शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

रत्नागिरीत मनसेमध्ये धुमसतेय धुसफूस; अनेकांचा ‘जय महाराष्ट्र’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 18:45 IST

पदाधिकाऱ्यांमधील ताळमेळ विस्कळीत

रत्नागिरी : शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत गटबाजी अजूनही शमलेली नसून गटबाजी जाेर धरत आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली धुसफूस अजूनही संपलेली नसल्याने पदाधिकाऱ्यांची स्वतंत्रपणे वाटचाल सुरू आहे. पक्षातील या अंतर्गत गटबाजी आणि राजकारणामुळेच काहींनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्च २००६ मध्ये पक्षाची स्थापना केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांनी त्यांच्या पक्षाचा झेंडा हाती घेतला. मात्र, गेल्या १८ वर्षांत पक्षाने भरारी घेण्याऐवजी पक्षाला गळतीच अधिक लागली आहे. पक्ष वाढीसाठी कार्यरत राहणारे अनेक जुने-जाणते पक्षापासून दूर झाले आहेत. त्यातच रत्नागिरी शहरात अंतर्गत गटबाजीमुळे काेणाशी काेणाचे पटत नसल्याचे समाेर येत आहे. त्यामुळेच रत्नागिरीत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांना माेजकेच पदाधिकारी उपस्थित राहत आहेत.

पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये याेग्य ताळमेळ नसल्याने पक्षातील अनेकांनी पक्षाला साेडचिठ्ठी देऊन अन्य पक्षांचा आधार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत तर काहींनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सध्या माेजक्या पदाधिकाऱ्यांनी पक्षवाढीची धुरा सांभाळली आहे. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाची वाढ खुंटली आहे.

राज्य सरचिटणीसांचे दुर्लक्षखेड येथील वैभव खेडेकर राज्य सरचिटणीस म्हणून पक्षाची धुरा सांभाळत आहेत. मात्र, उत्तर रत्नागिरी वगळता त्यांनी जिल्ह्यातील अन्य भागात पक्षवाढीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यामुळे अन्य तालुक्यांमध्ये पक्ष वाढ खुंटली आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीवरही त्यांनी ‘उतारा’ काढलेला नाही.

एकमेकांकडे पाठरत्नागिरी शहरातील काही सामाजिक प्रश्न हाताळून पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या लढ्यात तालुका किंवा शहरातील पदाधिकारी काेठेच दिसत नाहीत. त्यातच शहराध्यक्षांनी कार्यक्रम घेतला तर तालुकाध्यक्ष नाही, तालुकाध्यक्षांनी कार्यक्रम घेतला तर जिल्हाध्यक्ष नाहीत, अशीच स्थिती आहे.

तालुकाध्यक्ष दूरचकाही दिवसांपूर्वी तालुकाध्यक्षांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला हाेता. पक्षातीलच पदाधिकाऱ्यांनी हा हल्ला केल्याचा आराेप त्यांनी केला हाेता. या घटनेनंतर तालुकाध्यक्ष पक्षापासून दूरच राहिले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणMNSमनसे