शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
4
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
5
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
6
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
7
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
8
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
9
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
10
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
11
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
12
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
13
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
14
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
15
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
16
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
17
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
18
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
19
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
20
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

‘जलयुक्त शिवार’मुळे केतकी स्वयंपूर्ण

By admin | Updated: July 8, 2016 01:03 IST

वळण अन् सिमेंट बंधारे : लागवड वाढली, गाव टँकरमुक्त

चिपळूण : जलयुक्त शिवार अभियान या महत्त्वाकांक्षी योजनेत २०१५ - १६मध्ये निवड झालेल्या केतकी गावात करण्यात आलेल्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, गतिमान पाणलोट (जलयुक्त शिवार अभियान) लोकसहभाग व सी. एस. आर.अंतर्गत लोकसहभागातील कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली, तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या फळबाग व वृक्ष लागवड, मृद व जलसंधारणाच्या सलग समपातळीतील चर, अनगड दगडी बांध, वळण बंधारे, सिमेंट बंधारे, शेततळे आदींमुळे केतकी गाव टँकरमुक्त झाला आहे. त्याचबरोबर रब्बी हंगामातील कडधान्य पिकाखालील क्षेत्र वाढ व खरीप हंगामात भातपिकाच्या लावणीसाठी जलयुक्त शिवार अभियानातील वळण बंधारे उपयुक्त असल्याचे दिसून येत आहे. कोकणात दरवर्षी सरासरी ४५०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडतो. परंतु दऱ्याखोऱ्यातील, डोंगरातील हे सर्व पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळत असल्याने जानेवारी महिन्यापासूनच पाण्याची टंचाई जाणवते. परंतु, केतकी गावी या अभियानाअंतर्गत २०१५-१६ मध्ये केल्या गेलेल्या मृद संधारणाच्या जलस्रोत बळकटीकरण, बोअरवेल्स, फळबाग व वृक्ष लागवड व २०१६ - १७मध्ये चार वळण बंधारे, सिमेंट बंधारे बांधल्याने पावसाचे लाखो लीटर पाणी अडवले गेले. यामुळे परिसरातील जलस्रोत, विहिरीतील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानातील सिमेंट बंधारे जलस्रोतांमधील निर्माण झालेल्या अतिरिक्त पाण्याचा वापर करुन खरीप हंगामात भातशेतीला पाणी वळवून घेण्याबरोबर या बंधाऱ्यातील पाणी पाऊस संपल्यानंतर रब्बी हंगामात कडधान्यवर्गीय पिके, भाजीपाला पिकासाठी वापरून रब्बी हंगामात पिकाखालील क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. केतकी येथे कृषी विभाग, महसूल विभाग, एक्सेल कपंनी व शासनाच्या विविध विभागाच्या समन्वयाने पाणी आडवा, पाणी जिरवा हा उपक्रम यशस्वीपणे राबवणार असल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे यांनी कृषी जागृती सप्ताहअंतर्गत कृषी विभागातर्फे आयोजित सिमेंट बंधाऱ्यातील जलपूजन कार्यक्रमावेळी केतकी येथे व्यक्त केले. (प्रतिनिधी)दादा गरंडे : ग्रामस्थांचा सहभाग, पाणलोट समितीच्या सहकार्याने योजना पूर्णत्त्वास...जलयुक्त शिवार अभियान राबवताना कृषी विभागासोबत स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग, श्रमदान, पाणलोट समिती, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांचे सहकार्य मिळाल्याने जलस्वराज्य योजना यशस्वीरित्या पूर्णत्त्वास जात आहे. केतकी गावात राबवत असलेल्या सर्वसमावेशक योजना इतरही गावात राबवून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कालुस्ते येथील कृषी सहाय्यक दादा गरंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.केतकी गावात पाणलोट व जलयुक्त शिवार अभियानातील वेगवेगळ्या कामामुळे यावर्षी पाण्याची टंचाई भासली नाही. तसेच या अभियानात कृषी विभाग सीएसआरअंतर्गत व गावातील लोकसहभागातून केलेली विविध कामे यामुळे निर्माण झालेल्या पाणीसाठ्याचा रब्बी पिकासाठी वापर होत आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात वाढ करून येथील शेतकरी उत्पन्न घेत आहेत, असे सरपंच समीक्षा गोंधळेकर यांनी सांगितले.