शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

रत्नागिरीत मनसेमध्ये धुमसतेय धुसफूस; अनेकांचा ‘जय महाराष्ट्र’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 18:45 IST

पदाधिकाऱ्यांमधील ताळमेळ विस्कळीत

रत्नागिरी : शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत गटबाजी अजूनही शमलेली नसून गटबाजी जाेर धरत आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली धुसफूस अजूनही संपलेली नसल्याने पदाधिकाऱ्यांची स्वतंत्रपणे वाटचाल सुरू आहे. पक्षातील या अंतर्गत गटबाजी आणि राजकारणामुळेच काहींनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्च २००६ मध्ये पक्षाची स्थापना केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांनी त्यांच्या पक्षाचा झेंडा हाती घेतला. मात्र, गेल्या १८ वर्षांत पक्षाने भरारी घेण्याऐवजी पक्षाला गळतीच अधिक लागली आहे. पक्ष वाढीसाठी कार्यरत राहणारे अनेक जुने-जाणते पक्षापासून दूर झाले आहेत. त्यातच रत्नागिरी शहरात अंतर्गत गटबाजीमुळे काेणाशी काेणाचे पटत नसल्याचे समाेर येत आहे. त्यामुळेच रत्नागिरीत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांना माेजकेच पदाधिकारी उपस्थित राहत आहेत.

पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये याेग्य ताळमेळ नसल्याने पक्षातील अनेकांनी पक्षाला साेडचिठ्ठी देऊन अन्य पक्षांचा आधार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत तर काहींनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सध्या माेजक्या पदाधिकाऱ्यांनी पक्षवाढीची धुरा सांभाळली आहे. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाची वाढ खुंटली आहे.

राज्य सरचिटणीसांचे दुर्लक्षखेड येथील वैभव खेडेकर राज्य सरचिटणीस म्हणून पक्षाची धुरा सांभाळत आहेत. मात्र, उत्तर रत्नागिरी वगळता त्यांनी जिल्ह्यातील अन्य भागात पक्षवाढीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यामुळे अन्य तालुक्यांमध्ये पक्ष वाढ खुंटली आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीवरही त्यांनी ‘उतारा’ काढलेला नाही.

एकमेकांकडे पाठरत्नागिरी शहरातील काही सामाजिक प्रश्न हाताळून पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या लढ्यात तालुका किंवा शहरातील पदाधिकारी काेठेच दिसत नाहीत. त्यातच शहराध्यक्षांनी कार्यक्रम घेतला तर तालुकाध्यक्ष नाही, तालुकाध्यक्षांनी कार्यक्रम घेतला तर जिल्हाध्यक्ष नाहीत, अशीच स्थिती आहे.

तालुकाध्यक्ष दूरचकाही दिवसांपूर्वी तालुकाध्यक्षांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला हाेता. पक्षातीलच पदाधिकाऱ्यांनी हा हल्ला केल्याचा आराेप त्यांनी केला हाेता. या घटनेनंतर तालुकाध्यक्ष पक्षापासून दूरच राहिले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणMNSमनसे