शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत ३० हजार कोटींचे प्रकल्प, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती; टेस्ला कोकणात यावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 15:49 IST

बारसू, नाणार येथे अन्य प्रकल्प आल्यास स्वागत करण्याची भूमिका तेथील लोकांनी घेतली आहे

रत्नागिरी : मायक्रो चीप तयार करणारा कारखाना, शस्त्रास्त्रांचा कारखाना आणि ड्रोन तयार करणारा कारखाना अशा उद्योगांमुळे रत्नागिरी तालुक्यात ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याची माहिती उद्योगमंत्री तथा पालकमंत्रीउदय सामंत यांनी दिली. बारसू, नाणार येथे अन्य प्रकल्प आल्यास स्वागत करण्याची भूमिका तेथील लोकांनी घेतली आहे. त्यामुळे तेथेही चांगला प्रकल्प आणण्याचे प्रयत्न आहेत, असेही ते म्हणाले.रत्नागिरीत दाेन प्रकल्प लवकरच सुरू होणार आहेत. आता ड्रोन तसेच सोलरमधील सेल तयार करणाऱ्या आरआरपी कंपनीने २०० एक जागेची मागणी केली आहे. त्यामुळे तो प्रकल्पही लवकरच रत्नागिरीत येईल, असे ते म्हणाले. या तीन प्रकल्पांमुळे काही काळातच रत्नागिरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कर्नाटकमध्ये शहाजी राजे यांचे स्मारक आहे. आपण लवकरच तेथे भेट देणार आहोत. त्याची डागडुजी करावी अन्यथा डागडुजी करण्यासाठी ते महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात द्यावे, अशी विनंती आपण कर्नाटक सरकारला करणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचे ११ किल्ले या यादीमध्ये समाविष्ट झाले आहेत. यावरूनच त्यांच्या कर्तृत्वाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात असल्याचे लक्षात येतो. त्यामुळे आपणही छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित स्मारकांच्या नूतनीकरणावर भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले.टेस्लाचा एखादा प्रकल्प कोकणात यावाटेस्ला कंपनीचा एखादा प्रकल्प कोकणातही व्हावा, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.विनय नातू कोण आहेत?भाजपचे माजी आमदार विनय नातू यांनी जिल्हा नियोजनच्या निधी वाटपावरून टीका केली आहे. त्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री सामंत यांनी विनय नातू यांना मी काय उत्तर देणार? कोण आहेत ते, असा प्रतिप्रश्न केला. ते आमदारही नाहीत आणि पदाधिकारीही नाहीत. मित्रपक्षाचे असतील तर भेटतील. पण मला उत्तर द्यावेसे वाटत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.