शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

रत्नागिरीत मनसेमध्ये धुमसतेय धुसफूस; अनेकांचा ‘जय महाराष्ट्र’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 18:45 IST

पदाधिकाऱ्यांमधील ताळमेळ विस्कळीत

रत्नागिरी : शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत गटबाजी अजूनही शमलेली नसून गटबाजी जाेर धरत आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली धुसफूस अजूनही संपलेली नसल्याने पदाधिकाऱ्यांची स्वतंत्रपणे वाटचाल सुरू आहे. पक्षातील या अंतर्गत गटबाजी आणि राजकारणामुळेच काहींनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्च २००६ मध्ये पक्षाची स्थापना केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांनी त्यांच्या पक्षाचा झेंडा हाती घेतला. मात्र, गेल्या १८ वर्षांत पक्षाने भरारी घेण्याऐवजी पक्षाला गळतीच अधिक लागली आहे. पक्ष वाढीसाठी कार्यरत राहणारे अनेक जुने-जाणते पक्षापासून दूर झाले आहेत. त्यातच रत्नागिरी शहरात अंतर्गत गटबाजीमुळे काेणाशी काेणाचे पटत नसल्याचे समाेर येत आहे. त्यामुळेच रत्नागिरीत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांना माेजकेच पदाधिकारी उपस्थित राहत आहेत.

पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये याेग्य ताळमेळ नसल्याने पक्षातील अनेकांनी पक्षाला साेडचिठ्ठी देऊन अन्य पक्षांचा आधार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत तर काहींनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सध्या माेजक्या पदाधिकाऱ्यांनी पक्षवाढीची धुरा सांभाळली आहे. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाची वाढ खुंटली आहे.

राज्य सरचिटणीसांचे दुर्लक्षखेड येथील वैभव खेडेकर राज्य सरचिटणीस म्हणून पक्षाची धुरा सांभाळत आहेत. मात्र, उत्तर रत्नागिरी वगळता त्यांनी जिल्ह्यातील अन्य भागात पक्षवाढीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्यामुळे अन्य तालुक्यांमध्ये पक्ष वाढ खुंटली आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीवरही त्यांनी ‘उतारा’ काढलेला नाही.

एकमेकांकडे पाठरत्नागिरी शहरातील काही सामाजिक प्रश्न हाताळून पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या लढ्यात तालुका किंवा शहरातील पदाधिकारी काेठेच दिसत नाहीत. त्यातच शहराध्यक्षांनी कार्यक्रम घेतला तर तालुकाध्यक्ष नाही, तालुकाध्यक्षांनी कार्यक्रम घेतला तर जिल्हाध्यक्ष नाहीत, अशीच स्थिती आहे.

तालुकाध्यक्ष दूरचकाही दिवसांपूर्वी तालुकाध्यक्षांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला हाेता. पक्षातीलच पदाधिकाऱ्यांनी हा हल्ला केल्याचा आराेप त्यांनी केला हाेता. या घटनेनंतर तालुकाध्यक्ष पक्षापासून दूरच राहिले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणMNSमनसे