शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रज्ञानाच्या युगात दिवाळीत शुभेच्छा देणारे ग्रीटिंग कार्ड अन् पत्र हरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 12:48 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील आमदारांनी पोस्टाद्वारे आपल्या मतदारांना भेटकार्ड पाठविणे पसंत केले

अरुण आडिवरेकररत्नागिरी : सण, उत्सव म्हटलं की, एकमेकांना शुभेच्छा देणे आलेच. मात्र, आजकाल सोशल मीडियाचा वापर वाढल्याने ग्रीटिंग कार्ड व पत्र पाठविण्याचे प्रमाण कमी  झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अकरा दिवसांत २४ हजार कार्डस् आणि पत्रे आली आहेत. मात्र, पूर्वी सुमारे ५० हजार शुभेच्छा पत्र येत होती.ग्रामीण भागातील संदेश वहनामध्ये आजही पोस्ट खाते प्रभावी माध्यम ठरत आहे. पूर्वी सणाला शुभेच्छा देणारे एकतरी पत्र किंवा ग्रीटिंग कार्ड यायचे. हळूहळू काळ बदलत गेला आणि तंत्रज्ञानाचे युग आले. त्यामुळे एकमेकांना पत्र पाठवून शुभेच्छा देण्याचे प्रमाण कमी झाले. फोनवरून एकमेकांना शुभेच्छा देणे सुरू झाले. त्यातही आता सोशल मीडियाचा वापर इतका वाढला आहे की, एक मेसेज टाईप करायचा आणि तो सर्वांना पाठवून द्यायचा, हे वाढले आहे. सोशल मीडियाच्या या वापरामुळे पोस्टाद्वारे शुभेच्छा पत्र किंवा कार्ड पाठविणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे.रत्नागिरी जिल्ह्यात १७ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत केवळ २४ हजार शुभेच्छा पत्र दिवाळीच्या काळात आली आहेत. सोशल मीडियामुळे पूर्वीपेक्षा निम्म्यावर हे प्रमाण आले आहे.

आमदारांचीच भेटकार्ड जास्तसाेशल मीडियाचा वापर वाढल्याने पोस्टाने भेटकार्ड पाठविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे दुकानातून भेटकार्डची हाेणारी विक्रीही कमी झाली आहे. तरीही काहीजण आजही पोस्टाने भेटकार्ड पाठवून शुभेच्छा देतात. रत्नागिरी जिल्ह्यातील आमदारांनी पोस्टाद्वारे आपल्या मतदारांना भेटकार्ड पाठविणे पसंत केले आहे. त्यामुळे पोस्टात आलेल्या भेटकार्डांमध्ये आमदारांचीच भेटकार्ड जास्त आहेत.

५० हजार यायची, आता २४ हजाररत्नागिरी जिल्हा हा दुर्गम आहे. त्यामुळे संवादासाठी पोस्ट हे एक उत्तम साधन आहे. खेडोपाडी इंटरनेटची समस्या कायम आहे. मुंबई, पुण्यात फास्ट इंटरनेट आहे. पण, ग्रामीण भागात नाही. आजही पोस्ट खाते अविरतपणे आपली सेवा देत आहे. आजही २४ हजार लोकांनी पोस्टाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. पूर्वी ४० ते ५० हजार भेटकार्ड येत होती.

पोस्टाने भेटकार्ड पाठविली जात असली तरी सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यामुळे पोस्टापेक्षा सोशल मीडियावरच शुभेच्छांचा वर्षाव अधिक असतो.

रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी भाग हा दुर्गम आहे. त्यामुळे पोस्ट प्रभावी ठरते. त्यातही पत्र लिहिणे ही एक कला आहे आणि ती रत्नागिरीकरांकडे जास्त आहे. रत्नागिरीला सांस्कृतिक वारसा असून, ती संस्कृती आजही जपली आहे. त्यामुळेच रत्नागिरीकर आजही पोस्टाने भेटकार्ड पाठवतात. - नंदकुमार कुरळपकर, डाक अधीक्षक, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPost Officeपोस्ट ऑफिसDiwaliदिवाळी 2022