शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Kerala Floods : रत्नागिरीतून मल्याळी, व्यापारी संघटनेची केरळसाठी धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 16:47 IST

रत्नागिरी येथील मल्याळी संघटना आणि व्यापारी संघटना यांच्या सहकार्याने केरळ आपत्तीग्रस्तांसाठी एकत्र केलेले धान्य व विविध वस्तू रूपातील मदत स्वतंत्र ट्रकमधून केरळकडे रवाना करण्यात आले.

ठळक मुद्देरत्नागिरीतून मल्याळी, व्यापारी संघटनेची केरळसाठी धावआपत्तीग्रस्तांसाठी धान्य अन् विविध वस्तूरुपातील मदत स्वतंत्र ट्रकमधून रवाना

रत्नागिरी : येथील मल्याळी संघटना आणि व्यापारी संघटना यांच्या सहकार्याने केरळ आपत्तीग्रस्तांसाठी एकत्र केलेले धान्य व विविध वस्तू रूपातील मदत स्वतंत्र ट्रकामधून केरळकडे रवाना करण्यात आले.केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून महापुराने थैमान घातले होते. या महापुरात अनेक घरे पाण्याखाली गेली होती. सुमारे ४०० लोकांचे बळी या महापुराने घेतले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तसेच आर्मीच्या सहाय्याने हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

या महापुराने या राज्यातील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत केलेच. पण, या पुरात येथील नागरिकांचे सर्व काही वाहून गेले. त्यामुळे या लोकांच्या खाण्या-पिण्याची, कपडा-लत्ता तसेच राहण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.या राज्यावर आलेल्या आपत्तीत य नागरिकांना सहकार्य करण्यासाठी देशातील तसेच देशाबाहेरील इतरही राष्ट्र धावून आली आहेत. केरळमधील अनेक लोक रत्नागिरीत कामानिमित्त वास्तव्याला आहेत. त्यांनी तत्काळ या लोकांसाठी मदत उभारली.

त्याला येथील व्यापारी संघटनेनेही आर्थिक हात दिला. त्यामुळे एक - दोन दिवसांतच तांदूळ, डाळी आदी धान्ये तसेच गरजेच्या इतर वस्तू मोठ्या प्रमाणावर जमा झाल्या. या वस्तूंनी भरलेला स्वतंत्र ट्रक गुरूवारी सायंकाळी केरळकडे रवाना झाला.सेवाभावी संस्थांकडून मदतभीषण महापुरामुळे बाधित झालेल्या केरळमधील जनतेला मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे तसेच सेवाभावी संस्थांकडून आर्थिक सहाय्यासह विविध स्वरुपात मदत पुरविण्यात येत आहे. केरळमधील आपत्तीग्रस्तांना मदत करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी आपली आर्थिक मदत बँक आॅफ महाराष्ट्रमधील राज्य शासनाच्या ६०३१२९७८१४९ या खाते क्रमांकावर Chief Minister Kerala Flood Relief Fund या नावाने धनादेश किंवा डीडी स्वरुपात पाठवावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.लोकमतचाही खारीचा वाटाकेरळ येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आपलाही हातभार या संघटनांसोबत लागावा, या उद्देशाने लोकमतच्या रत्नागिरी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनीही तांदूळ, डाळ, तेल, मसाला, हळद आदी पदार्थांची मदत करून खारीचा वाटा उचलला आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरRatnagiriरत्नागिरी