शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वाढल्या मंदिरातील फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 2:11 PM

रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम जोरात सुरू झाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत विरोधी उमदेवारांची मनधरणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कबुली देण्यासाठी थेट ग्रामदैवताच्या मंदिरात येण्यास सांगितले जात आहे.

ठळक मुद्देउमेदवारांची मनधरणी रत्नागिरीत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी

अरुण आडिवरेकररत्नागिरी : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम जोरात सुरू झाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत विरोधी उमदेवारांची मनधरणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचवेळी झालं गेलं सारे विसरून तू मला मदत कर अशी विनंतीही केली जात आहे. त्याला विरोधी उमेदवाराने समर्थन देताच त्याला कबुली देण्यासाठी थेट ग्रामदैवताच्या मंदिरात येण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या निवडणुकीच्या काळात मंदिराच्या फेऱ्या करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ४७९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अर्ज छाननीनंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असणाऱ्या उमेदवारांची निश्चिती झाली आहे. निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असणाऱ्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी अनेक ठिकाणी जोरदार प्रयत्न करण्यात आले. मात्र, सारे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आता प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या सहकार्याची अपेक्षा केली जात आहे.रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेने सर्वाधिक ग्रामपंचायती ताब्यात घेण्याचा विडा उचलला आहे. हक्काच्या ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेने ह्यसाम, दाम, दंडह्ण पणाला लावण्याची तयारी ठेवली आहे. निवडणुकीत त्याच-त्याच उमेदवारांना पक्षाकडून उमेदवारी दिली जात असल्याने नाराजीचा सूर आळवला जात आहे. त्याचाच फायदा उचलण्यासाठी अन्य पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेने काही ठिकाणी विद्यमान सदस्यांना उमेदवारी न दिल्याने बंडखोरीची शक्यता अधिक आहे.शिवसेनेच्या काही सदस्यांनी विरोधी उमेदवारांची मनधरणी करण्यासही सुरुवात केल्याची चर्चा आहे. ह्यझालं गेलं सारे विसरून जा आणि मला मदत करह्ण, अशी विनवणीच उमेदवारांकडून करण्यात येत आहे. विरोधी उमेदवारानेही होला हो देताच ह्यचल मग मंदिरात जाऊन मी तुला साथ देतोय असे सांगह्ण, असा हट्टच धरला जात आहे. उमेदवारांना मंदिरात नेऊन तेथे कबुलीजबाब देण्याची गळ घातली जात आहे. त्यामुळे सध्या मंदिरात जाणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे.सरपंचपदाची आखणीसरपंचपदाचे आरक्षण काय पडणार, याची उत्सुकता अनेकांना आहे. आरक्षणाचा पत्ता नसला तरी काहीजण गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार आहेत. त्यांनी बेरजेचे गणित करत सदस्यांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी विरोधी गटातील उमेदवारांनाही गळ घातली जात आहे.पार्ट्या झडू लागल्यामतदानाची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसा रात्रीचा प्रचार करण्यावर जोर दिला जात आहे. अनेक ठिकाणी रात्रीच्या पार्ट्या करून मतदारांना खूश केले जात आहे. यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माजी सदस्यांनी पुढाकार घेतल्याचीही चर्चा रंगत आहे.छुपा प्रचारशिवसेनेने काहींचे पत्ते कापल्यानंतर त्यांनी विरोधी गटात शिरून प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाला उघडउघड विरोध न करता छुपेपणे प्रचार करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे त्याचा फटकाही शिवसेनेला बसण्याची शक्यता अधिक आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRatnagiriरत्नागिरीElectionनिवडणूक