शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

तंत्रज्ञानाच्या युगात दिवाळीत शुभेच्छा देणारे ग्रीटिंग कार्ड अन् पत्र हरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 12:48 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील आमदारांनी पोस्टाद्वारे आपल्या मतदारांना भेटकार्ड पाठविणे पसंत केले

अरुण आडिवरेकररत्नागिरी : सण, उत्सव म्हटलं की, एकमेकांना शुभेच्छा देणे आलेच. मात्र, आजकाल सोशल मीडियाचा वापर वाढल्याने ग्रीटिंग कार्ड व पत्र पाठविण्याचे प्रमाण कमी  झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अकरा दिवसांत २४ हजार कार्डस् आणि पत्रे आली आहेत. मात्र, पूर्वी सुमारे ५० हजार शुभेच्छा पत्र येत होती.ग्रामीण भागातील संदेश वहनामध्ये आजही पोस्ट खाते प्रभावी माध्यम ठरत आहे. पूर्वी सणाला शुभेच्छा देणारे एकतरी पत्र किंवा ग्रीटिंग कार्ड यायचे. हळूहळू काळ बदलत गेला आणि तंत्रज्ञानाचे युग आले. त्यामुळे एकमेकांना पत्र पाठवून शुभेच्छा देण्याचे प्रमाण कमी झाले. फोनवरून एकमेकांना शुभेच्छा देणे सुरू झाले. त्यातही आता सोशल मीडियाचा वापर इतका वाढला आहे की, एक मेसेज टाईप करायचा आणि तो सर्वांना पाठवून द्यायचा, हे वाढले आहे. सोशल मीडियाच्या या वापरामुळे पोस्टाद्वारे शुभेच्छा पत्र किंवा कार्ड पाठविणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे.रत्नागिरी जिल्ह्यात १७ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत केवळ २४ हजार शुभेच्छा पत्र दिवाळीच्या काळात आली आहेत. सोशल मीडियामुळे पूर्वीपेक्षा निम्म्यावर हे प्रमाण आले आहे.

आमदारांचीच भेटकार्ड जास्तसाेशल मीडियाचा वापर वाढल्याने पोस्टाने भेटकार्ड पाठविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे दुकानातून भेटकार्डची हाेणारी विक्रीही कमी झाली आहे. तरीही काहीजण आजही पोस्टाने भेटकार्ड पाठवून शुभेच्छा देतात. रत्नागिरी जिल्ह्यातील आमदारांनी पोस्टाद्वारे आपल्या मतदारांना भेटकार्ड पाठविणे पसंत केले आहे. त्यामुळे पोस्टात आलेल्या भेटकार्डांमध्ये आमदारांचीच भेटकार्ड जास्त आहेत.

५० हजार यायची, आता २४ हजाररत्नागिरी जिल्हा हा दुर्गम आहे. त्यामुळे संवादासाठी पोस्ट हे एक उत्तम साधन आहे. खेडोपाडी इंटरनेटची समस्या कायम आहे. मुंबई, पुण्यात फास्ट इंटरनेट आहे. पण, ग्रामीण भागात नाही. आजही पोस्ट खाते अविरतपणे आपली सेवा देत आहे. आजही २४ हजार लोकांनी पोस्टाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. पूर्वी ४० ते ५० हजार भेटकार्ड येत होती.

पोस्टाने भेटकार्ड पाठविली जात असली तरी सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यामुळे पोस्टापेक्षा सोशल मीडियावरच शुभेच्छांचा वर्षाव अधिक असतो.

रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी भाग हा दुर्गम आहे. त्यामुळे पोस्ट प्रभावी ठरते. त्यातही पत्र लिहिणे ही एक कला आहे आणि ती रत्नागिरीकरांकडे जास्त आहे. रत्नागिरीला सांस्कृतिक वारसा असून, ती संस्कृती आजही जपली आहे. त्यामुळेच रत्नागिरीकर आजही पोस्टाने भेटकार्ड पाठवतात. - नंदकुमार कुरळपकर, डाक अधीक्षक, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPost Officeपोस्ट ऑफिसDiwaliदिवाळी 2022