शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Kerala Floods : रत्नागिरीतून मल्याळी, व्यापारी संघटनेची केरळसाठी धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 16:47 IST

रत्नागिरी येथील मल्याळी संघटना आणि व्यापारी संघटना यांच्या सहकार्याने केरळ आपत्तीग्रस्तांसाठी एकत्र केलेले धान्य व विविध वस्तू रूपातील मदत स्वतंत्र ट्रकमधून केरळकडे रवाना करण्यात आले.

ठळक मुद्देरत्नागिरीतून मल्याळी, व्यापारी संघटनेची केरळसाठी धावआपत्तीग्रस्तांसाठी धान्य अन् विविध वस्तूरुपातील मदत स्वतंत्र ट्रकमधून रवाना

रत्नागिरी : येथील मल्याळी संघटना आणि व्यापारी संघटना यांच्या सहकार्याने केरळ आपत्तीग्रस्तांसाठी एकत्र केलेले धान्य व विविध वस्तू रूपातील मदत स्वतंत्र ट्रकामधून केरळकडे रवाना करण्यात आले.केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून महापुराने थैमान घातले होते. या महापुरात अनेक घरे पाण्याखाली गेली होती. सुमारे ४०० लोकांचे बळी या महापुराने घेतले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तसेच आर्मीच्या सहाय्याने हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

या महापुराने या राज्यातील जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत केलेच. पण, या पुरात येथील नागरिकांचे सर्व काही वाहून गेले. त्यामुळे या लोकांच्या खाण्या-पिण्याची, कपडा-लत्ता तसेच राहण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.या राज्यावर आलेल्या आपत्तीत य नागरिकांना सहकार्य करण्यासाठी देशातील तसेच देशाबाहेरील इतरही राष्ट्र धावून आली आहेत. केरळमधील अनेक लोक रत्नागिरीत कामानिमित्त वास्तव्याला आहेत. त्यांनी तत्काळ या लोकांसाठी मदत उभारली.

त्याला येथील व्यापारी संघटनेनेही आर्थिक हात दिला. त्यामुळे एक - दोन दिवसांतच तांदूळ, डाळी आदी धान्ये तसेच गरजेच्या इतर वस्तू मोठ्या प्रमाणावर जमा झाल्या. या वस्तूंनी भरलेला स्वतंत्र ट्रक गुरूवारी सायंकाळी केरळकडे रवाना झाला.सेवाभावी संस्थांकडून मदतभीषण महापुरामुळे बाधित झालेल्या केरळमधील जनतेला मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे तसेच सेवाभावी संस्थांकडून आर्थिक सहाय्यासह विविध स्वरुपात मदत पुरविण्यात येत आहे. केरळमधील आपत्तीग्रस्तांना मदत करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी आपली आर्थिक मदत बँक आॅफ महाराष्ट्रमधील राज्य शासनाच्या ६०३१२९७८१४९ या खाते क्रमांकावर Chief Minister Kerala Flood Relief Fund या नावाने धनादेश किंवा डीडी स्वरुपात पाठवावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.लोकमतचाही खारीचा वाटाकेरळ येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आपलाही हातभार या संघटनांसोबत लागावा, या उद्देशाने लोकमतच्या रत्नागिरी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनीही तांदूळ, डाळ, तेल, मसाला, हळद आदी पदार्थांची मदत करून खारीचा वाटा उचलला आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरRatnagiriरत्नागिरी