शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

शिवशाही बसचे हप्ते थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 04:51 IST

विभाग नियंत्रकांची मध्यस्थी; दोन दिवसांत पैसे भरण्याचे आश्वासन

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाने राज्यात सर्वत्र शिवशाही बसेस सुरू केल्या आहेत. भाडेतत्त्वावर या बसेस महामंडळाने घेतल्या आहेत. मात्र, ज्या कंपनीकडून या गाड्या घेतल्या आहेत, त्यापैकी दोन गाड्यांचे हप्ते थकल्याने कंपनीचे अधिकारी गाड्या जप्त करण्यासाठी रत्नागिरीत बुधवारी दाखल झाले आहेत. विभाग नियंत्रकांच्या मध्यस्थीमुळे कंपनीने दोन दिवसात थकीत हप्ते भरण्याची ग्वाही दिल्यामुळे तूर्तास तरी जप्तीची कारवाई टळली आहे.राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी भाडेतत्त्वावर शिवशाही बसेस चालविण्यासाठी घेतल्या आहेत. मात्र, ज्या कंपनीकडून शिवशाही बसेस घेतल्या आहेत, त्या कंपनीने कर्जावर गाड्या घेतल्या आहेत. कर्जाचे हप्ते संबंधित कंपनीकडून थकल्याने बुधवारी कोल्हापूर येथून हिंदुजा लेलँड फायनान्सचे अधिकारी गाड्या जप्त करण्यासाठी माळनाका येथील विभागीय कार्यालयात दाखल झाले. यावेळी विभाग नियंत्रक अनिल मेहतर यांनी संबधित कंपनी अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून याची माहिती दिली. त्या वेळी दोन दिवसात थकीत हप्ते भरण्याची ग्वाही कंपनीने दिल्यावर फायनान्स कंपनीचे कर्मचारी कोल्हापूरला परत फिरले आहेत.गतवर्षीपासून अत्याधुनिक सोईसुविधा असलेल्या ‘शिवशाही’ गाड्या राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत दाखल झाल्या. रत्नागिरी विभागात एकूण ५३ शिवशाही बसेस आहेत. मात्र, ५३ गाड्या या सात खासगी कंपनीच्या मालकीच्या आहेत. अहमदाबाद, गुजरात येथील एका खासगी कंपनीने हिंदुजा लेलँड फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन शिवशाही बसेस खरेदी केल्या आहेत. मात्र, याचे हप्ते थकल्याने बुधवारी सकाळी कोल्हापूर येथून हिंदुजा लेलँड फायनान्स कंपनीचे अधिकारी शिवशाहीच्या क्र. एमएच ४६ बीबी ३०५४ आणि क्र. एमएच ४६ बीबी ९०२३ दोन गाड्या जप्त करण्यासाठी रत्नागिरीत दाखल झाले. बस जप्त करण्याच्या नोटिशीसह एसटीच्या माळनाका येथील विभागीय कार्यालयात कंपनीचे प्रतिनिधी कोणतीही पूर्वसूचना न देताधडकले.एसटी महामंडळात दाखल झाल्यानंतर पहिल्याच दिवसांपासून या गाड्यांबाबत प्रवाशांच्या तक्रारी आहेत. वेळेवर गाड्या न सुटणे, धिमी गती, मार्गावर धावत असताना, मध्येच गाड्या बंद पडणे, चालक प्रशिक्षित नसणे या तक्रारी नित्याच्याच झाल्या आहेत. काही वेळा तर शिवशाहीऐवजी साध्या गाड्या सोडण्याची वेळ एसटी प्रशासनावर ओढावली आहे. एसटी महामंडळातर्फे याचा दंड खासगी कंपनीकडून वसूल केला जातो....तर हप्ते कसे फेडणार?गाड्यांची पाहणी केली असता, त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. टायरमधून तारा बाहेर आलेल्या आहेत. पुढील काचेला तडा गेला असून, ती कधीही फुटण्याचा धोका आहे. गाडीतही अस्वच्छता आहे. जी कंपनी गाडीची देखभाल करू शकत नाही, ती कर्जाचे हप्ते वेळेत कशी फेडणार, असा प्रश्न या वेळी हिंदूजा लेलँड फायनान्स कंपनीच्या अधिकाºयांनी केला.त्या कंपनीच्या अधिकाºयांनी दोन दिवसात थकीत पैसे भरतो, अशी ग्वाही दिल्यावर जप्तीची कारवाई न करता फायनान्सचे कर्मचारी कोल्हापूरला परतले आहेत.

टॅग्स :Shivshahiशिवशाहीstate transportराज्य परीवहन महामंडळ