शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मर्जीतील ठेकेदारामुळे कळवंडे धरणाचे काम निकृष्ट, भास्कर जाधवांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 12:39 IST

अधिकाऱ्यांना सुनावत दुरुस्तीचे काम दर्जेदार करण्याची सूचना केली

चिपळूण : कळवंडे धरण दुरुस्तीचे काम ठेकेदाराने निकृष्ट केले आहे. अनुभव नसलेल्या ठेकेदाराला काम देण्यात आले. ठेकेदार अधिकाऱ्यांच्या मर्जीतील असल्यानेच धरण दुरुस्तीची कामे निकृष्ट झाली आहेत. त्यातून धरणाला धोका पोहोचण्याचा संभव आहे, असा आरोप आमदार भास्कर जाधव तसेच ग्रामस्थांनी केला. मात्र, धरणाला कोणताही धोका नसून लवकरच दुरुस्तीची कामे योग्यप्रकारे मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.तालुक्यातील कळवंडे धरण दुरुस्तीवरून कळवंडे, कोंढे, शिरळ, पाचाड, मिरजोळी येथील ग्रामस्थ कमालीचे आक्रमक झाले आहेत. धरणाच्या सुरक्षेवरून मंगळवारी ग्रामस्थांची संयुक्त बैठक झाली होती. त्यानंतर बुधवारी आमदार भास्कर जाधव यांच्या पुढाकाराने कळवंडे धरणावर अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी करण्यात आली. या पाहणीसाठी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, चिपळूण विभागाचे उपअभियंता विपुल खोत, उद्योजक वसंत उदेग आणि परिसरातील ग्रामस्थ आले होते.यावेळी उद्योजक उदेग यांनीच अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. धरणाच्या दुरुस्तीसाठी वारंवार खर्च केला जातो. मर्जीतील ठेकेदाराला कामे दिली जातात. ही कामे करताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले जात नाही. निविदा प्रक्रियेत ठेकेदाराने कमी दराने काम घेतले आहे. त्यातून निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. धरणात पाणी असेल तरच लोक शेती करू शकतील, अन्यथा पाणीटंचाईमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, याची अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याचा इशारा दिला. भास्कर जाधव यांनीही अधिकाऱ्यांना सुनावत दुरुस्तीचे काम दर्जेदार करण्याची सूचना केली. अभियंते जगदीश पाटील व वैशाली नारकर यांनी ग्रामस्थांना धरण सुरक्षिततेची हमी दिली. धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. याशिवाय दुरुस्तीचे काम झाल्यानंतरच धरणात पाणीसाठा केला जाईल. तसेच मशिनरीमुळे जे रस्ते खराब झाले आहेत, त्यांचीही दुरूस्ती करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरणBhaskar Jadhavभास्कर जाधव