शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत मुख्यमंत्रिपदासाठी टपून बसलेत - केंद्रीय मंत्री नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 17:22 IST

२०२४ मध्ये निवडणुकीत आमदारांची २० संख्यासुद्धा शिवसेनेला गाठता येणार नाही

कणकवली : महाराष्ट्रात सत्ता मिळविण्यासाठी १४५ आमदार लागतात. मात्र, आता राज्य सरकारचे सरकार अल्पमतात आले आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे लोकशाहीतील नातेसुद्धा त्यांनी धुळीला मिळवले आहे. त्यांचे सत्तेतील आठ-आठ, नऊ-नऊ आमदार फुटतात, याचा अर्थ त्यांच्यावर आता त्या आमदारांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाजूला व्हावे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी पडवे येथे रविवारी संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते.मंत्री नारायण राणे म्हणाले, राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपने मिळविलेल्या विजयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार नितेश राणे यांचे अभिनंदन करण्यासाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाचा विजय मिळविला आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजप नेत्याच्या श्रमाचे फळ मिळाले. सर्व भाजप आमदारांनी निष्ठेचे दर्शन घडविले. पक्षाप्रति असलेली निष्ठा, श्रद्धा, प्रामाणिकपणा कसा असतो हे आमदार जगताप, आमदार टिळक यांनी आजारी असतानाही मतदान करून दाखवल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी भाषा वापरली, ज्या भाषेत विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली. ती मुख्यमंत्रिपदाला शोभणारी नाही. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले, सावरकर, टिळक, महात्मा गांधी यांच्या राज्यात मुख्यमंत्री जी भाषा वापरतात ती संसदीय नाही. शरद पवार यांनी भाजपच्या विजयाने पराभवाचा धक्का बसला नाही, असे सांगतानाच देवेंद्र फडणवीस यांनी माणसे जपली, आमदार सांभाळले, म्हणून विजय झाला अशी प्रतिक्रिया दिली.

यापुढे ६ सुद्धा खासदार निवडून येणार नाहीतसंजय राऊतांचे अभिनंदन करण्याच्या वृत्तीचे ते नाहीत. मात्र त्यांचे गुरु शरद पवार आहेत. त्यांची प्रतिक्रिया त्यांनी वाचावी. खासदार संजय राऊत हे. मुख्यमंत्रिपदासाठी टपून बसलेले आहेत. त्यांना वाटते आपण मुख्यमंत्री. होणार. मात्र, असे कधीही होणार नाही. यापुढे १८ नाहीच तर ६ सुद्धा खासदार निवडून येणार नाहीत. २०२४ मध्ये निवडणुकीत आमदारांची २० संख्यासुद्धा शिवसेनेला गाठता येणार नाही, असेही मंत्री राणे या वेळी म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNarayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे