शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

Kerala Floods : रत्नागिरीतून मल्याळी, व्यापारी संघटनेची केरळसाठी धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 16:47 IST

रत्नागिरी येथील मल्याळी संघटना आणि व्यापारी संघटना यांच्या सहकार्याने केरळ आपत्तीग्रस्तांसाठी एकत्र केलेले धान्य व विविध वस्तू रूपातील मदत स्वतंत्र ट्रकमधून केरळकडे रवाना करण्यात आले.

ठळक मुद्देरत्नागिरीतून मल्याळी, व्यापारी संघटनेची केरळसाठी धावआपत्तीग्रस्तांसाठी धान्य अन् विविध वस्तूरुपातील मदत स्वतंत्र ट्रकमधून रवाना

रत्नागिरी : येथील मल्याळी संघटना आणि व्यापारी संघटना यांच्या सहकार्याने केरळ आपत्तीग्रस्तांसाठी एकत्र केलेले धान्य व विविध वस्तू रूपातील मदत स्वतंत्र ट्रकामधून केरळकडे रवाना करण्यात आले.केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून महापुराने थैमान घातले होते. या महापुरात अनेक घरे पाण्याखाली गेली होती. सुमारे ४०० लोकांचे बळी या महापुराने घेतले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तसेच आर्मीच्या सहाय्याने हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

या महापुराने या राज्यातील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत केलेच. पण, या पुरात येथील नागरिकांचे सर्व काही वाहून गेले. त्यामुळे या लोकांच्या खाण्या-पिण्याची, कपडा-लत्ता तसेच राहण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.या राज्यावर आलेल्या आपत्तीत य नागरिकांना सहकार्य करण्यासाठी देशातील तसेच देशाबाहेरील इतरही राष्ट्र धावून आली आहेत. केरळमधील अनेक लोक रत्नागिरीत कामानिमित्त वास्तव्याला आहेत. त्यांनी तत्काळ या लोकांसाठी मदत उभारली.

त्याला येथील व्यापारी संघटनेनेही आर्थिक हात दिला. त्यामुळे एक - दोन दिवसांतच तांदूळ, डाळी आदी धान्ये तसेच गरजेच्या इतर वस्तू मोठ्या प्रमाणावर जमा झाल्या. या वस्तूंनी भरलेला स्वतंत्र ट्रक गुरूवारी सायंकाळी केरळकडे रवाना झाला.सेवाभावी संस्थांकडून मदतभीषण महापुरामुळे बाधित झालेल्या केरळमधील जनतेला मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे तसेच सेवाभावी संस्थांकडून आर्थिक सहाय्यासह विविध स्वरुपात मदत पुरविण्यात येत आहे. केरळमधील आपत्तीग्रस्तांना मदत करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी आपली आर्थिक मदत बँक आॅफ महाराष्ट्रमधील राज्य शासनाच्या ६०३१२९७८१४९ या खाते क्रमांकावर Chief Minister Kerala Flood Relief Fund या नावाने धनादेश किंवा डीडी स्वरुपात पाठवावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.लोकमतचाही खारीचा वाटाकेरळ येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आपलाही हातभार या संघटनांसोबत लागावा, या उद्देशाने लोकमतच्या रत्नागिरी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनीही तांदूळ, डाळ, तेल, मसाला, हळद आदी पदार्थांची मदत करून खारीचा वाटा उचलला आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरRatnagiriरत्नागिरी