शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

संजय राऊत मुख्यमंत्रिपदासाठी टपून बसलेत - केंद्रीय मंत्री नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 17:22 IST

२०२४ मध्ये निवडणुकीत आमदारांची २० संख्यासुद्धा शिवसेनेला गाठता येणार नाही

कणकवली : महाराष्ट्रात सत्ता मिळविण्यासाठी १४५ आमदार लागतात. मात्र, आता राज्य सरकारचे सरकार अल्पमतात आले आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे लोकशाहीतील नातेसुद्धा त्यांनी धुळीला मिळवले आहे. त्यांचे सत्तेतील आठ-आठ, नऊ-नऊ आमदार फुटतात, याचा अर्थ त्यांच्यावर आता त्या आमदारांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाजूला व्हावे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी पडवे येथे रविवारी संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते.मंत्री नारायण राणे म्हणाले, राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपने मिळविलेल्या विजयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार नितेश राणे यांचे अभिनंदन करण्यासाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाचा विजय मिळविला आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजप नेत्याच्या श्रमाचे फळ मिळाले. सर्व भाजप आमदारांनी निष्ठेचे दर्शन घडविले. पक्षाप्रति असलेली निष्ठा, श्रद्धा, प्रामाणिकपणा कसा असतो हे आमदार जगताप, आमदार टिळक यांनी आजारी असतानाही मतदान करून दाखवल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी भाषा वापरली, ज्या भाषेत विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली. ती मुख्यमंत्रिपदाला शोभणारी नाही. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले, सावरकर, टिळक, महात्मा गांधी यांच्या राज्यात मुख्यमंत्री जी भाषा वापरतात ती संसदीय नाही. शरद पवार यांनी भाजपच्या विजयाने पराभवाचा धक्का बसला नाही, असे सांगतानाच देवेंद्र फडणवीस यांनी माणसे जपली, आमदार सांभाळले, म्हणून विजय झाला अशी प्रतिक्रिया दिली.

यापुढे ६ सुद्धा खासदार निवडून येणार नाहीतसंजय राऊतांचे अभिनंदन करण्याच्या वृत्तीचे ते नाहीत. मात्र त्यांचे गुरु शरद पवार आहेत. त्यांची प्रतिक्रिया त्यांनी वाचावी. खासदार संजय राऊत हे. मुख्यमंत्रिपदासाठी टपून बसलेले आहेत. त्यांना वाटते आपण मुख्यमंत्री. होणार. मात्र, असे कधीही होणार नाही. यापुढे १८ नाहीच तर ६ सुद्धा खासदार निवडून येणार नाहीत. २०२४ मध्ये निवडणुकीत आमदारांची २० संख्यासुद्धा शिवसेनेला गाठता येणार नाही, असेही मंत्री राणे या वेळी म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNarayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे