शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

बारावीचा निकाल ५ जूनपर्यंत ? निकालाचे काम आता अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 5:39 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देबारावीचा निकाल ५ जूनपर्यंत शक्य ? : शिक्षण मंडळनिकालाचे काम आता अंतिम टप्प्यात

सागर पाटील 

टेंभ्ये : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यातील सर्वच विभागीय मंडळांमध्ये निकालाची लगबग सुरू असून, निकाल वेळीच जाहीर करण्याचा प्रयत्न राज्य मंडळाकडून केला जात आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रवारी महिन्यांत राज्यात उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षां घेण्यात आल्या होत्या. कला, शास्त्र, वाणिज्य व व्होकेशनल शाखांमधून लाखो विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेच्या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी उत्तर पुस्तिका तपासण्यावर बहिष्कार टाकला होता. शासन स्तरावर प्रलंबित असणाऱ्या आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेने बहिष्काराचा मार्ग अवलंबला होता. यामुळे अनेक उत्तर पुस्तिका उशिरापर्यंत तपासल्या गेल्या नाहीत.या पार्श्वभूमीवर राज्यातील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. गतवर्षी राज्य मंडळाकडून बारावीचा निकाल २५ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. यावर्षी हा निकाल ५ जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या अनुषंगाने विविध निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न राज्य मंडळाकडून केला जात आहे. प्राध्यापकांच्या बहिष्कारामुळे उत्तर पुस्तिका तपासण्यास उशीर झाला असल्याने निकाल जाहीर होण्यास विलंब होत आहे.३३ हजार विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत !शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जवळपास ३३६४७ विद्यार्थी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला बसले होते. कोकण विभागीय मंडळाच्या स्थापनेपासून राज्यात सर्वाधिक निकाल देण्याची परंपरा या वर्षीदेखील कायम राहील, असा विश्वास विभागातून व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :examपरीक्षाRatnagiriरत्नागिरी