शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

तंत्रज्ञानाच्या युगात दिवाळीत शुभेच्छा देणारे ग्रीटिंग कार्ड अन् पत्र हरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 12:48 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील आमदारांनी पोस्टाद्वारे आपल्या मतदारांना भेटकार्ड पाठविणे पसंत केले

अरुण आडिवरेकररत्नागिरी : सण, उत्सव म्हटलं की, एकमेकांना शुभेच्छा देणे आलेच. मात्र, आजकाल सोशल मीडियाचा वापर वाढल्याने ग्रीटिंग कार्ड व पत्र पाठविण्याचे प्रमाण कमी  झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अकरा दिवसांत २४ हजार कार्डस् आणि पत्रे आली आहेत. मात्र, पूर्वी सुमारे ५० हजार शुभेच्छा पत्र येत होती.ग्रामीण भागातील संदेश वहनामध्ये आजही पोस्ट खाते प्रभावी माध्यम ठरत आहे. पूर्वी सणाला शुभेच्छा देणारे एकतरी पत्र किंवा ग्रीटिंग कार्ड यायचे. हळूहळू काळ बदलत गेला आणि तंत्रज्ञानाचे युग आले. त्यामुळे एकमेकांना पत्र पाठवून शुभेच्छा देण्याचे प्रमाण कमी झाले. फोनवरून एकमेकांना शुभेच्छा देणे सुरू झाले. त्यातही आता सोशल मीडियाचा वापर इतका वाढला आहे की, एक मेसेज टाईप करायचा आणि तो सर्वांना पाठवून द्यायचा, हे वाढले आहे. सोशल मीडियाच्या या वापरामुळे पोस्टाद्वारे शुभेच्छा पत्र किंवा कार्ड पाठविणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे.रत्नागिरी जिल्ह्यात १७ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत केवळ २४ हजार शुभेच्छा पत्र दिवाळीच्या काळात आली आहेत. सोशल मीडियामुळे पूर्वीपेक्षा निम्म्यावर हे प्रमाण आले आहे.

आमदारांचीच भेटकार्ड जास्तसाेशल मीडियाचा वापर वाढल्याने पोस्टाने भेटकार्ड पाठविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे दुकानातून भेटकार्डची हाेणारी विक्रीही कमी झाली आहे. तरीही काहीजण आजही पोस्टाने भेटकार्ड पाठवून शुभेच्छा देतात. रत्नागिरी जिल्ह्यातील आमदारांनी पोस्टाद्वारे आपल्या मतदारांना भेटकार्ड पाठविणे पसंत केले आहे. त्यामुळे पोस्टात आलेल्या भेटकार्डांमध्ये आमदारांचीच भेटकार्ड जास्त आहेत.

५० हजार यायची, आता २४ हजाररत्नागिरी जिल्हा हा दुर्गम आहे. त्यामुळे संवादासाठी पोस्ट हे एक उत्तम साधन आहे. खेडोपाडी इंटरनेटची समस्या कायम आहे. मुंबई, पुण्यात फास्ट इंटरनेट आहे. पण, ग्रामीण भागात नाही. आजही पोस्ट खाते अविरतपणे आपली सेवा देत आहे. आजही २४ हजार लोकांनी पोस्टाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. पूर्वी ४० ते ५० हजार भेटकार्ड येत होती.

पोस्टाने भेटकार्ड पाठविली जात असली तरी सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यामुळे पोस्टापेक्षा सोशल मीडियावरच शुभेच्छांचा वर्षाव अधिक असतो.

रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी भाग हा दुर्गम आहे. त्यामुळे पोस्ट प्रभावी ठरते. त्यातही पत्र लिहिणे ही एक कला आहे आणि ती रत्नागिरीकरांकडे जास्त आहे. रत्नागिरीला सांस्कृतिक वारसा असून, ती संस्कृती आजही जपली आहे. त्यामुळेच रत्नागिरीकर आजही पोस्टाने भेटकार्ड पाठवतात. - नंदकुमार कुरळपकर, डाक अधीक्षक, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPost Officeपोस्ट ऑफिसDiwaliदिवाळी 2022