायदा 1972  चे कलम 9, 39, 51 अन्वये गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले.विभागीय वनाधिकारी दिपक खाडे  व सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, राजापूरचे वनपाल सदानंद घाडगे, वनरक्षक सुरज तेली, खरवते पोलिस पाटील सचिन सिताराम मांडवकर यांनी केली. पुढील तपास वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार करीत आहेत. अशा प्रकारे वन्यजीव अडचणीमध्ये सापडल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क करणे बाबत आवाहन वन विभागा मार्फत करण्यात आले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीleopardबिबट्याforest departmentवनविभागCrime Newsगुन्हेगारी